Sunday 23 April 2023

कोण हे ? कोण हे शेट्टर ?

संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


भरलेल्या न्यायालयात न्यायाधीश चौगले साहेब कामकाज चालवत होते. तेव्हा अजून वकिलांनी काळे कोट परिधान करणे बंधनकारक नव्हते.त्यामुळे आवारात वकील कोण ? अशील कोण ? हे समजत नव्हते. त्या दिवशी शांतपणे बसून आपल्याकडे  एकटक पाहणाऱ्या युवकाकडे बोट  करून न्या. चौगले यांनी प्रसिद्ध वकील भंडीवाड यांना विचारले, 'कोण हा मुलगा?' त्यावर  भंडीवाड उत्तरले,  'साहेब, मला माहिती नाही.' न्यायाधीश रागीट चेहऱ्याने कामकाजात व्यस्त झाले. तो युवक कंटाळून बाहेर पडला.दुसऱ्या दिवशी कचेरीत आल्यावर एक लखोटा त्यांची वाट पाहत होती. ते वाचताच चौगले साहेब रागाने थरथरू लागले. त्या पत्रात असे लिहिले होते, 'न्यायालयात येऊन कामकाजाचे निरीक्षण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, अधिकार आहे. नव्याने वकिली  पेशा स्वीकारलेल्यांना कामकाजाचे निरीक्षण करून अनुभव आणि मार्गदर्शन मिळवावे लागते. एक तरुण वकील या नात्याने मी ज्येष्ठ वकिलांच्या शेजारी बसून कामकाजाचे निरीक्षण करतो. आपण थेट मलाच प्रश्न विचारायला हवे होते. मात्र, आपण मी कोण याविषयी ज्येष्ठ वकिलांकडे विचारणा केली. त्यामुळे मी काही न सांगता गप्प राहिलो. दुसऱ्यांना प्रश्न विचारुन माझ्याविषयी समजून घेण्याची आपली कार्यपद्धती माझ्यासह वकिली पेशासाठी अवमानकारक असल्याचे मी समजतो. तसेच त्याविषयी नाराजी व्यक्त करीत आहे. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आपण आपल्या या चुकीपोटी माफी मागून वकिली पेशाची प्रतिष्ठा राखावी. 
- सदाशिव शंकरप्पा शेट्टर'
हे पत्र वाचून न्यायाधीश गोंधळून गेले. ती मोठी बातमी बनल्याने शहरातही चर्चेचा विषय बनला. 'कोण हा ? कोण हा शेट्टर ?'शेवटी काहीतरी आठवून चौगले यांनी त्या युवकाला कचेरीत बोलावून घेतले. त्याला  विचारले, 'तू शंकरप्पा शिवप्पा शेट्टर (एस. एस. शेट्टर) यांचा मुलगा का ?' मुलगा उत्तरला, होय !   या सर्व घटनेला अर्धशतक उलटून गेले आहे. मात्र, हे कोण ? कोण हे शेट्टर ?' हा प्रश्न वेगळ्या प्रकारे संपूर्ण कर्नाटक राज्याला सतावत आहे !  एस. एस. शेट्टर यांचा मुलगा हा सदाशिव शेट्टर तर मग हा कोणता शेट्टर ?  यांचेही वडील एस. एस. शेट्टरच ना ? आदी प्रश्न काहींना सतावत आहेत. हे केवळ प्रश्नच राहिले असते तर त्यात काही विशेष राहिले नसते. मात्र, आता निर्माण झालेला प्रश्न मूल्ये, निष्ठा, प्रामाणिकतेचा आहे. आता चर्चेत असलेले सत्तालोलुप शेट्टर यांना काहीजण वकील सदाशिव शेट्टर यांचे पुत्र समजले आहेत. जनसंघाच्या महानायकांच्या तालमीत तयार झालेल्या सदाशिव शेट्टर यांच्या मुलाने असे का केले म्हणून काहीजण दुखावले गेले आहेत. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या घराण्याच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास तेथे तीन शतकांपासून फक्त प्रामाणिक, धर्मरक्षणासाठी जीवन समर्पित केलेले, माजासाठी जगलेले दिसतात विन: सत्तेसाठी हपापलले, धनलोलुप 'शेट्टर' दिसत नाहीत. तसे असेल तर मग हे रंग बदललेले शेट्टर कोण ? ती कथा राजमौली यांच्या सिनेमासारखे, त. सु. शामराय यांच्या 'मूरु तलेमारु' (तीन पिढ्या) पुस्तकासारखे रोचक आहे. 
उपलब्ध पुराव्यांनुसार शेट्टर वंशाच्या इतिहासाची सुरुवात १६ व्या शतकातील गोकाकचे काडप्पा शेट्टर नावाच्या शिवभक्तापासून  होते. शरणतत्त्वांनुसार जीवन व्यतीत केलेल्या दयाळू काडप्पा यांना दोन मुले होती. दुसरा मुलगा बसप्पा शेट्टर पित्याप्रमाणेच शिवभक्त होता. त्यांची समाजसेवा आणि सात्विकता पाहून गदगचे तोंटदार्य स्वामीजी, सवणूरचे नवाब आणि जडे मठाचे स्वामीजी यांनी त्यांना सन्मानाचे स्थान दिले होते. त्यांनी चित्रदुर्गचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजींना बोलावून हुब्बळ्ळीमध्ये मूरुसाविर मठाची निर्मिती केली. पुढे त्यांचे तिसरे पुत्र गुरुसिद्धप्पा शेट्टर हे त्या मठाचे पीठाधीशही झाले. ही काडप्पा शेट्टर यांच्या वंशातील तिसरी पिढी होय. यांच्या नंतरच्या पाचव्या पिढीत जन्मलेलेच शंकरप्पा शिवप्पा शेट्टर अथवा एस. एस. शेट्टर होत. हेच न्यायाधीशांना माफी मागायला सांगितलेल्या स्वाभिमानी सदाशिव शेट्टर यांचे वडील. वकील सलेले एस. एस. शेट्टर हे हुब्बळ्ळी - धारवाड भागातील प्रसिद्ध व्यक्ती होते. शेट्टर चाळीत आलेल्या कोणालाही  रिकाम्या हाताने न पाठविणारे महादानी होते. धारवाड भागातील खेड्यांतील मुलांना बोलावून आणून आपल्या घरात ठेवून शिक्षण देणारे एस. स. शेट्टर आपल्या वयाच्या ३४ व्या वर्षी निवर्तले. ते निवर्तण्याधी काही वर्षांपासून ते कलघटगी, मिसरकोटी आदी गावांतील गरीब कुटुंबातील मुलांना आणून आपल्या घरी ठेवून शिक्षण देत होते.  त्याचप्रकारे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हा बुद्धिमानी मुलगाही आला होता. पुढे हेही एस. एस. शेट्टर म्हणूनच प्रसिद्ध झाले. या शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर यांना आपल्याला लोक एस. एस. शेट्टर म्हणूनच ओळखतात याचा अभिमान वाटायचा. शिवाय ते अन्न - शिक्षण दिलेल्या शेट्टर घराण्याचे निष्ठावंतही होते. थोरले एस. एस. शेट्टर यांच्या अपार संपत्तीला किंचितही अपाय होणार नाही अशाप्रकारे सुरक्षित राखलेले हे सवाई एस. एस. शेट्टर होत. कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही सवाई एस. एस. शेट्टर हे थोरले एस. एस. शेट्टर यांचा मुलगा सदाशिव शेट्टर हे वकिली पेशा सुरू करण्याच्या काळापर्यंत त्या कुटुंबाची सेवा करत सार्थक जीवन जगले.
  इकडे सदाशिव शेट्टर यशस्वी वकील झाले. विवाह झाल्यानंतर त्यांना पाच मुले झाली. सोबतच ते काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. तिकडे काडप्पा शेट्टर यांचे वंशज नसलेले शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर हेही सांसारिक जीवनात पडले होते. त्यांनाही मुले झाली होती. त्यातील एकजण पुढे भारतीय जनता पक्षात अनेक पदे, सत्ता उपभोगून जगदीश शेट्टर म्हणून प्रसिद्ध झाले.  काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले वकील सदाशिव शेट्टर यांना काँग्रेस कार्यकर्त्यांत श्रद्धा, क्रियाशीलता नाही असे वाटले. सत्तेचा दंभ, जातियवाद आणि अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण हे राष्ट्रभावनेला अपायकारक असल्याचे त्यांनी जाणले. आपण येथेच राहिल्यास काँग्रेसप्रमाणे निष्क्रिय बनून राहू, ही भीती सतावू लागली. तेव्हा त्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनांनी आकर्षित केले. त्यानंतर पुढचा - मागचा विचार न करता सदाशिव शेट्टर यांनी जनसंघात प्रवेश केला. जगन्नाथराव जोशी, भाऊराव देशपांडे आणि गदगचे डॉ. रामचंद्र अनंतराव जालिहाळर यांच्या मार्गदर्शनामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही संपर्कात आले. १९६२ हुब्बळ्ळीतून, १९६४ मध्ये धारवाडमधून विधासभेची निवडणूक लढवून त्यात पराभूत झाले. १९६७ च्या निवडणुकीत हुब्बळ्ळीमधून निवडणूक रिंगणात उतरून जिंकले. तसेच दक्षिण भारतातील जनसंघाचे पहिले आमदार म्हणून ओळखले गेले. उशिरा जनसंघात प्रवेश केला असला तरी निष्ठावंत कार्यकर्ता बनून राहिले. पक्षाच्या कार्यासाठीच प्रिंटिंग प्रेस सुरू केले. कार्यकर्त्यांना घरी जेऊ घालून पक्षाची बांधणी केली. दीनदयाळ यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांचे निकटवर्तीय राहिले. हुब्बळ्ळी हॉस्पिटलच्या निर्मितीनंतर कोणीही वाली नसलेल्या कामगारांसाठी लढा देऊन निवारा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनांचे संघटन केले. मालमत्ता कराच्या विरोधात धरणे धरले. दरवाढ, रेशनमधील भेदभाव विरोधात रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले. 
दीनदयाळ उपाध्याय हे उत्तर कर्नाटकाच्या प्रवासावर आल्यानंतर त्यांच्यासोबत संघटन कार्य केले. हाती घेतलेले कार्य वेगाने संपविणारे सदाशिव शेट्टर यांनी आपले जीवनकार्यही घाईघाईत संपविले. १९६८ मध्ये आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी आमदार असतानाच ते निवर्तले. तेथेच शेट्टर कुटुंबियांच्या राजकीय जीवनाचा अंत्य झाला.   यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कार्यकर्त्यांनी शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर (सवाई एस. एस. शेट्टर) यांना उमेदवार म्हणून उभे केले. मात्र, ते जिंकले नाहीत. आपल्याला अन्न दिलेल्या सदाशिव शेट्टर यांच्या कुटुंबाच्या मूल्यांना अनुसरून ते जगले. मात्र, सवाई एस. एस. शेट्टर तसे जगले म्हणून त्यांच्या मुलानेही तसे जगावे कसे काही आहे का ?  तसेही हुब्बळ्ळी - धारवाडमध्ये शेट्टर घराण्याची एक हवा होती. सदाशिव शेट्टर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व कारणांमुळे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शेट्टर कुटुंबातील कोणी  उमेदवार झाल्यास भाजप जिंकेल, ही गोष्ट राजकीय वलयात प्रचलित झाली होती. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या मुलांपैकी कोणीही राजकारणात येणार नसल्याचे सांगून गप्प राहिले. त्या वेळेस आकस्मिकपणे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर यांचा मुलगा राजकीय नेत्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर तो मागे वळून पाहिला नाही. एकेक राजकीय पायऱ्या चढत राहिले. शेट्टर हे नावच त्यांना विजय मिळवून देत होते. त्यामुळे आधुनिक शेट्टर यांचे राजकीय जीवन सुलभ झाले. 
कालौघात जुन्या शेट्टर यांची मूल्ये जुळ्या शहरात दंतकथा बनून लोकप्रिय झाली असताना या शेट्टरमध्ये आपणच विचार, आपणच भाजप  हा भ्रमही वाढला. काडप्पा शेट्टर यांच्या घराण्याच्या प्रभाव व वलयाशिवाय आपण पुढे आलो हा अहंकारही निर्माण झाला. यडीयुरप्पा यांचे सरकार असताना हुब्बळ्ळीत सदाशिव शेट्टर यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीला या ट्टरांनी दाद दिली नाही. शेवटी चाहत्यांनी छोटासा पुतळा बनविल्यावर काहीनी त्याला अडथळा आणला !  सरकारने सदाशिव शेट्टर यांच्याविषयीचे पुस्तक प्रकाशित केले. त्या समारंभात मंत्री शेट्टर यांनी थोरले शेट्टर यांच्या मुलांना सौजन्य म्हणूनही व्यासपीठावर न बोलावता त्यांना मानसिक त्रास दिला. म्हणजे भाजपमध्ये असतानाच या शेट्टर यांच्या मनामध्ये षडयंत्र, कुटीलता, धूर्तपणा भरलेली होती. पण मुखवटाही किती दिवस लपवला जाऊ शकतो ? तो आता गळून पडला आहे. आता ते संघाच्या प्रचारकांविषयी अशोभनीय वक्तव्य करण्याइतके अधोगतीला पोहोचले आहे. मात्र, यात कोणतेही आश्चर्य दिसत नाही. कारण हे काडप्पा शेट्टर यांच्यासारखे जगलेच नाहीत ! त्यामुळे आश्चर्य का वाटावे ? शिवाय वडील शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हेही निवर्तले होते. 
त्यातच या शेट्टरना कोणाच्या उपकाराची जाण राहिली नाही. त्यामुळे पक्ष सोडतानाही त्यांना लाज वाटली नाही.  विडंबन म्हणजे आजही बहुतांश लोक हे भाजपकडे पाठ फिरवलेल्या या शेट्टरना सदाशिव शेट्टर यांचे पुत्र, दीनदयाळ यांच्या संपर्कातील घराण्यातीलच समजले आहेत ! हे अगदी असे झाले की बिस्लेरी पाण्याची बाटली यशस्वी झाल्यानंतरत्याच नावाशी साधर्म्य राखणाऱ्या नकली बाटल्या बाजारात आल्या ना तसे झाले !संदर्भ ग्रंथ : संसदीयपटू सदाशिव एस. शेट्टर. ग्रंथालय उपसमिती, बंगळुरू

Thursday 6 April 2023

शाब्बास ! बहुसंख्यकांवर दडगफेक करण्याइतके स्वातंत्र्य

 



दगडफेक करण्याच्या रोगाने यांना कसे पछाडलेय देवच जाणे. आधी आपण दूरच्या काश्मिरमध्ये दगडफेक करताना आपण या लोकांना पाहायचो. आता गावोगावी यांची गर्दी झाली आहे.  काश्मिरात प्रत्युत्तरादाखल सैनिकांनी चार वाजवले ना, तसे सर्वत्र केल्यास हे नीट होतात का पहावे. बिहार, पश्‍चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह सर्वत्र हे दगडफेक करणारे जोरात आहेत. मशिदीवर लपून उभे राहायचे, शेवटी हिंदूंच्या मिरवणुका आल्यावर चोहोबाजूंनी दडफेक करायच्या, या हीनबुद्धीचे कोणी शहाणा माणूस समर्थन करू शकत नाही. अशातच इस्लाममध्ये स्थान नसल्याने मशिदीबाहेर डीजेसह येणार्‍या मिरवणुकांचा ते विरोध करत असल्याचे सांगतात. शाब्बास ! दररोज अजानावेळी अल्ला हा एकच देव असल्याचे सांगितले जाते.  तेहतीस कोटी देवांची पूजा करणारे हिंदू ते ऐकतच आले नाहीत का ? दररोज मशिदीबाहेर गोंगाट निर्माण करणार्‍या स्पीकरवर दगडफेक करुन नष्ट केले आहेत का ? यांना या मिरवणुकीतील संगीत सहन होत नसेल तर काय काय हवे सांगा ?  गुजराती लोक संगीताच्या तालावर दांडिया नृत्य करताना याच समुदायाचे तरुण चोरुन येऊन निर्लज्जपणे ठेका धरतात ना, तेव्हा इस्लामला संगीत चालते का ? सेक्युलॅरिझमची शिकवण हिंदूंनाच का ? दगडफेक करणार्‍यांना किती दिवस अल्पसंख्यकाच्या छत्राखाली सांभाळून घ्यायचे ?

अल्पसंख्यक म्हणजे संख्येने कमी असलेले हा अर्थ. मात्र, 2011 च्या जनगणनेनुसार मुसलमानांची संख्या शेकडा 15 असून, 18 कोटींची संख्या ओलांडले आहेत. इंडोनेशिया, पाकिस्तान वगळता ते भारतातच सर्वाधिक संख्येने आहेत. यांची लोकसंख्या जगातील 95 देशांपेक्षाही अधिक आहे. उत्तर प्रदेशातील मुसलमानांची संख्या ही इस्लामचा उदय झालेल्या सौदी अरेबियातील मुसलमानांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे ! पश्‍चिम बंगाल, केरळ, आसाम येथे मुस्लिमांची भूमिका निर्णायक ठरते. तसे असूनही हे अल्पसंख्याकच ? तसे पाहिल्यास भारतात समलैंगिक, तृतीयपंथी हे खरे अल्पसंख्यक. सुविधा द्यायच्याच तर त्यांना द्यायला हव्या, यांना नव्हे. त्यामुळेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, जेथे धर्माला प्रामुख्यता आहे त्या देशात अल्पसंख्याक विभाग हवे. भारतात सर्व समान आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना येथे संधी देऊ नये. त्या दृष्टीने सांगायचे झाल्यास इस्लाम प्रधान राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात, सौदी अरेबियात आणि ख्रिश्‍चॅनिटीच राष्ट्रधर्म असलेल्या इंग्लंडमध्ये इतर धर्मियांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा द्यायला हवा, भारतात नव्हे !

खरे तर जागतिकदृष्ट्या हिंदू अल्पसंख्य आहेत. जगात सर्वाधिक संख्येने आहेत ते ख्रिश्‍चन, मुस्लिमच. एकेकाच्या वाट्याला 50 हून अधिक देश आहेत. हिंदू केवळ इथेच राहतात. त्यामुळे जागतिकदृष्ट्या अल्पसंख्यकाच्या सुविधा आम्हालाच मिळायला हव्यात, तलवारीला घाबरुन धर्मांतर केलेल्यांना नव्हे. आमच्यात पंजाब, जम्मू काश्मिर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेशात हिंदूच अल्पसंख्यक आहेत. मात्र, तेथेही अल्पसंख्यकाच्या सर्व सुविधा लाटणारे लोक हे मुस्लिमच आहेत. वास्तविकपणे देशभरात अल्पसंख्यक शब्दाला सन्मान मिळेल अशाप्रकारे खर्‍या अर्थाने पारसी हेच अल्पसंख्यक आहेत. खरेतर त्यांनाच अल्पसंख्यक म्हणून दर्जा मिळायला हवा, सुमारे 20 कोटींहून अधिक असलेल्या, दगडफेक करुन गोंधळ माजविणार्‍या या लोकांना नव्हे. 

स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच काँग्रेसने मुस्लिमांना घरजावईप्रमाणे पाहायचा धडा गिरवायला सुरुवात केली.  आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीयदृष्ट्या चाणाक्ष नसलेले मुस्लिम मशिदीसाठी अंथरायला दिले तरी मते देतील. अशांनाच डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने अल्पसंख्यक धोरणाच्या माध्यमातून त्यांना बहुसंख्यक हिंदूंपेक्षाही वर बसवण्याची योजना आखली.  वास्तविकपणे, आपल्या संविधानाच्या प्रकारे सर्वजण समान आहेत. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना बहुसंख्यकांपेक्षा वर बसवण्याचाच नव्हे तर अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्‍या बौद्ध, शीख, जैनांना कोपर्‍यात सारुन मुस्लिमांच्या वैभवीकरणासाठी प्रयत्न केले. एकेकाळी मनमोहन सिंग यांनी या देशाच्या साधनसंपत्तीवर मुसलमानांचाच पहिला अधिकार असल्याचे सांगून टाकले होते. आताही तेवढेच. काँग्रेसच्या राज्यांत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मुस्लिमांची घरे पाडावी लागणार असतील तर रस्त्यांचे रुंदीकरणच थांबवले जाते. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची कथा काही यापेक्षा वेगळी नाही. काही प्रमाणात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी मात्र चार वाजवून यांच्या गुंडगिरीला आळा घातला आहे. तर त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही प्रमाणात या विषयी यश मिळवले आहे. उर्वरित सर्वजण त्यांच्या दगडफेकीला घाबरुन लपून बसणारे नेतेच आहेत. मुस्लिमांना अल्पसंख्यकाचा दर्जा द्यायलाच हवा, म्हणणारे काही डावे बुद्धीजीवी अल्पसंख्यक शैक्षणिकदृष्ट्या मागे असल्याने हे धोरण आवश्यक असल्याचे सांगतात. हिंदू आणि मुस्लिमांचा शैक्षणिक स्तर सुमारे शेकडा 64 इतके म्हणजे समसमान आहे. अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जैनांचे शैक्षणिक स्तर शेकडा 87 इतके आहे. उर्वरित अल्पसंख्यकांचा शैक्षणिक स्तर हिंदूंपेक्षा अधिक आहे. तरीही अधिकाधिक सवलती यांनाच दिल्या जातात याचा अर्थ काय आहे ! इतके होऊनही इतर अल्पसंख्यकांची लोकसंख्या दर जनगणतीला घटत असताना मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. याला या समाजातील महिला शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्याचे कारण सांगितले जाते. आकडेवारीनुसार हिंदू आणि मुस्लिम महिलांचा शैक्षणिक स्तर शेकडा 90 आहे. तरीही त्या मुली लग्न झाल्यावर अपत्य देणार्‍या यंत्र बनतात म्हणजे यामागे एखादे प्रबळ षडयंत्र असलेच पाहिजे. योजना आखाणारा कोणीही याकडे लक्षही देत नाही, हे आश्‍चर्यजनक आहे. त्यातही संविधानाच्या प्रकारे दोन प्रकारचे अल्पसंख्यक आहेत. एकीकडे आतापर्यंत पाहिलेले धार्मिक अल्पसंख्यक  तर दुसरीकडे भाषिक अल्पसंख्यक आहेत. मात्र, या भाषिक अल्पसंख्यकांची आपल्या राजकारण्यांनी काळजी वाहिल्याचेे खूपच अतिविरळ आहे. बोलायचे झाले तर मुस्लिमांना सोयीसुविधा वाटणार्‍या या लोकांनी कधीतरी महाराष्ट्रातील भाषिक अल्पसंख्यक असलेल्या कन्नडिगांना योजनेत वाटा दिला आहे का ? हिंदीवगळता उर्वरित सर्व भाषा भाषिक अल्पसंख्यक वर्गात मोडत असतील तर तेथे आरक्षण नको काय ? याविषयी आवाज उठविल्यावर न्यायालयाने भाषिक अल्पसंख्यकांविषयी त्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. मात्र, धार्मिक अल्पसंख्यकांविषयी राष्ट्रीय स्तरावरच निर्णय घेतले जातात ना ! थोडेसे गोंधळ आहे वाटते ना ? या कारणामुळेच धार्मिक अल्पसंख्यक असलेले मुस्लिम देशातील बहुतेक योजना लाटून वाढतानाच त्यांच्या सुखकर जीवनासाठी कर भरणार्‍या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धैर्य दाखवत आहेत.  



सगळी चूक हिंदूंचीच आहे. हे सर्वजण स्वत:ची रिलिजन म्हणून ओळख जपत असताना आपण मात्र, हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती समजतो.  संविधानात धर्माला जागा आहे, जीवनपद्धतीला जागाच नाही. हिंदूंना लहानपणापासूनच चांगले संस्कार देऊन उत्तम नागरिक बनेल, यादृष्टीने घडविले जाते. साहजिकच तो विवेकी बनतो. विवेकी आणि अविवेकी यांच्या हाणामारीत अडकल्यास जिंकणार तो अविवेकीच. कारण विवेकी तर्कशुद्ध विचार मांडतो. टीव्ही डिबेटमध्ये विचारलेल्या प्रश्‍नामुळे सर तनसे जुदा म्हणत रस्त्यावर उतरलेल्या अविवेकींमुळे हिंदू शांत झाला. कारण त्यांच्यासारखे रस्त्यावर उतरुन भांडणे त्याला कधीही शक्य नाही. तर गुंडगिरीपुढे सरकारही झुकतात. त्यांना सरकारात आहे तितके दिवस शांतपणे कारभार करणे पुरेसे आहे. अशी सरकारे शांतपणे राहणार्‍याला पाठीवर मारुन चांगल्या गोष्टी सांगतील मात्र, गुंडांच्या कानाखाली चार वाजवून तोंड न उघडता गप्प बसायला सांगणार नाहीत. त्यामुळेच दगडफेक करणारे हे लोक जिंकतात. म्हणून सभ्य समाज याला जय म्हणत नाही. त्याला पाहून त्यांना वाईट वाटते. शेवटी शेजारीपाजारी ते असल्यास घर विकून सभ्य लोक राहणार्‍या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळेच चार मुस्लिमांच्या घरांपासून सुरू झालेला एरिया कालांतराने मिनी पाकिस्तानात बदलतो !

तसे सर्वच मुस्लिम या दगडफेक करणार्‍यांचे समर्थक नाहीत. मुस्लिमांत अशाप्रकारे दगडफेक करणारे अल्पसंख्यक वर्ग असला तरी याविषयी काही न बोलता शांतपणे सहन करत राहणारे बहुसंख्य मुस्लिमही आहेत. अशा शांतिप्रिय बहुसंख्यकांत मुस्लिमांनी विकासाच्या वाटेवरुन पुढे जावे असे सांगत आत्यंतिक आदर्शवाद नाकारणारे लोक असले तरी दुसरीकडे या गुंडांचा निषेध करुनही मुस्लिमांच्या विकासाविषयी कल्पनाही न करणारे लोकही आहेत. तेच बुरखा, हिजाबाचे समर्थन करत रस्त्यावर उतरतात. यांना दगडफेक करणारे आवडत नाहीत हे खरे आहे. मात्र, मुस्लिमांना विकासाच्या वाटेवर पाहणेही यांना आवडत नाही. अशांचाच काँग्रेस, जनता दलाला पाठिंबा आहे. गेली सात दशके राजकारणात मुख्य भूमिकेत राहिलेल्या या पक्षांनी मुस्लिमांना उच्च पदावर बसविण्याची कल्पनाही केली नाही. मोदींच्या आधी दहा वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मुस्लिमांना पंतप्रधान केले होते का ? अहमद पटेल यांच्या सावलीतच वाढलेल्या काँग्रेसने त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केलीच नाही ना ! इतके सारे बोलणार्‍या ममता बॅनर्जी यांनी आपले स्थान कोणा मौलवीला सोडून दिल्याचे पाहिलात का ? सिद्धरामय्या यांनी तर गेल्या निवडणुकीत परमेश्‍वर यांचा पराभव घडवून आणून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून दूर राहतील असे केले ना ! हे सगळे व्यासपीठावर बोलतात ना, तसे जीवनात आचरण करत नाहीत. तरीही मुस्लिमांचा यांच्यावर विश्‍वास आहे. असूद्या, काहीही चुकीचे नाही. त्यांचा हा विश्‍वास कायम राखण्यासाठी पीडित, वंचितांच्या सवलती त्यांना देणे हे ते कसे सहन करतील ? या पार्श्‍वभूमीवर बोम्मई सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण काढून ते गौडा आणि लिंगायतांना दिले ही वस्तुस्थिती कौतुकास्पद आहे. 

- चक्रवर्ती सुलिबेले 

- अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...