Thursday 30 November 2017

कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!

 






शिशुनाळ शरीफ, सर मिर्जा इस्माईल, अब्दुल कलाम आदी प्रेरक आदर्श समोर असतानाही आपल्या सेक्युलरवाद्यांना मात्र, ते दिसत नाहीत. यांना तुष्टीकरणासाठी टिपूच्या जयंतीसारखे कार्यक्रमच हवेत.  

-  डॅनी परेरा, हासन
वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील काही इतिहासकार खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत.
टिपू जयंती विवाद पुन्हा निर्माण झाला आहे. काहीना टिपू धर्मनिरपेक्ष तर काहीच्या दृष्टीने मतांध आहे. मुसलमानांतच या देशासाठी मोठे योगदान दिलेली महान मडंळी आहेत. त्या कोणाकडेही समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे.
आदरणीय राष्ट्रपती अब्द्राल कलाम कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते. त्यांचा सर्वधर्म समन्यवय भाव हा वैश्विक होता. ते कर्मठ मुसलमान नसल्या कारणाने आपल्या समाजात सर्वमान्य नव्हते! त्यांच्या सर्वधर्म समभावाचा समान्य जनता तसेच मठाधीश, मान्यवरांनी गौरव, आदर केला. त्यामुळे घोषित धर्मनिरपेक्षतावादी कलाम यांचा समन्वयभाव आदर्श म्हणून स्वीकारले नाहीत.
शिशुनाळ शरीफ यांना कर्नाटकाचे 'कबीर दास' म्हणून ओळखले जाते. हिंदू, मुस्लिम हा भेद न बाळगता सर्वच लोक त्यांना संत म्हणून त्यांच्याकडे पाहतात. शरीफ हे सर्व भारतीय मूल्यांचा सन्मान करत होते, त्यामुळे ते येथील हिंदूंशी समरस झाले. मात्र, कर्मठांनी त्यांना दूर ठेवल्याने ते सेक्युलर कंपुचे ध्रुवतारा बनू शकले नाहीत. 
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांनी उल्लेखिलेला हा एक प्रसंग : त्याकाळी म्हैसुरू सुंदर, स्वच्छ गाव होते. दिवस उजाडताना एक अधिकारी घोड्यावर बसून रस्ते स्वच्छ केलेत की नाहीत हे पाहण्यासाठी येत होते. ते मिर्जा इस्माईल ! जे म्हैसुरूचे दिवाण होते. 'मिर्जा इस्माईल यांचा संभावितपणा, व्यक्तित्व याप्रमाणेच त्यांच्या ज्ञान, समज, विनोदी स्वाभाव, सांस्कृतिक चेतनेने त्यांना अत्यंत श्रेष्ठ आणि यशस्वी प्रशासक बनवले' असे सर सी. व्ही. रामन यांनी सांगतिले आहे. नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि मिर्जा इस्माईल या जोडीचा काळ म्हैसुरू संस्थानचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या धर्माचे असले तरी बांधवांप्रमाणे एकत्रितपणे केलेले यांचे कार्य आवडल्याने महात्मा गांधी यांनी 'येथे रामराज्य आहे' असे म्हटले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळात काँग्रेस सारख्या चळवळी चालवायची. तेव्हा मिर्जा इस्माईल यांच्यामुळे गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांशी महाराजांचे आत्मीय संबंध राहिले. या चळवळींच्या काळात मिर्जा इस्माईल यांच्या दक्षतेमुळेच कधीही दंगली उद्भवल्या नाहीत. १९४१ मध्ये जयपूर संस्थानातही कार्यरत असताना सर मिर्जा इस्माईल यांनी आपल्या दक्ष कारभाराचा ठसा उमटवला. त्यामुळे जयपूर शहरात औद्योगिक क्षेत्राने एक नवे युग अनुभवले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या आधुनिकीकरणासाठी तिकडचे नागरिकत्व स्वीकारण्याचे  महमद अली जिना यांनी आवाहन केले होते. मात्र, मिर्जा यांनी त्यांची विनंती फेटाळली. 'भारताच्या फाळणीला माझा स्पष्ट विरोध आहे' असे थेट जिना यांना कळवले.
  १९४६ मध्ये हैदराबादचे दिवाण असलेले मिर्जा इस्माईल यांनी  कोणत्याही तक्रारीविना संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे न ऐकल्याने त्यांनी काही महिन्यांतच त्यांनी दिवाण पद सोडले. मिर्जा इस्माईल कर्मठ मुसलमान नव्हते. त्यामुळे सेक्युलर कंपुने त्यांना समन्वयाचा आदर्श म्हणून स्वीकारले नाही.
केवळ ही काही उदाहरणे. याप्रमाणे जात, मत, पंथाच्या पलिकडील व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
असंख्य देशभक्त, सर्वधर्म समन्वय स्वीकारलेले मुसलमान या देशात आहेत. मात्र, देशाच्या फाळणीनंतर अशा श्रेष्ठ समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मुसलमान मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस अथवा इतर सेक्युलर पक्षांनी आणि डाव्या विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीरदास, शिशुनाळ शरीफ, मिर्जा इस्माईल, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ए पी जे अब्दुल कलाम, अश्फाकउल्ला खान यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, समाजसेवक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारकांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण दिव्य संदेश देणारे, हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. इतिहासातून न शिकल्यामुळेच तुष्टीकरणाचे विषवृक्ष अधिक बहरले आहे. हिंदू - ख्रिश्चनांच्या भावनांवर गदाप्रहार करत त्यांचे मतांतर घडवून, न स्वीकारणाऱ्यांची हत्या केलेल्या टिपूला सामरस्याचा प्रतीक म्हणून स्वीकारणे, त्याचा धर्मनिरपेक्ष म्हणून उदोउदो करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना काय म्हणावे? मतांधांनाही राष्ट्रवादी म्हणून तुष्टीकरण केले जात आहे, हे म्हणायला काही खुप ज्ञानाची आवश्यकता नाही. आणखी किती काळ हे सामरस्याचे नाटक? कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!
(साभार : विजयवाणी, लेखक प्राध्यापक, हौशी लेखक आहेत.)

क्रौर्यातच वाढलेला देशप्रेमी कसा होऊ शकतो?

टिपू स्वातंत्र्ययोद्धाही नाही. देशप्रेमीही नाही. मात्र, त्याच्याविषयीची काही खोट्या गोष्टी सातत्याने जोरकसपणे सांगितल्याने टिपूचे व्यक्तित्व विशेष प्रभावी असल्याचा भास होतो. टिपूने आपल्या स्वार्थासाठी क्रौर्यच पेरला होता.
डाॅ. एम. चिदानंद मूर्ती

टिपू वीर होता. भारतात, कर्नाटकातील वीरही त्याच्यासारखे लढून हौतात्म्य पत्करले आहेत. त्यात राजे, सैनिकही आहेत. खेडूतही आहेत. त्यांचे शेकडो शिलालेख उपलब्ध आहेत. सैनिक, खेडूतांच्या शौर्याच्या गौरवगाथ सांगणाऱ्या शेकडो वीरगळही संपूर्ण कर्नाटकात सापडतात.
पुरुषांइतकेच वीर स्त्रियाही लढल्या आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातील झांशीची राणी लक्ष्मीबाई, कर्नाटकातील बेळवडी मल्लम्मा, वीरराणी कित्तूर चन्नम्मा, अकराव्या शतकातील चालुक्य राणी अक्कादेवी आदी.
टिपू 'देशप्रेमी', 'स्वातंत्र्ययोद्धा' नाही. पूर्वी अनेक राजे आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. टिपू देशप्रेमी असेल तर तेही देशप्रेमीच असतील. ते आपापल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. आधुनिक भारताचे स्वातंत्र्ययोद्धे आपल्या स्वार्थासाठी नव्हे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढले. सुभाषचंद्र बोस यांनी आपली मातृभूमी ब्रिटशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी होतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान अथवा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. टिपू ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईत जिंकला असता तर तो पूर्वीप्रमाणेच राज्याचा अधिपती म्हणून मिरवला असता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा टिपू हा काही पहिलाच नव्हता. बंगालचा नवाब सिराजुद्दीन, महाराष्ट्रातील पेशवे, झांशीची राणी लक्ष्मीबाई हेही ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यामुळे या विषयात टिपूला कोणतेही विशेष प्रशस्ती देण्याची गरज नाही.
टिपूने दारुची  विक्री थांबवून सर्व शिंदीची झाडे तोडायला लावली, ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या राजांप्रमाणे त्यानेही रस्ते बांधले, कन्नबांडी धरण बांधले (कन्नबांडी धरणाचे काम त्याच्यापूर्वीच्या चिक्कदेवराज वडेयर याच्या काळात सुरू झाले होते.). मात्र, त्याने काही ठिकाणी हिंदूंच्या नेमणुका केल्या असल्या तरी आर्थिक व्यवस्था पाहण्यासाठी खजिन्याच्या प्रमुखांचे स्थान मुसलमानांसाठीच राखून ठेवले होते. त्याचे निष्ठावंत पूर्णय्या यांच्याच धर्मांतरणाचा प्रयत्न केला. (हे टिपूच्या मुलाच्या पुस्तकातच याचा उल्लेख आहे.). केवळ म्हैसूरुच्या राजांनी बांधल्याच्या एकमेवर कारणाने म्हैसूरुजवळील तलावाचा विद्ध्वंस केला. त्याच्या क्षेत्राची नासधूस केली. (आजच्या राजवाड्यासमोरील खेळाचे मैदान). नवव्या शतकातील राणी चेट्टलदेवी तलाव, विहीर, मंदिर बांधले, त्याच काळात आदिगौड रयत तलाव, पाणपोया बांधल्या. हे राजेमंडळी, लोकांचे कर्तव्य होते.
टिपूने हिंदू धार्मिक संस्थांना दान दिल्याचा अनेकांनी खुपच गाजावाजा केला आहे. आताच मी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याने दान देण्यामागे दोन कारणे आहेत. एक आपल्याला येऊ शकणाऱ्या संकटांच्या निवारणासाठी दान दिले असावे. संबंधित मठाधीश, भक्त, आपल्या प्रदेशातील हिंदूंचा विश्वास कायम राखणे हा दान देण्यामागचा हेतु आहे. त्याच्या अंमलाखालील श्रीरंगपट्टण, नंजनगुडू, म्हैसुरू प्रदेशातील जनेतेचा विश्वास राखून आपली राजवट आणखी बळकट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्या प्रदेशात काही अन्याय केला. ते अन्याय केला नसता तर त्याला समाधान झाले नसते. उदाहरणार्थ, श्रीरंगपट्टणमधील अंजनेय मंदिर पाडून मशीद बांधली. मात्र, तेथील रंगनाथ स्वामी देवस्थानच्या नादी लागला नाही - कारण तेच त्या प्रदेशाचे अधिदैवत. म्हैसुरुतही राजवाडा पाडून काही मंदिरे नष्ट केली. मात्र, त्याने दूरच्या कोडगू, मलबारमध्ये घोर अन्याय केला. त्याविषयीचे स्पष्ट पुरावे आहेत. त्याने दिलेले दान त्याने केलेल्या घोर अन्यायावर पडदा टाकण्यास असमर्थ ठरले आहेत. आताचे राजकारणी, गर्भश्रीमंत देवस्थानांना भेटी दिल्याच्या प्रसारमाध्यमात बातम्या होतात. त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्याही बातम्या बनतात. मात्र, गरीब देवस्थानात जातात ते खऱ्या भक्तीने; त्यांनी अर्पण केलेल्या वस्तू मोठ्या बातम्या बनत नाहीत. तेवढेच नव्हे तर ती बातमीच नाही.
टिपूचे क्रौर्य, मतांधता, हे तर स्पष्टातिस्पष्ट आहे. हे त्याच्या शिलालेख, हस्तलिखिते (उदाहणारणासाठी : केरळच्या आपल्या सेनापतीला लिहिलेले पत्र - You sHould capture and kill all hindus). त्याच्या तलवारीवर लिहिलेले (''This Victorious... ... is lightning to kill all kafirs''), त्याच्या मुलाच्या पुस्तकातील उल्लेख आदी मूलभूत पुरावे हे सूचित करतात.  त्याचे अंतरंग, धोरण, मन - त्याच्याही पूर्वीच्या उत्तर भारतातील घोरी, गजनी, बाबर, औरंगजेब यांची परंपरा त्याने पुढे नेली. कुवेंपु यांनी आपल्या एका मुलाखतीत एक गोष्ट सांगितली आहे. बांग्लामुक्तीच्या पार्श्वभूमीवर - 'ते (बांग्लामुक्ती) स्पष्ट करण्यासाठी कोणतीही भौतिक कारणे नाहीत.; धार्मिक कारणे आहेत. त्यामुळेच आपण हिंदू धर्मासाठी प्राण द्यायला हवे, असे म्हणतो. मात्र, मुस्लिम धर्मासाठी प्राण घ्यायला हवे, असे म्हणतात. इतकाच फरक आहे.' अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डाॅ. सी. पी. कृष्णकुमार यांनी पूर्वी डाॅ. कुवेंपू यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी हे सांगितले. डाॅ. पी. पी. कृष्णकुमार यांनी २१ जानेवारी २०१३ रोजी मला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. - ''टिपू विवादाशी संबंधित हे पत्र - कुवेंपू यांच्या साहित्यात; काव्यात, 'मलेगळल्ली मदुमगळु' कादंबरीसह सर्वत्र मुस्लिम विरोधी अभिप्राय आहे. त्यांनी मी वर उल्लेखिलेले कुवेंपु यांचे वक्तव्य माझ्या निदर्शनास आणून दिले. हे मृतप्राय भारतीयांना खडबडून जागे करणाऱ्या डिंडिमासारखे होय. एकूणच टिपूच्या मुस्लिम मनोधर्माचा हा एक नमुना होय. याला काही अपवादही आहेत. खंडितच सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.
पर्शियन राज्यभाषा : टिपू सत्तेवर येईतोवर म्हैसुरूची राज्यभाषा अथवा प्रशासकीय भाषा कन्नड हीच होती. टिपूने ती रद्द करुन त्या जागी पर्शयिन अथवा पर्सो - अरेबिक (Perso - Arebic) भाषेला स्थान दिले. त्याचे सगळे शिलालेख, आदेशपत्रे पर्शियन भाषेत आहेत. त्या काळी खुपच कमी प्रमाणात कन्नड भाषेचा वापर केला जात होता, मध्यम प्रमाणात पर्शयिन आणि मराठी भाषेचा वापर केला जात होता. सर्वोच्च पातळीवर केवळ पर्शियन भाषेचा वापर केला जात होता. टिपूनंतर सत्तेवर आलेल्या म्हैसुरूच्या राजांनी पुन्हा प्रशासकीय भाषा म्हणून कन्नड भाषेचा वापर सुरू केला. लक्ष वेधण्याची बाब म्हणजे - हैदर, टिपू यांच्यापूर्वीच्या हिंदू राजांच्या काळात शेकडो साहित्यांची निर्मिती झाली. टिपूच्या राजवटीत त्याच्या प्रोत्साहनाने कन्नडमध्ये कोणतेच साहित्य निर्माण झाले नाही. (वाचा - आर. नरसिंहाचार ; कर्नाटक कविचरित्रे). परंतु कोणत्याही कवी अथवा रचनाकाराने हैदर अथवा टिपूचा उल्लेख केला नाही. मात्र, म्हेसुरूच्या राजांनी दिलेले प्रोत्साहन सर्वज्ञात आहे.
(लेखक ज्येष्ठ संशोधक, साहित्यिक आहेत. )
साभार : विजयवाणी





सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...