Thursday 30 November 2017

कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!

 






शिशुनाळ शरीफ, सर मिर्जा इस्माईल, अब्दुल कलाम आदी प्रेरक आदर्श समोर असतानाही आपल्या सेक्युलरवाद्यांना मात्र, ते दिसत नाहीत. यांना तुष्टीकरणासाठी टिपूच्या जयंतीसारखे कार्यक्रमच हवेत.  

-  डॅनी परेरा, हासन
वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील काही इतिहासकार खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत.
टिपू जयंती विवाद पुन्हा निर्माण झाला आहे. काहीना टिपू धर्मनिरपेक्ष तर काहीच्या दृष्टीने मतांध आहे. मुसलमानांतच या देशासाठी मोठे योगदान दिलेली महान मडंळी आहेत. त्या कोणाकडेही समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे.
आदरणीय राष्ट्रपती अब्द्राल कलाम कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते. त्यांचा सर्वधर्म समन्यवय भाव हा वैश्विक होता. ते कर्मठ मुसलमान नसल्या कारणाने आपल्या समाजात सर्वमान्य नव्हते! त्यांच्या सर्वधर्म समभावाचा समान्य जनता तसेच मठाधीश, मान्यवरांनी गौरव, आदर केला. त्यामुळे घोषित धर्मनिरपेक्षतावादी कलाम यांचा समन्वयभाव आदर्श म्हणून स्वीकारले नाहीत.
शिशुनाळ शरीफ यांना कर्नाटकाचे 'कबीर दास' म्हणून ओळखले जाते. हिंदू, मुस्लिम हा भेद न बाळगता सर्वच लोक त्यांना संत म्हणून त्यांच्याकडे पाहतात. शरीफ हे सर्व भारतीय मूल्यांचा सन्मान करत होते, त्यामुळे ते येथील हिंदूंशी समरस झाले. मात्र, कर्मठांनी त्यांना दूर ठेवल्याने ते सेक्युलर कंपुचे ध्रुवतारा बनू शकले नाहीत. 
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांनी उल्लेखिलेला हा एक प्रसंग : त्याकाळी म्हैसुरू सुंदर, स्वच्छ गाव होते. दिवस उजाडताना एक अधिकारी घोड्यावर बसून रस्ते स्वच्छ केलेत की नाहीत हे पाहण्यासाठी येत होते. ते मिर्जा इस्माईल ! जे म्हैसुरूचे दिवाण होते. 'मिर्जा इस्माईल यांचा संभावितपणा, व्यक्तित्व याप्रमाणेच त्यांच्या ज्ञान, समज, विनोदी स्वाभाव, सांस्कृतिक चेतनेने त्यांना अत्यंत श्रेष्ठ आणि यशस्वी प्रशासक बनवले' असे सर सी. व्ही. रामन यांनी सांगतिले आहे. नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि मिर्जा इस्माईल या जोडीचा काळ म्हैसुरू संस्थानचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या धर्माचे असले तरी बांधवांप्रमाणे एकत्रितपणे केलेले यांचे कार्य आवडल्याने महात्मा गांधी यांनी 'येथे रामराज्य आहे' असे म्हटले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळात काँग्रेस सारख्या चळवळी चालवायची. तेव्हा मिर्जा इस्माईल यांच्यामुळे गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांशी महाराजांचे आत्मीय संबंध राहिले. या चळवळींच्या काळात मिर्जा इस्माईल यांच्या दक्षतेमुळेच कधीही दंगली उद्भवल्या नाहीत. १९४१ मध्ये जयपूर संस्थानातही कार्यरत असताना सर मिर्जा इस्माईल यांनी आपल्या दक्ष कारभाराचा ठसा उमटवला. त्यामुळे जयपूर शहरात औद्योगिक क्षेत्राने एक नवे युग अनुभवले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या आधुनिकीकरणासाठी तिकडचे नागरिकत्व स्वीकारण्याचे  महमद अली जिना यांनी आवाहन केले होते. मात्र, मिर्जा यांनी त्यांची विनंती फेटाळली. 'भारताच्या फाळणीला माझा स्पष्ट विरोध आहे' असे थेट जिना यांना कळवले.
  १९४६ मध्ये हैदराबादचे दिवाण असलेले मिर्जा इस्माईल यांनी  कोणत्याही तक्रारीविना संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे न ऐकल्याने त्यांनी काही महिन्यांतच त्यांनी दिवाण पद सोडले. मिर्जा इस्माईल कर्मठ मुसलमान नव्हते. त्यामुळे सेक्युलर कंपुने त्यांना समन्वयाचा आदर्श म्हणून स्वीकारले नाही.
केवळ ही काही उदाहरणे. याप्रमाणे जात, मत, पंथाच्या पलिकडील व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
असंख्य देशभक्त, सर्वधर्म समन्वय स्वीकारलेले मुसलमान या देशात आहेत. मात्र, देशाच्या फाळणीनंतर अशा श्रेष्ठ समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मुसलमान मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस अथवा इतर सेक्युलर पक्षांनी आणि डाव्या विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीरदास, शिशुनाळ शरीफ, मिर्जा इस्माईल, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ए पी जे अब्दुल कलाम, अश्फाकउल्ला खान यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, समाजसेवक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारकांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण दिव्य संदेश देणारे, हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. इतिहासातून न शिकल्यामुळेच तुष्टीकरणाचे विषवृक्ष अधिक बहरले आहे. हिंदू - ख्रिश्चनांच्या भावनांवर गदाप्रहार करत त्यांचे मतांतर घडवून, न स्वीकारणाऱ्यांची हत्या केलेल्या टिपूला सामरस्याचा प्रतीक म्हणून स्वीकारणे, त्याचा धर्मनिरपेक्ष म्हणून उदोउदो करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना काय म्हणावे? मतांधांनाही राष्ट्रवादी म्हणून तुष्टीकरण केले जात आहे, हे म्हणायला काही खुप ज्ञानाची आवश्यकता नाही. आणखी किती काळ हे सामरस्याचे नाटक? कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!
(साभार : विजयवाणी, लेखक प्राध्यापक, हौशी लेखक आहेत.)

क्रौर्यातच वाढलेला देशप्रेमी कसा होऊ शकतो?

टिपू स्वातंत्र्ययोद्धाही नाही. देशप्रेमीही नाही. मात्र, त्याच्याविषयीची काही खोट्या गोष्टी सातत्याने जोरकसपणे सांगितल्याने टिपूचे व्यक्तित्व विशेष प्रभावी असल्याचा भास होतो. टिपूने आपल्या स्वार्थासाठी क्रौर्यच पेरला होता.
डाॅ. एम. चिदानंद मूर्ती

टिपू वीर होता. भारतात, कर्नाटकातील वीरही त्याच्यासारखे लढून हौतात्म्य पत्करले आहेत. त्यात राजे, सैनिकही आहेत. खेडूतही आहेत. त्यांचे शेकडो शिलालेख उपलब्ध आहेत. सैनिक, खेडूतांच्या शौर्याच्या गौरवगाथ सांगणाऱ्या शेकडो वीरगळही संपूर्ण कर्नाटकात सापडतात.
पुरुषांइतकेच वीर स्त्रियाही लढल्या आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातील झांशीची राणी लक्ष्मीबाई, कर्नाटकातील बेळवडी मल्लम्मा, वीरराणी कित्तूर चन्नम्मा, अकराव्या शतकातील चालुक्य राणी अक्कादेवी आदी.
टिपू 'देशप्रेमी', 'स्वातंत्र्ययोद्धा' नाही. पूर्वी अनेक राजे आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. टिपू देशप्रेमी असेल तर तेही देशप्रेमीच असतील. ते आपापल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. आधुनिक भारताचे स्वातंत्र्ययोद्धे आपल्या स्वार्थासाठी नव्हे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढले. सुभाषचंद्र बोस यांनी आपली मातृभूमी ब्रिटशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी होतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान अथवा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. टिपू ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईत जिंकला असता तर तो पूर्वीप्रमाणेच राज्याचा अधिपती म्हणून मिरवला असता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा टिपू हा काही पहिलाच नव्हता. बंगालचा नवाब सिराजुद्दीन, महाराष्ट्रातील पेशवे, झांशीची राणी लक्ष्मीबाई हेही ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यामुळे या विषयात टिपूला कोणतेही विशेष प्रशस्ती देण्याची गरज नाही.
टिपूने दारुची  विक्री थांबवून सर्व शिंदीची झाडे तोडायला लावली, ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या राजांप्रमाणे त्यानेही रस्ते बांधले, कन्नबांडी धरण बांधले (कन्नबांडी धरणाचे काम त्याच्यापूर्वीच्या चिक्कदेवराज वडेयर याच्या काळात सुरू झाले होते.). मात्र, त्याने काही ठिकाणी हिंदूंच्या नेमणुका केल्या असल्या तरी आर्थिक व्यवस्था पाहण्यासाठी खजिन्याच्या प्रमुखांचे स्थान मुसलमानांसाठीच राखून ठेवले होते. त्याचे निष्ठावंत पूर्णय्या यांच्याच धर्मांतरणाचा प्रयत्न केला. (हे टिपूच्या मुलाच्या पुस्तकातच याचा उल्लेख आहे.). केवळ म्हैसूरुच्या राजांनी बांधल्याच्या एकमेवर कारणाने म्हैसूरुजवळील तलावाचा विद्ध्वंस केला. त्याच्या क्षेत्राची नासधूस केली. (आजच्या राजवाड्यासमोरील खेळाचे मैदान). नवव्या शतकातील राणी चेट्टलदेवी तलाव, विहीर, मंदिर बांधले, त्याच काळात आदिगौड रयत तलाव, पाणपोया बांधल्या. हे राजेमंडळी, लोकांचे कर्तव्य होते.
टिपूने हिंदू धार्मिक संस्थांना दान दिल्याचा अनेकांनी खुपच गाजावाजा केला आहे. आताच मी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याने दान देण्यामागे दोन कारणे आहेत. एक आपल्याला येऊ शकणाऱ्या संकटांच्या निवारणासाठी दान दिले असावे. संबंधित मठाधीश, भक्त, आपल्या प्रदेशातील हिंदूंचा विश्वास कायम राखणे हा दान देण्यामागचा हेतु आहे. त्याच्या अंमलाखालील श्रीरंगपट्टण, नंजनगुडू, म्हैसुरू प्रदेशातील जनेतेचा विश्वास राखून आपली राजवट आणखी बळकट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्या प्रदेशात काही अन्याय केला. ते अन्याय केला नसता तर त्याला समाधान झाले नसते. उदाहरणार्थ, श्रीरंगपट्टणमधील अंजनेय मंदिर पाडून मशीद बांधली. मात्र, तेथील रंगनाथ स्वामी देवस्थानच्या नादी लागला नाही - कारण तेच त्या प्रदेशाचे अधिदैवत. म्हैसुरुतही राजवाडा पाडून काही मंदिरे नष्ट केली. मात्र, त्याने दूरच्या कोडगू, मलबारमध्ये घोर अन्याय केला. त्याविषयीचे स्पष्ट पुरावे आहेत. त्याने दिलेले दान त्याने केलेल्या घोर अन्यायावर पडदा टाकण्यास असमर्थ ठरले आहेत. आताचे राजकारणी, गर्भश्रीमंत देवस्थानांना भेटी दिल्याच्या प्रसारमाध्यमात बातम्या होतात. त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्याही बातम्या बनतात. मात्र, गरीब देवस्थानात जातात ते खऱ्या भक्तीने; त्यांनी अर्पण केलेल्या वस्तू मोठ्या बातम्या बनत नाहीत. तेवढेच नव्हे तर ती बातमीच नाही.
टिपूचे क्रौर्य, मतांधता, हे तर स्पष्टातिस्पष्ट आहे. हे त्याच्या शिलालेख, हस्तलिखिते (उदाहणारणासाठी : केरळच्या आपल्या सेनापतीला लिहिलेले पत्र - You sHould capture and kill all hindus). त्याच्या तलवारीवर लिहिलेले (''This Victorious... ... is lightning to kill all kafirs''), त्याच्या मुलाच्या पुस्तकातील उल्लेख आदी मूलभूत पुरावे हे सूचित करतात.  त्याचे अंतरंग, धोरण, मन - त्याच्याही पूर्वीच्या उत्तर भारतातील घोरी, गजनी, बाबर, औरंगजेब यांची परंपरा त्याने पुढे नेली. कुवेंपु यांनी आपल्या एका मुलाखतीत एक गोष्ट सांगितली आहे. बांग्लामुक्तीच्या पार्श्वभूमीवर - 'ते (बांग्लामुक्ती) स्पष्ट करण्यासाठी कोणतीही भौतिक कारणे नाहीत.; धार्मिक कारणे आहेत. त्यामुळेच आपण हिंदू धर्मासाठी प्राण द्यायला हवे, असे म्हणतो. मात्र, मुस्लिम धर्मासाठी प्राण घ्यायला हवे, असे म्हणतात. इतकाच फरक आहे.' अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डाॅ. सी. पी. कृष्णकुमार यांनी पूर्वी डाॅ. कुवेंपू यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी हे सांगितले. डाॅ. पी. पी. कृष्णकुमार यांनी २१ जानेवारी २०१३ रोजी मला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. - ''टिपू विवादाशी संबंधित हे पत्र - कुवेंपू यांच्या साहित्यात; काव्यात, 'मलेगळल्ली मदुमगळु' कादंबरीसह सर्वत्र मुस्लिम विरोधी अभिप्राय आहे. त्यांनी मी वर उल्लेखिलेले कुवेंपु यांचे वक्तव्य माझ्या निदर्शनास आणून दिले. हे मृतप्राय भारतीयांना खडबडून जागे करणाऱ्या डिंडिमासारखे होय. एकूणच टिपूच्या मुस्लिम मनोधर्माचा हा एक नमुना होय. याला काही अपवादही आहेत. खंडितच सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.
पर्शियन राज्यभाषा : टिपू सत्तेवर येईतोवर म्हैसुरूची राज्यभाषा अथवा प्रशासकीय भाषा कन्नड हीच होती. टिपूने ती रद्द करुन त्या जागी पर्शयिन अथवा पर्सो - अरेबिक (Perso - Arebic) भाषेला स्थान दिले. त्याचे सगळे शिलालेख, आदेशपत्रे पर्शियन भाषेत आहेत. त्या काळी खुपच कमी प्रमाणात कन्नड भाषेचा वापर केला जात होता, मध्यम प्रमाणात पर्शयिन आणि मराठी भाषेचा वापर केला जात होता. सर्वोच्च पातळीवर केवळ पर्शियन भाषेचा वापर केला जात होता. टिपूनंतर सत्तेवर आलेल्या म्हैसुरूच्या राजांनी पुन्हा प्रशासकीय भाषा म्हणून कन्नड भाषेचा वापर सुरू केला. लक्ष वेधण्याची बाब म्हणजे - हैदर, टिपू यांच्यापूर्वीच्या हिंदू राजांच्या काळात शेकडो साहित्यांची निर्मिती झाली. टिपूच्या राजवटीत त्याच्या प्रोत्साहनाने कन्नडमध्ये कोणतेच साहित्य निर्माण झाले नाही. (वाचा - आर. नरसिंहाचार ; कर्नाटक कविचरित्रे). परंतु कोणत्याही कवी अथवा रचनाकाराने हैदर अथवा टिपूचा उल्लेख केला नाही. मात्र, म्हेसुरूच्या राजांनी दिलेले प्रोत्साहन सर्वज्ञात आहे.
(लेखक ज्येष्ठ संशोधक, साहित्यिक आहेत. )
साभार : विजयवाणी





Sunday 29 October 2017

बेंद्रे यांच्या साहित्यातील शरण तत्त्वाचे चिंतन

बाराव्या शतकात  बसवण्णा, अल्लमप्रभू आदि शरणांनी लोकभाषा कन्नडमधील वचन साहित्याच्या माध्यमातून कर्नाटकात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जागृती घडवली. कर्नाटकातीलच ज्ञानपीठ विजेते महाकवी द. रा. बेंद्रे यांनी शरणतत्त्व हाच आपला श्वास मानला. गेल्या शतकात शरणांच्या विषयी विविध साहित्य लिहिले गेले. मात्र, काव्य माध्यमातून ते समर्थपणे अभिव्यक्त करणारे आणि लौकिक भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वचनशैलीचा वापर करणारे  नवोदय काव्याचे प्रमुख कवी असलेले बेंदे हे पहिले कवी होते. त्यांच्या साहित्याचे जीवनभर आद्यांतापर्यंत अभ्यास, त्यांची जनपद भाषा, त्यांचा आध्यात्मिक मनोभाव याचा दर्शन केलेले डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी त्यांच्या साहित्यातील शरणतत्त्वांच्या चिंतनाचे आपल्या 'बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने' या पुस्तकात निरुपण केले आहे. ३६ पुस्तकांतही मावणार नाही अशा शरण संस्कृती, शरण दर्शनाचं सार त्यांनी 'गागर में सागर' याप्रमाणे केवळ ३६ पानांत निरुपिले आहे. इतक्या संक्षिप्तपणे केलेले हे निरुपण ग्रंथकर्त्याच्या अगाध अभ्यासाचे फळ म्हणावे लागेल.
शरणक्षेत्र धारवाडमध्ये बेंद्रे यंचा जन्म झाला. जाती, मत, पंथ, सोवळेओवळे, श्रीमंती, गरीबी हा भेद त्यांच्या मनाला शिवला नाही. वेदांचे पाठ, जंगमांची वचने,  करडीकुणित (स्थानिक लोकनृत्य), बयलाट आदि जीवपोषक द्रव्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. मात्र, ते पाश्चात्त्य प्रेरणेला बळी  पडले नाहीत.  देशी प्रज्ञेने त्यांचे काव्य फुलले. त्यांना सर्वज्ञ, हरिहर, लक्ष्मीश, वचनकार आणि हरिदासांविषयी आत्मीयता होती. 'बेळगु' काव्यासाठी त्यांनी सदानंद जंगम हे काव्यनाम स्वीकारले. १९२० - २१ मध्ये 'नोविन बेले', 'हिग्गिन नेले' आदि वचने लिहिल्याचे 'उय्याले' काव्यसंग्रहाच्या मनोगतात बेंद्रे यांनी सांगितले आहे. 'उय्याले'  मधील 'करुळीन वचनगळू'  वात्सल्यांची रसलहरीच. गर्भवती स्त्रीमध्ये अपत्यप्राप्तीचा अनुभव अलौकिक शक्ती निर्माण करते, हे सांगणाऱ्या 'अलौकिक' वचनांत  अल्लमप्रभूंच्या वचनांचा प्रभाव दिसतो.
बेंद्रे यांचे 'दवन हुण्णिमेय जात्रेय रात्री' हे काव्य शिवाचे प्रतीक आहे. लेखक कृष्णप्पा म्हणतात की, शिवध्यानी बेंद्रे यांनी प्रकृतीत अनुभवलेले लिंगवैभव भारतीय साहित्यातच विशिष्ट आहे. निसर्गातील समतत्त्व, त्याच्या अमृत पोषणामुळे जगणारे सकल जीवराशी, त्यावरील विश्वासाला पात्र शिवरुप हेच बेंद्रे यांचे शिवानुभव. वेद, उपनिषदांचे सार जाणून बसवण्णांनी संपूर्ण मानवजात एकच हे तत्त्व सांगण्यासाठी सामाजिक क्रांती घडवली. कायकतत्त्वापासून दार्शनिकत्वापर्यंत त्यांनी ध्वजा फडकावली. असे क्रांतिकारी बसवण्णा बेंद्रे यांच्यासाठी महात्मा होते. त्यांनी 'वृषभोरोरविती' हे काव्य रचले. भूतदयेचे साक्षात्कारी बसवण्णा हे समानतेचे पुरस्कर्ते असल्याचे बेंद्रे यांनी या काव्यात सांगितले आहे. 'कर्नाटकद इतिहास पुरुषरू' या प्रकरणात कृष्णप्पा यांनी बसवण्णा, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांच्याविषयीचे बेंद्रे यांचे चिंतन मांडले आहे. 'तुंबी बंदीत्तु' या रुपकात्मक काव्यातून बसवादि शरणांच्या मधुरभावाचे मधुर जीवन सकल जनांत भरुन गेल्याचा काल मांडल्याचे सांगितले आहे.
बेंद्रे १९४४ ते १९५६ पर्यंत सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात होते. त्यामुळे त्यांच्या सिद्धराम या प्रकरणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. सोलापुरात आल्या वर्षीच वयाला आलेला मुलगा रामचंद्र, पुढच्या सात दिवसांतच लहान मुलगा आनंद याचे निधन झाले. बेंद्रे यांना तीव्र दु:ख झाले. अशाप्रसंगी सिद्धरामेश्वर देवस्थानची त्यांच्या आध्यात्मिक साधनेत प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी सिद्धरामेश्वरांचे कायततत्त्व, लिंगांग सामरस्य आणि  स्त्री, सोनेनाणे या विषयांच्या मोहापलिकडील सिद्धत्व, साधनामार्ग याविषयी 'सिद्धरामर वचनवन्नु नेनेदु' हे काव्य रचले. 'चेन्नलिंगवे' या काव्यातून त्यांचे मित्र तत्त्वचिंतक हलसंगीचे मधुरचेन्न यांच्याविषयीचा, विनायक गोकाक, शंकरगौड पाटील, शिंपी लिंगण्णा यांच्याविषयीच्या  बेंद्रे यांच्या शरणबंधुत्वावर 'शरण बांधव्य' या प्रकरणात लेखकाने प्रकाश टाकला आहे. बेंद्रे यांचे शिवध्यानातील भावैक्य सामरस्य, भक्त,  प्राण, लिंग, शक्ती, इष्टलिंग याविषयीच्या चिंतनाचे कृष्णप्पा यांनी सुलभपणे निरुपण केले आहे. एकूणच शरणांनी वचनसाहित्य, शिवभक्ती, कायतत्त्वानुसार जीवन, दासोह आणि आध्यात्मिकता या माध्यमातून केलेल्या ऐतिहासिक  कार्याविषयी बेंद्रे यांनी म्हटले आहे, ' कन्नड शिवशरणांनी आपल्या भक्तीच्या युक्तीने कैलासाला कल्याणला आणण्यासाठी केलेली अद्भुत साधना कर्नाटकाच्या,  नव्हे भारताच्या, तेवढेच काय संपूर्ण जगाच्या इतिहासात रोमहर्षक आहे.
डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी जानेवारी २०१५ पासून बसव समितीच्या 'बसव पथ' मासिकाच्या कन्नड आवृत्तीत सलग चार महिने बेंद्रे यांच्या साहित्यात शरण चिंतन ही लेखमाला लिहिली. या माध्यमातून त्यांनी बेंद्रे यांच्या साहित्याला व्यापलेल्या शरण चिंतनावर टाकलेल्या प्रकाशाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या लेखमालेचा अमूल्य ठेवा पुस्तकरुपात बंगळुरुच्या वंशी प्रकाशनाद्वारे वाचकांसमोर आणला आहे. योगी अरविंद यांचे चिंतन, कवी कुवेंपु यांच्या काव्याचे समग्र चिंतन केलेले ज्येष्ठ साहित्यिक को. चेन्नबसप्पा यांची प्रस्तावना लाभली आहे.
बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने
लेखक : डा. जी. कृष्णप्पा
प्रकाशक : वंशी प्रकाशन,  बंगळुरू
किंमत :  ३० रुपये

Sunday 9 April 2017

शिवयोगिनी अक्कमहादेवी

सोमवार, दि. १० मार्च २०१७ रोजी चैत्र पौर्णिमा. शिवयोगिनी अक्कमहादेवी यांचा जन्मदिवस. यानिमित्त  डाॅ. शिवानंद शिवाचार्य स्वामी यांचा कन्नड बोधीवृक्ष पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा लेख. 
कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवदु.
कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु.
वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण.
करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु.
जीविसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप.
ईविल्लद जीविय बाळुवे एतक्के
बातेयय्या चेन्नमल्लिकार्जुना ?
हे अक्कमहादेवीचे वचन. या वचनात अक्कमहादेवीने सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. तिने या वचनात सांगितलेली एकेक गोष्ट 'आदरणीय' आणि 'अवधारणीय' आहे. तिने सांगितलेल्या कानगोष्टी आपण  अंगिकारल्यास दु:ख, संकटे, अडचणी, तापत्रय हे आपल्या जीवनात जवळही फिरकणार नाहीत. या वचनात अक्कमहादेवीने आनंद मिळवण्यासाठी डोळे, कान, हाताने काय करावे, काय काय करावे ? याविषयी मार्गदर्शन केले आहे.

अक्कमहादेवी ‘कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवुदु’ (डोळ्यांना श्रृंगार गुरुज्येष्ठांना पाहण्याचे) म्हणून सांगते. कण्गे म्हणजे कण्णुगळिगे (डोळ्यांना) असा अर्थ. डोळ्यांना काय श्रृंगार, तो कोणता श्रृंगार असे विचारल्यावर अक्कमहादेवी सांगते, गुरू, ज्येष्ठांना  डोळे भरुन पाहणे म्हणजे डोळ्यांना श्रृंगार.  डोळ्यांसाठी नित्य गुरू, ज्येष्ठांच्या दर्शनाशिवाय आणखी कोणते मोठे श्रृंगार ? अक्कमहादेवी आणखी सांगते, कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु. कर्ण म्हणजे कान. कानांसाठी कोणते श्रृंगार हे विचारल्यावर संगीत ऐकायचे, असे अक्कमहादेवी म्हणते. तिने त्या काळातही संगीत ऐकावे असे सांगितले आहे तर मग आजचे संगीत ऐकणाऱ्या आम्हा लोकांची काय स्थिती असेल ? हा टिकेचाच विषय आहे.
अक्कमहादेवी पुन्हा सांगते, वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण. बोलता बोलता सद्भक्तांच्या शब्दसंपत्तीचा वापर केल्यास त्याहून मोठे श्रृंगार ते कोणते ?  श्रृंगार म्हणजे भूषण. सद्भक्तांची वचने आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवतात. शरण आणि सद्भक्तांच्या वचनांत विशेष काय आहे? अशी विचारणा करणाऱ्यांनी जेडर दासिमय्या यांचे हे वचन वाचावे. तेव्हा अशा प्रवृत्तीच्या लोकांना सद्भक्तांच्या वचनाचे सामर्थ्य लक्षात येईल. अक्कमहादेवी पुन्हा सांगते, ' करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु' कर म्हणजे हात. ईवुदु म्हणजे देणे. 'हाताला काय भूषण ?' म्हणून विचारल्यावर अक्कमहादेवी, सत्पात्री दान करणे हे हाताला भूषण असे सांगते. 'जीवीसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप' मिळाप म्हणजे संग, सहवास. गणमिळाप म्हणजे सत्संग, सज्जनसहवास होय. जीवनाला एक अर्थ प्राप्त व्हावयाचे तर, जीवनाला एक नवा आयाम लाभावयाचे तर सत्संग आवश्यक आहे. तसेच सज्जनांचा सहवास गरजेचा आहे. सज्जन हे आपल्याला जीवनमूल्याचा परिचय करुन देतात. ते आपल्याला जीवन कसे जगावे याची शिकवण देतात. हे समजून न घेणारे लोक बाजाराचा संग करुन चिंतेच्या चितेत जळत राहतात.
अक्कमहादेवी सांगते, 'इविल्लद जीविय बाळुवे एतक्के बातेयय्या चन्नमल्लिकार्जुना?' इविल्लद म्हणजे  हे नसलेले १ गुरुज्येष्ठांचे दर्शन न करता असलेले २ पुरातनांचे संगीत न ऐकता असलेले ३ शरणांच्या वचनांचा आपल्या जीवनात वापर न करणारे ४ सत्पात्री दान न करणारे ५ आजीवन सज्जनांचा सहवास, सत्संग न लाभलेले यांचे जीवन कशालाही उपयोगी नाही.

Saturday 18 March 2017

राजविद्या


धर्मामुळेच जीवनाला समृद्धी, ईश्वराचे दिव्यानुभव, परमशांती मिळते. धर्माअभावी जीव - जगत विनाशाकडे जाईल. एकूण धर्मामुळेच जीव - जग बहरेल. धर्म सोडल्यास मनुष्याला शांती, समाधान मिळू शकणार नाही. हृदयाचे माधुर्य हेच धर्म होय. असा हृदय नसल्यास, आणखी काहीही असले तरी काय प्रयोजन?
घराजवळच रंगीबेरंगी फुलांची बाग आहे. एकही दिवस तेथे गेले नाही. डोळे उघडून पाहिले नाही. हे जगच एक फुलबाग आहे. हे डोळे उघडून पाहण्याचा एक प्रयत्नही केला नाही तर कसे? शंभर वसंतांच्या या जीवनात प्रपंचाच्या बाजारातून एकही दिवस बाहेर आला नाही. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त पाहिला नाही. अनंत आकाशात चमचमणारे तारे पाहिले नाहीत. पक्ष्यांच्या गायनात सूर मिसळले नाहीत. मोराच्या मनमोहक नृत्याचा आनंद अनुभवला नाही. मूक, मुग्ध पशूंच्या डोळ्यांतील निर्मल भावसागरात डुबकी मारली नाही. असे झाले तर शंभर वसंतांचे आमचे जीवन कसे संतोषमय बनेल? 
या सत्यं शिवं सुंदरम् अशा सृष्टीचे मर्म जाणणारी दिव्य  कलाच धर्म होय. जगातील महात्म्यांनी आयुष्यभर अशा धर्माविषयी चिंतन - मंथन केले. देवर दासिमय्या यांनी आपल्या एका सुंदर वचनातून धर्माचे सत्यस्वरुप उलगडून दाखवले आहे. 
धर्मवनेत्तुववर धर्मिगळेंबिरी
निम्म धर्मवनारू अविवरिल्ला!
धर्मगळनिक्की उत्त भूमिय डोणी
निनेत्मनेल्लर नोडी सलहिदै रामनाथ.

कोणीतरी बनवलेले स्वयंपाक आणून देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार्‍यांना काहीजण धर्मवंत म्हणतात. खरे देव, धर्म कोणते हे कोणीही जाणून घेऊ शकतो. परंतु देवाने मात्र विश्‍वातील सकल जीवराशींना फळे, धान्य, पाऊस, वारा, प्रकाश आदी देऊन करुणा दाखवली आहे. त्या महादेवाने दिलेले दुसर्‍यांना देऊन आपण दानधर्म केल्याचे सांगणे, त्याचा अभिमान बाळगणे योग्य आहे? त्या महादेवाने या गर्द हिरव्या निसर्गात करुन ठेवलेले पंचक्वान्नाचे स्वयंपाक साधारण नाही. तो महादेवच महान पाकशास्त्रज्ञ! त्याच्यासारखे फुले, फळे, दूध मध, धान्य बनवणे कोणाला साध्य आहे? धर्मसागर असलेल्या महादेवाने बनवलेले हे स्वयंपाक देवाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने स्वीकारुन संतोषाने राहणे हेच आपले धर्म! आपले कर्तव्य! भगद्गीतेत हे धर्म अथवा आध्यात्मिक विद्येच्या संदर्भात खुपच सुंदर वर्णन केले आहे- 
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम।
प्रत्यक्षावमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम॥

ही आत्मविद्या सर्व विद्येचा राजा होय. तेवढेच नाही ही अत्यंत श्रेष्ठ, पवित्र, मंगलकारी, धर्मस्वरुपी आहे. अनुसरण्यास सुलभ आहे. अविनाशी आहे!
हसत हसत सदा प्रसन्नचित्त राहणे हेच धर्म होय. ही आध्यात्मविद्या, राजविद्या आहे. गंभीर राहणे हे कष्टदायक आहे. सतत हसत हसत संतोषमय, विजयी भावाने राहणे हे काही फारसे कष्टाचे नाही. हृदय स्वच्छ अथवा मन मुग्ध बालकाचे बनल्यास पुरेसे आहे. हसर्‍या चेहर्‍याचे झोपडीत असले तरी ते राजवाड्यासारखे वाटते. रडक्या चेहर्‍याचे राजवाड्यात असले तरी ती झोपडीपेक्षाही कनिष्ट वाटते. 
एका श्रीमंताच्या घरासमोरील झाडावर बसून एक पक्षी दिवस उजाडताच गात होते. एके दिवशी श्रीमंत पक्ष्याला विचारला, “तू सतत इतक्या खुशीत गातोस कसा काय? अपार संपत्ती गोळा करुन ठेवलास काय?’’ पक्ष्याने सांगितले, “ या झाडावर असलले गवत, काड्यांचे घरटे, त्यात असलेले दोन अंडे हेच माझी संपत्ती. तरीही आम्ही गात राहतो. कारण आमचा जन्मच गाण्यासाठी, आकाशात उडडण्यासाठी झाला आहे. तुमच्याप्रमाणे जमीन धरुन बसायला नव्हे!!’’ हसतहसत जगायला आणखी कशाची आवश्यकता नाही, निर्मल हृदय हे एक असले तर पुरेसे आहे, याची जाणीव श्रीमंताला आता झाली. 
हजारो वर्षांपूर्वी याच भूमीत उपगुप्त नावाचा एक सुप्रसिद्ध बौद्ध संन्यासी होऊन गेला. हा धर्मोपदेश करत एका गावी आला. त्या गावी एगक श्रीमंत नर्तकी होती. तिच्या सौंदर्यावर, संगीतावर फिदा होऊन त्या गावातील लोक आपली संपत्ती उधळायचे. उपगुप्त तिच्या घरी भिक्षेसाठी गेला. उपगुप्ताच्या सौंदर्याला भाळलेली नर्तकी स्वत:सह आपली संपत्ती त्याला अर्पण करण्यास सिद्ध झाली. उपगुप्त सांगितला - “ मी आता अन्नाच्या भिक्षेसाठी आलो आहे, सोन्याच्या भिक्षेसाठी नव्हे; योग्य वेळ येताच मी परत येईन. त्यावेळी आणखी काहीतीर वेगळं दे!’’आज नाही तर उद्या कधीतरी उपगुप्त येईल, या भरवशाने नर्तकी गप्प बसली. काळ गेला. नर्तकीला महारोग झाला. सर्व गावकर्‍यांनी तिला गावाबाहेर हाकलून लावले आणि तिची संपत्ती हडपली. तेथे असलेल्या प्रेतांच्या मध्ये ती जीवंत शव बनून राहिली. तेवढ्यातच “बुद्धं शरणं गच्छामि’’ हे शब्द कानावर पडले. हा उपगुप्ताचाच आवाज असावा म्हणून ती डोळे उघडून पाहिली.समोर तोच उभा होता. ती म्हणाली, “हीच काय तू सांगतिलेली योग्य वेळ?’’ “होय, तू मागचं सर्व विसरून जा. सर्व जग आपली साथ सोडल्यावर आपल्याविषयी करुणा दाखवून धर्ममार्गावर नेऊन निर्वाण अथवा मोक्ष प्राप्त करुन देतात तेच खरे बंधू -नातीगोती, गुरू, देव, सर्वस्व!! असे उपगुप्तने सांगितले. हे उपदेशामृत ऐकता क्षणी नर्तकी हसत - हसत देवलोकापर्यंत पोहोचली. मृत्यूच्या वेळीही अमरत्वाचे अमृतानुभव देणेच धर्म अथवा अध्यात्म! हीच राजविद्या!!

Wednesday 15 March 2017

समरसतेचे मंदिर खुले झाले!

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंढरपुरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी

 मंदिर बडवे - उत्पातांच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर नुकतेच

 पुजारीपदाच्या भरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यांच्या निवडीही

 लवकरच जाहीर होतील. यात पुरुषांसह महिलांनाही संधी मिळण्याची 

शक्यता आहे. साने गुरुजींच्या हे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या 

समरसतावादी लढ्याला नुकतीच 10 मे रोजी 67 वर्षे पूर्ण झाली. त्या 

पार्श्‍वभूमीवर पुजार्‍यांच्या निवडीने हे मंदिर सर्वार्थाने मुक्त होणार आहे. 

तसेच हे परिवर्तन सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या क्रांतिकारी 

ठरणार आहे.


भक्त पुंडलिकाच्या भक्तिपोटी लोककल्याणासाठी श्री विठ्ठल, रुक्मिणी 

मातेसह भूवैकुंठी पंढरीत अवतरला. तो खरा तर लोकदेव. मात्र, लाखो 

वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाला गेल्या अनेक शतकांपासून 

बडवे - उत्पात मंडळींनी जखडून ठेवले होते. त्यांनी संत, महंतांपसून 

सर्वसामान्य वारकर्‍यांपर्यंत सर्वांनाच छळले. श्री संत चोखामेळा यांच्या 

धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही 

तरी अपराध॥’ या अभंगातून हे स्पष्ट होते. धर्म नीटसे समजून न घेता 

त्याच्या नावाखाली सर्वसामान्य वारकर्‍याला नागवण्याचाच प्रकार विठ्ठल 

मंदिरात सुरू होता. केवळ मंदिरात येणार्‍या अमाप पैशासाठी सामान्य 

भाविकाला दूर लोटण्यात येत होते. तर मागल्या दाराने श्रीमंत भक्तांना 

विठ्ठल दर्शन मिळेल, यातच ते खरी धन्यता मानत होते. दक्षिणेसाठी 

भाविकांचा छळ मांडला जात होता. त्यामुळे वारकर्‍यांनी बडवे, उत्पात व 

सेवाधारी यांना मंदिरातून हद्दपार करण्याची मागणी सुरू केली. 

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच या मागणीने जोर धरला होता.


या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी 1967 मध्ये आळंदी यात्रेत वारकरी 

महामंडळाची स्थापना झाली आणि त्याला वेग आला. बडवे - उत्पात

 यांच्या विरोधातील वाढती नाराजी लक्षात घेऊन 1968 मध्ये तत्कालीन

 मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. डी नाडकर्णी

 यांचा आयोग नेमला. या आयोगाने 1970 मध्ये राज्य शासनाला अहवाल 

दिला. बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे हक्क, अधिकार व विशेषाधिकार 

रद्दबातल करावेत, देवतांच्या पूजेसाठी नोकर नेमावेत, धार्मिक देवालय 

राजकारणापासून अलिप्त राखावे, देवळाच्या भागात दक्षिणा / ओवाळणी 

मागण्यास सक्त मनाई असावी, प्रांत दर्जाचा अधिकारी व्यवस्थापक 

असावा, अशा शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. त्यानंतरच्या तीन 

वर्षांमध्ये या अहवालावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने वारकर्‍यांनी 

1973 मध्ये मुंबईत उपोषण सुरू केल्याने शासनाला पंढरपूर मंदिर 

अधिनियम 1973 हा कायदा करणे भाग पडले. त्यामुळे बडवे - उत्पातांचे 

मंदिरातील वर्चस्व संपुष्टात आले. मंदिराचे व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द 

केले गेले. परंतु बडवे - उत्पातांनी अधिसूचना प्रसिद्ध होण्याआधीच याला 

आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली 

40 वर्षे बडवे - उत्पात व सेवाधारी यांचा आपल्या हक्कासाठी न्यायालयीन 

लढा सुरू होता. तो गेल्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 

निर्णयाने संपला आणि त्यांचे सर्व अधिकार संपुष्टात आले.


दरम्यान, वेगवेगळ्या स्तरांवरील न्यायालयांनी त्यांच्या विरोधातच निकाल 

होते. मंदिर व्यवस्थापन देवस्थान समितीच्या हाती गेल्यानंतरही बडवे - 

उत्पात व सेवाधारी यांची भूमिका मंदिर परिसर विकास व भाविकांना

 सोयी सुविधा निर्माण करण्यातही अडचणीची ठरत होती.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर समितीने श्री विठ्ठल - रुक्मिणी व 

मंदिरातील विविध देवतांच्या पूजाअर्चा, नित्योपचार, विधी व नैमित्तिक 

पोषाख करणे आदींविषयीचे बडवे -उत्पात व सेवाधारी यांचे अधिकार 

काढून घेतले. मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत ही सर्व कार्ये सुरू

 आहेत. 

दरम्यान, मंदिर समितीने पुजारी निवडीसाठी भरती प्रक्रिया राबवली. 

राज्यभरातून 199 अर्ज यासाठी आले होते. त्यापैकी 176 जणांनी मुलाखती 

दिल्या आहेत. त्यात 23 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मंदिर 

समितीच्या येत्या बैठकीत पुजार्‍यांची निवड जाहीर होईल. यात हिंदू 

धर्मातील कोणत्याही जातीच्या आणि विशेषत: महिलांनाही श्री विठ्ठल - 

रुक्मिणीची पूजा - अर्चा करण्याची संधी मिळू शकते. वाल्मिकी, व्यास 

यांच्यासह अनेक समाजाच्या शेवटच्या वर्गातील मंडळी आपल्या ज्ञानाच्या 

आणि तपोबळाच्या आधारावर ऋषी पदावर पोहोचले. ते हिंदू समाजाचे 

आराध्य बनले. तर गार्गी, मैत्रेयी अशा तत्त्वज्ञही झाल्या. मात्र, कालौघात 

धर्माचे नीटसे आकलन न करुन घेतल्याने जातीव्यवस्था, अस्पृश्यता या 

बेड्यांनी हिंदू समाज जखडला गेला. तर स्त्रियांना चार भिंतींपूरते सीमित 

केले गेले. सध्या सुरू असलेल्या समरस समाजजीवनाची निर्मिती आणि 

स्त्रीशक्ती जागरणाच्या प्रयत्नांना या घटनेने बळ मिळणार आहे.


साने गुरुजी यांच्या श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या

 आंदोलनाला 67 वर्षे पूर्ण होत असतानाच विठ्ठल मंदिरातील पुजारी

 भरतीची प्रक्रिया पार पडल्याने त्यांनी समरस समाजनिर्मितीसाठी सुरू

 केलेल्या लढ्याचेच हे यश म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत

 सांगायचे तर, आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून

 सामाजिक  सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा

 प्रयत्न ज्यांनी  केला, त्यांना अपयश मिळाल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी

 फारच  थोड्यांनी स्वत: अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी

 असलेल्या  आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक साधना तर

 एकाचीही झाली नव्हती. समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर

 धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने.’ साने गुरूजी हे जाणून होते.

 आपण  धर्ममय मनुष्य’ असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी धार्मिक हक्कांनाही

 महत्व असल्याचे ठामपणे सांगितले. मनुष्य हा केवळ दिडक्यांवर जगत 

नाही. त्याला मन आहे, हृदय आहे, आत्मा आहे. स्वाभिमान आहे, प्रतिष्ठा

 आहे.’ 

म्हणून केवळ आर्थिक परिस्थिती सुधारुन हा प्रश्‍न सुटणार नाही, असे त्यांचे 

मत होते. त्यामुळेच त्यांचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठीचे आंदोलन 

यशस्वी होऊ शकले. मात्र, त्यांच्यानंतर या आंदोलनाची धुरा वाहणार्‍या 

मंडळींच्या धर्मविरोधी भूमिकेमुळेच पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या 

महाराष्ट्रात अशाप्रकारचे धार्मिक बदल घडण्यात खरी अडचण निर्माण 

होत आहे. कारण दक्षिण भारतात याआधीच हे होऊ शकले. शिवाय गेल्या 

(2013) ऑक्टोबर महिन्यात मंगळूरू (कर्नाटक) जवळील कुद्रोली 

गावातील 100 वर्षांच्या जुन्या मंदिरात दोन विधवा महिलांची पुजारी म्हणून 

नियुक्ती झाली.


आता पगारी पुजार्‍यांची नेमणूक होणार असल्याने भाविकांना बडवे - 

उत्पातांच्या छळाचा सामना करावा लागणार नाही. मात्र, मंदिर समितीच्या 

कारभारातही सुधारणा होणे गरजेचे आहे. दर्शनापासून वेगवेगळ्या

 सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार

 आहे. 

भाविक धर्मकार्य व सेवाकार्यांसाठी देणग्या देतात, याचे भान समितीने 

राखणे आवश्यक आहे. परंतु समितीवर असलेले राजकीय नेतेमंडळींचे 

वर्चस्व पाहता समितीच्या कारभारात सुधारणा होण्याविषयी साशंकताच 

आहे. कारण राजकीय पुनर्वसन म्हणूनच या समित्यांकडे पाहण्याचा 

राजकीय पक्षांचा   दृष्टिकोन आहे. त्यामुळे नाडकर्णी आयोगाच्या 

शिफारशीनुसार धार्मिक देवस्थाने राजकारणापासून अलिप्त राखण्याची 

गरज आहे. त्यासाठीही आता चळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे.




Monday 6 March 2017

हास्य - योग






धर्म हे आपल्या जीवनाला समृध्द, संतृप्त करणारे माध्यम आहे. आपले तन, मन, बुद्धी, भाव हे सर्व धर्ममय व्हायला हवेत, तेव्हा आपले जीवन सुंदर बनेल. आपल्या जगातील सर्व समस्यांना धर्माचे अभाव हेच कारण आहे. आपले वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी हे सर्व योग्य आणि सुंदर असावेत. हेच धर्म होय. अन्यथा ते अधर्म होय. त्यामुळे पारिवारिक आरोग्य, सामाजिक सौहार्द बिघडते. युद्ध, कलह, कोलाहल निर्माण होते. एकूणच या जगात सर्व संकटांना धर्माचे अभाव हेच कारण होय. आपले जीवन धर्ममय बनल्यास जगातील सर्व समस्यांचे आपोआप परिहार होईल. 
एखादे सुंदर कापड तयार करावयाचे झाल्यास त्यातले सर्व ताणे - बाणे चांगले असायला हवेत. ताणे म्हणजे उभे धागे, बाणे म्हणजे आडवे धागे. प्रत्येक ताण्या - बाण्याचे वर्ण, गात्र व भूमिका सर्व चांगले असायला हवे. एखादे धागे चांगले नसल्यास कापड आपले मूल्य, सौंदर्य गमावून बसेल. त्याच प्रकारे आपल्या जीवनाचे कापडही चांगले व्हावयाचे असल्यास प्रतिक्षणी आपले वागणे - बोलणे सर्व चांगले असायला हवे. जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एकदम दिवस, महिना, वर्ष बनून जीवन आपल्याकडे येत नाही. एकेक क्षणाने ते आपल्याकडे येते. या क्षणीचे आपले वागणे - बोलणे यावरच आपले संपूर्ण जीवन अवलंबून आहे. कितीही मोठे घर असले तरी त्याची सुरुवात एका विटेनीच सुरुवात होते. एक एक वीट जुळूनच महाल बनते. एखादे वीट अथवा दगड चांगले नसल्यास त्या घराच्या सौंदर्याला बाधा आणते. आपले प्रत्येक पाऊल आपल्या जीवनाला आकार देते.
एखादे लहान मूल खेळल्यास, बोलल्यास, पळाल्यास, उभा राहिल्यास, पडल्यास, हसल्यास, रडल्यास, शेवटी गप्प झोपल्यासही ते सर्वांना आवडते. त्याचे चालणे, बोलणे तेवढे पवित्र, परिशुद्ध असते. आपलेही वागणे - बोलणे त्या बाळासारखे झाल्यास केवळ मानवजातच नव्हे तर साक्षात् महादेवालाही ते आवडेल. 
कंड भक्तरिगे कै मुगिवातने भक्त,मृदु वचनवे सकल जपंगळय्या,मृदु वचनवे सकल तपंगळय्या,सदुविनयवे सदाशिवन वलुमेयय्या,कूडलसंगय्यनंतल्लदोल्लनय्या
मराठी : भक्तासी बघुनी जोडी जो हात, तोच भक्त जाण या जगी!मृदुवाणितचि असे सारे जप!मृदुवाणितचि असे सारे तप!सद्विनयाने सदाशिवाची होई करुणा,कूडलसंगमेशासी न रुचे याविना!
जप, तप म्हणजे केवळ अरण्यात जाऊन, कंदमुळे खाऊन करावयाचे व्रताचरण नव्हे. आपले दैनंदिन वागणे - बोलणे, आचार - विचार, भाव - बुद्धी परिशुद्ध, पवित्र व्हायला हवे. विनयशील असावे. याच्याहून श्रेष्ठ जप - तप, रीती -नीती, योग - धर्म कोणते आहे? असे मृदुमधुर जीवन जगणारेच सर्वांना प्रिय असलेले संत - शरण होत. 
सुकरात एक महान तत्त्वज्ञानी होता. ती अशी मोठी व्यक्ती होती की, संपूर्ण युरोप त्याला कधीही विसरणे शक्य नाही. तेथील युवक त्याचे मार्गदर्शन ऐकायला धडपडत असत. मात्र, सुकरातचे आपल्या घराकडे, संसाराकडे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी झांतीपी त्याला पदोपदी बोलायची. सुकरात मात्र हसत हसतच असायचा. एका दिवशीही तो पत्नीला उलट बोलत नव्हता. एके दिवशी मित्रांनी विचारले, - “असल्या भांडखोर पत्नीशी काय संसार करतो, तिला सोडत का नाहीस?’’ सुकरात म्हणाला, -“मला तत्त्वज्ञानी बनवणारी तीच आहे.’’ झांतीपीलाही तिच्या मैत्रिणींनी विचारले, -“ अशा वाईट नवर्‍याशी कसा संसार करतेस, त्याला का सोडत नाहीस?’’ झांतीपी म्हणाली, -“ असा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पती मला कुठे मिळेल? मी दिवसातून 24 तास कितीही बोलले तरी तो हसत हसतच असतो. एकही शब्द तो उलट बोलत नाही. मला असा पती मिळाला, हे माझे पुण्यच आहे!’’

सुकरात ऐश्‍वर्य, संपत्ती मिळवायचे शिकला नव्हता. तो जगायचे कसे हे शिकला होता. तो हसत हसत जगायची कला शिकवत होता. आपल्या प्रांतात होऊन गेलेले नगेमारी तंदे हे घरोघरी जाऊन सर्वांना हसवायचे. “संपूर्ण जगचे ओझे वाहिल्यासारखे का गंभीर झाला आहात? थोडेसे ईश्‍वराची आराधना करत हसत हसत जगा!’’ असे ते मार्गदर्शन करायचे. हास्य हेच एक योग आहे. जगातील सर्व समस्यांना हास्य हेच दिव्यऔषधी यावर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता. जीवनभर सर्वांना हसवत, स्वत: हसत, सदा प्रसन्नचित्त राहणारे नगेमारी तंदे यांचे जीवन हेच धर्मजीवन! असे सुंदर जीवन आपण कधी जगणार!
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्‍वत:।नित्यं सन्निहितो मृत्यू: कर्तव्यो धर्मसंग्रह:॥
                                                     (सुभाषित मंजिरी)
हे शरीर अनित्य आहे. संपत्ती शाश्‍वत नाही. मृत्यू सतत जवळच असते. धर्ममार्गावर चालणे हेच आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य बनले आहे.
अंगवे भूमियागी लिंगवे बेळेयागीविश्‍वावेंब बित्तु बलिदु उंडु सुखियागिरबेकुकामभीम जीवधनदोडेय. 
वक्कलिग मुद्दण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीररुपी भूमीत आत्मविश्‍वासाचे बीज पेरुन लिंगांगाचे, ब्रह्मानंदाचे पीक घेऊन सदासुखी व्हायला हवे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे धर्मजीवन होय. कसल्याही संकटात सतत हसत प्रसन्नचित्ताने राहायचे. हेच हास्ययोग!!

Friday 3 March 2017

धर्मजीवन : पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामी यांची प्रवचने

 

विजयपूरचे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रवचनावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वामीजी हे शिवशरण श्री अल्लमप्रभू यांच्या वचनसाहित्याचे भाष्यकार आहेत. त्यांच्या प्रवचनावर आधारित बहुतांश साहित्य हे कन्नड भाषेत आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांचे अनुवाद झाले आहे. अजुन मोठ्या प्रमाणातील साहित्य अनुवाद होणे बाकी आहे. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिकार हे विजयपूरच्या ज्ञानयोग फाउंडेशनकडे आहेत. श्री स्वामीजींचे साहित्य मराठी भाषकांपर्यंतही पोहोचावे, या एकाच उद्देशाने त्यांचे साहित्य मराठीत ब्लाॅगवर उपलब्ध करुन देत आहे, यामागे कोणताही अन्य हेतू नाही. मात्र, कोणीही ज्ञानयोग फाउंडेशनच्या पूर्वपरवानगीशिवाय या साहित्याचा वापर करू नये. 

................................................................................................................................................................

२०१३ मध्ये बीदर जिल्ह्यातील औराद येथे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे आध्यात्मिक प्रवचन झाले. श्री गुरुदेवांच्या या प्रवचनाचे सारसंग्रह म्हणजे धर्मजीवन हा ग्रंथ. डाॅ. श्री श्रद्धानंद स्वामी यांनी याचे संपादन केले आहे. त्यातील पहिले प्रकरण. 

.....................................................................................................................................................................

शरणधर्म

धर्म हे परमशांतीचे साधन होय. धर्मामुळे अनेक महात्म्यांचे जीवन सुंदर झाले आहे. धर्माने जगाला शांतीचा सुगंध, संतोष, मकरंद प्रदान केला आहे. या जगात मानवनिर्मित धर्म एक, दोन नव्हे, शेकडो, हजारो आहेत. ते कालप्रवाहात काही काळ उन्नत बनून पुन्हा लुप्त होतात.  संपूर्ण जगात नैसर्गिक, खरा धर्म मात्र एकच आहे,  जो नसल्याने जीवन नीरस बनते, तो धर्म होय. सौंदर्य नसलेले फुल फुल नाही. सावली न देणारे झाड नाही. त्याच प्रकारे धर्माविना जीवन जीवन नाही. धर्म हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे जीवनवैभव वाढते. केवळ श्रीमंती - संपत्ती, शिक्षण – बुद्धी यामुळे जीवन समृद्ध होत नाही, ते धर्मामुळे समृद्ध होते. धर्म हे प्रत्येक वस्तूचे सारभूत तत्त्व आहे.
प्रकाश देणे हा दिव्याचा धर्म आहे. प्रवाहित होणे हा पाण्याचा धर्म आहे. फुल सौंदर्यामुळे फुल बनते. मनुष्य धर्मामुळे मनुष्य बनतो. पाहणे हा डोळ्यांचा धर्म आहे. चालणे हा पायांचा धर्म आहे. वाहणे हा वाऱ्याचा धर्म आहे. हा निसर्ग धर्म आहे. हा कोणीही स्थापन केलेला धर्म नाही. सर्व देशांमध्ये, सर्व काळात अस्तित्वात असलेला हा धर्म आहे. 'धम्मं शरणं गच्छामि' असे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी अशा नैसर्गिक धर्माला शरण जायला हवे. ते स्वीकारायला हवे. यालाच शरणधर्म म्हटले जाते.
घर कितीही मोठे असो, छोटे असो, त्यात प्रकाश देणारी एक छोटी पणती हवी. अंधार असलेले घर घर नाही. तसे श्रीमंत असो, गरीब असो त्याच्या अंतरंगातील महाल प्रकाशित करणारी धर्माची ज्योत हवी! अन्यथा तो मनुष्य नव्हे, पशू होय. एखाद्या वेळेस हृदयातील धर्माची ज्योत विझली तर मनुष्य युद्ध, कलह, हत्या, खोटारडेपणा, चोरी आदी अमानुष कृत्ये करतो. धर्मच सुंदर बाग फुलवू शकतो, तर बहरलेली बाग नासधूस करणारे धर्म नव्हे. जेव्हा मनुष्य या लोकांत आला तेव्हाच हा नैसर्गिक धर्मही आला. हाच सत्यधर्म अथवा सद्धर्म होय! सर्वांसाठी नैसर्गिक धर्म एकच आहे. यांच्यासाठी एक, त्यांच्यासाठी एक असा नैसर्गिक धर्म वेगवेगळा नाही. जेथे सत्य आहे,  तेथेच सौंदर्य,  शांती,  मांगल्य आहे. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे सद्धर्माचे सद्लक्षण होय! आपल्या जीवनाच्या अंगणात या धर्माची फुले फुलावीत. केवळ बोलण्याने, विचाराने जीवनाला भव्यदिव्यता येणार नाही. आपल्या अंतरंगात सद्धर्माची ज्योत प्रकाशित झाल्यास आपले जीवन भव्यदिव्य बनेल.
दक्षिण भारतातील एक संत ईश्वरनामाचा महिमा गात भक्तिसुख अनुभवत होते. त्यांची भक्तिगीते ऐकून हजारो लोक धन्य व्हायचे! मात्र, त्या संतांच्या जवळच त्यांना न सहणारे चारजण होते.  कशाप्रकारेही ते त्यांचा अवमान करुन त्यांना तेथून हाकलून देण्याच्या प्रयत्नात होते. एके दिवशी मध्यरात्री त्यांनी जुनी फाटलेली पादत्राणे त्यांच्या घराच्या दरवाजाला बांधली आणि तेथेच ते लपून बसले. पहाटे झोपेतून उठून ते संत स्नानाला नदीवर जण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर पडले त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला पादत्राणे लागली. ते पाहून लपून बसलेल्या लोकांना न मावणारा आनंद झाला आणि ते हसले. परंतु ते संत मात्र किंचितही विचलित झाले नाहीत; त्यांना रागही आला नाही.  त्याउलट त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली.
केचित ज्ञानावलंबिन: केचित ज्ञानावलंबिन:।
वयंतु हरिदासानां पादरक्षावलंबिन:।।

या जगात काहीजण ज्ञानमार्ग अवलंबतात. तर काहीजण कर्ममार्ग अवलंबतात. मात्र, आपण हरिदासांच्या पादुकांचाच अवलंब केला आहे! ही गोष्ट ऐकताच आपच्या चुकीची जाणीव झाल्याने ते चौघे नंतर त्यांच्या पायावर पडून क्षमा मागतात. आता त्या चौघांतही धर्माची ज्योत प्रकाशित झाली होती!
एका श्रीमंताला दोन धर्मपत्नी होत्या. पहिल्या पत्नीला एक मुलगा होता. दुसऱ्या पत्नीला एकही अपत्य झाले नव्हते. त्यामुळे तो श्रीमंत आणि शेजारीपाजारी पहिल्या पत्नीचेच कौतुक करायचे. दुसऱ्या पत्नीला हे सहन झाले नाही. काहीतरी करून त्या मुलाला संपवून टाकायचा तिने निर्धार केला. तिने तेथे मिठाई विक्रीसाठी येणाऱ्याला सांगितले - “ हे विष तुझ्या मिठाईत कालवून त्या मुलाला दिल्यास तुला हवे तेवढे धन देईन!” त्यावर मिठाई विक्रेता म्हणाला - “मी मिठाई विकणारा आहे, विष विकणारा नव्हे. आपणास शांती - समाधान न देणारे ते धन घेऊन मी काय करू, ते तुमच्याजवळच असूद्या!” त्या मिठाई विक्रेत्याची ही सुंदर गोष्ट ऐकून तिच्या मनातही धर्माची ज्योत प्रकाशित झाली. अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला.  पहिलीच्या मुलालाच आपले मूल मानून त्याच्यावर प्रेम करू लागली. तिचे विशाल हृदय पाहून गावकरी पहिलीपेक्षा दुसरीचाच अधिक गौरव करू लागले. द्वेषाचा अंधकार संपून प्रेमाचा प्रकाश प्रदान करणारीच धर्मज्योती! हाच शरण धर्म!

 




Thursday 2 March 2017

मुजफ्फरनगरविषयी करुणा, काश्मिरी पंडितांविषयी का नाही?


 नाव : सर्वानंद कौल

स्थळ : शाली, अनंतनाग जिल्ह्यातील एक गाव

व्यवसाय : निवृत्त शिक्षक आणि काश्मिरी कवी

सर्वानंद कौल ‘प्रेमी’ म्हणून परिचित होते. जम्मू - काश्मिरच्या शिक्षण खात्यात 23 वर्षे सेवा बजावलेले कौल हे प्रथितयश काश्मिरी साहित्यिक होते. त्यांनी कवी रूपा भवानी आणि संत मिर्झा कक्र यांचे जीवनचरित्र लिहिले. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे काश्मिरी आणि उर्दूत अनुवाद केले. 1924 मध्ये जन्मलेले कौल हे महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभवित झाले होते आणि स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली तरी त्यांची धर्मनिरपेक्षतेवर अढळ निष्ठा होती. 1953 मध्ये शेख अब्दुल्ला यांना झालेली अटक, 1963 मध्ये हजरत बाल मशिदीतून प्रेषित मोहम्मद यांचे पवित्र केस गायब, 1965 मध्ये पाकिस्तानचे आक्रमण, 1967 मधील पंडितांचे आंदोलन, 1968 ची अनंतनाग दंगल आदी घटनांच्या वेळी प्रेमींची लेखणी तलवारीसारखी तळपली होती.

1965 आणि 1971 च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानने भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवादी कारवाया सुरू केल्या. स्वातंत्र्यानंतर इस्लामी मूलतत्त्ववादाचा पहिला प्रयोग काश्मिरमध्ये केला गेला. काश्मिरी खोºयातील हिंदूंना वेचून ठार मारण्यास सुरूवात झाली. संपूर्ण काश्मिर खोºयातील हिंदू भयभीत झाले. जगण्यासाठी काश्मिर खोरे सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 19 जानेवारी 1990 पासून मशिदींवरील लाउडस्पीकरवरुन काश्मिर सोडून जाण्याची धमकी देण्यात येऊ लागली. तरीही धर्मनिरपेक्ष असलेल्या प्रेमी यांचा शेजारपाजारचे मुस्लिम आपले रक्षण करतील, यावर दृढ विश्वास होता. तो दिवस होता 29 एप्रिल 1990 चा. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून तीन बुरखाधारी आत घुसले. सर्व कुटुंबीयांना एका खोलीत जमण्यास सांगितले. घरातील मौल्यवान वस्तू, अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड, साड्या, शालू काढून द्यायला सांगितल्या. अंगावरील दागिनेही सोडले नाहीत. सर्व वस्तू एका सूटकेसमध्ये भरायला लावून ते घेऊन सुखरुपपणे बाहेर सोडण्याचा इशारा प्रेमी यांना केला. कुटुंबीय भयभीत झाले. त्यांना ते म्हणाले, ‘त्यांना कोणताही त्रास देणार नाही, बाहेर गेल्यावर त्यांना परत पाठवू.’ ते ऐकून प्रेमी यांचा 27 वर्षांचा मुलगा विरेंदर कौल हाही त्यांच्यासोबत गेला. दोन दिवसांनंतरही पिता - पुत्र दोघेही घरी परतले नाहीत.

दोन दिवसांनंतर हृदयद्रावक स्थितीत दोन मृतदेह सापडले! प्रेमी दररोज सकाळी देवदर्शनानंतर कपाळावर टिळा लावायचे. अतिरेक्यांनी धारदार शस्त्राने तो भागच चिरला होता. शरीरावरील सर्व भागांवर सिगारेटचे चटके दिले होते. पिता - पुत्र दोघांचेही डोळे फोडून काढले होते. हात - पायही तोडले होते. हुकूमशहा हिटलर वांशिक हत्याकांडापेक्षाही अमानवीयतेने प्रेमी आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली.

तेज कृष्णन राजदान, अशोक कुमार काझी, नवीन सप्रू, पी. एन. कौल, बी. के. गंजू, दीपक गंजू, भूषण लाल रैना, दीननाथ मुजू, गिरिजा टिकू, अशोक सूरी, प्रो. के. एल. गंजू, चुनी लाल शल्ला अशा एकेकाचा मृत्यू एकेक करुणाजनक गोष्ट सांगेल. बॉलिवूड अभिनेता संजय सूरीला ओळखता ना? तोही काश्मिरीच. त्यांच्या वडिलांची त्यांच्या डोळ््यादेखत हत्या झाली. यासंदर्भातील त्यांची मुलाखत वाचल्यास मन विदीर्ण होऊन जाते. काश्मिरमधून हुसकावून लावले गेलेले, भीतीने काश्मिर सोडलेल्यांची संख्या सुमारे सहा लाख असेल तर हत्या झालेल्यांची, अत्याचारांमुळे घाबरुन धर्मांतरण केलेल्यांची संख्या किती? काश्मिरमध्ये हत्या झालेल्या पंडितांची देण्याची मागणी माहिती अधिकारात करण्यात आली. मात्र जम्मू काश्मिर शासनाने या मागणीचा अर्ज फेटाळला. हा अर्ज फेटाळण्यामागे भीती कशाची ? हिशेब दिल्यास इस्लामी मूलतत्त्ववादामुळे मृत्यूमुखी पडलेल्या असंख्य हिंदूंची दुर्दशा जगासमारे येईल, हीच भीती नव्हे काय? 790 मुस्लिमांचा बळी गेलेल्या गुजारात दंगलीविषयी सगळेच बोलतात, मात्र, कल्पनाही करू शकणार नाही, मोजदादही नाही इतक्या पंडितांची, हिंदूंची बळी घेतलेल्या आणि त्यांचे जगणेच अशक्यप्राय करुन टाकलेल्या काश्मिरी इस्लामी दहशतवादाविषयी कितीजण बोलातात बरे? गुजरात दंगलीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी, हिंदू किती क्रूर आहेत हे दाखवण्यासाठी ‘फायन सोल्यूशन’, ‘फिराक’, ‘पर्झानिया’ आदी इंग्रजी, हिंदी चित्रपट तयार करण्यात आले. त्यांना राष्टÑीय पारितोषिकही देण्यात आले. मल्याळममध्ये ‘कथावशेषन’, ‘विलपांगळक्कपूरम’, ‘भूमियडे अवकाशीकुल’ आदी चित्रपट आले. चेतन भगत यांच्या ‘थ्री स्टेट्स’ व आधारित ‘काई पो च्ो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला. अनावश्यकरित्या या चित्रपटात गुजरातची घटना घुसडण्यात आली. मात्र, काश्मिरी पंडितांविषयी बाहेरचा कोणी येऊन चित्रपट बनवलाय, याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय का, हे सांगा? तेवढेच कशाला काश्मिरीच असलेल्या पत्रकार राहुल पंडीत यांनी गतवर्षी ल्ििहलेल्या ‘अवर मून हॅज ब््लड क्लाट्स’ या पुस्तकाविषयी एकाही चॅनलवर एखादी छोटीही चर्चा झाली नाही! आतापर्यंत गुजरात दंगलीशी संबंधित सुमारे 600 लोकांना शिक्षा झाली आहे. परंतु काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडप्रकरणी एकही ‘एफआयआर’ दाखल झाला नाही, म्हटल्यास विश्वास ठेवाल? गुजरात दंगलीचे भांडवल करुन मुख्यमंत्री मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारावा यासाठी प्रयत्न झाले. मात्र, सहा काश्मिरी पंडितांना मातृभूमीतच निर्वासिताचे जगणे जगण्यास बाध्य केलेल्या, हजारो काश्मिरी पंडितांच्या हत्येकडे डोळेझाक करणाºया   तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात आवाज उठवणारा एखादा तरी माणूस दाखवा पाहू? साडेतीन हजार शीखांच्या हत्याकांडाचे नेतृत्व करणारे आणि काश्मिरी लोकांच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या राजीव गांधींना कोणी जाब विचारलाय? त्यांनी जे केले ती काय सामान्य चूक होती काय?

प्रिय श्री राजीव गांधी,

मी तुम्हाला आठवण करुन द्यावी काय, सांगा? काश्मिरमधील अशांततेविषयी मी 1998 च्या सुरुवातीला तुम्हाला सावध केलो होतो. मात्र, तुम्हाला आणि तुमच्या भोवतालच्या मंडळींकडे तो संदेश पाहायला वेळ आणि इच्छा नव्हती. मी दिलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ऐतिहासिक पाप करण्यासारखे असल्याचे त्यात नमूद केले होते. भयानक शस्त्रास्त्रे आणली जात आहेत आणि आखणी येतील, हे तुम्हाला कळवले होते. तातडीने कार्यवाही न केल्यास स्थिती गंभीर बनेल, हे एप्रिल 1989 मध्येच लिहिले होते. तुमचे मौन संभ्रम निर्माण करीत आहे. आश्चर्य म्हणजे आज काश्मिरच्या स्थितीला मीच जबाबदार असल्याचे तुमच्या भोवतालचे मणिशंकर अय्यर, एसकेपी साळवे, शिवशंकर म्हणताहेत. तुमचे आणखी एक शिष्य फारुख अब्दुल्ला यांनी सोडलेले 70 कुख्यात अतिरेकी हे सारे घडवत असताना त्यालाही राज्यपाल म्हणून मलाच जबाबदार धरणार का? 19 जानेवारी 1990 पासून जम्मू काश्मिरमध्ये राष्टÑपती राजवट लागून होण्यापूर्वीच मानसिकरित्या भारताने शरणागती पत्करली होती. 1600 हिंसाचाराच्या घटना घडल्या, 351 बाँबस्फोट झाले, 72 दंगली झाल्या. मात्र, तुम्ही त्याची कधीच चिंता केली नाही. Þ

जगमोहन, 21 एप्रिल 1990

दोनवेळा जम्मू काश्मिरचे राज्यपाल राहिलेल्या जगमोहन यांनी त्यावेळी घडलेल्या घटना, परिस्थितीचा आपल्या ‘फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मिर’ या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. एवढे झाले तरी त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेले राजीव गांधी असोत की मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि काश्मिरींनी हुसकावून लावलेले मुलतत्त्ववादी यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. आणखी एक विशेष गोष्ट पाहा : हिंदू बहुसंख्याक असलेला जम्मू आकाराने काश्मिरपेक्षा मोठा आहे. मात्र, काश्मिरमध्ये विधानसभेचे मतदारसंघ जास्त आहेत. हा विषय उचलण्याचा कारण म्हणजे, भारत लोकशाही देश असल्याची बढाई मारतात ना, मग काश्मिरमध्ये एखादा हिंदू मुख्यमंत्री करा पाहू? महान राष्टÑवादी आणि हिंदूरक्षक शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑात अब्दुल रहमान अंतुले हे मुस्लिम मुख्यमंत्री होऊ शकतात, हिंदूच बहुसंख्याक असलेल्या केरळमध्ये ए. के. एन्टोनी, ओमान चंडी हे ख्रिश्चन मुख्यमंत्री झाले तरी कोणीही विचार करत नाही. आंध्रप्रदेशात बहुसंख्य असलेला हिंदू समाज ख्रिश्चन असलेल्या येसूपद सॅम्युअल राजशेखर रेड्डीला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतो. तसेच त्यांचा मुलगा जगमोहन राज्यात लोकप्रिय नेता बनतो. हिंदू बहुसंख्याक असलेल्या मतदारसंघातूनच मुस्लिम आमदार, खासदार म्हणून निवडून येतात. मग काश्मिरमध्ये एखादाही हिंदू मुख्यमंत्री होणे शक्य नाही? या मानसिकतेमुळेच आमच्या पंडितांची हत्या होत आहे. त्यांच्यावर मायभूमीतच निर्वासिताचे जिणे जगण्याची पाळी आली आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चार महिन्यांपूर्वी गाव सोडावे लागलेल्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) मधील सहा हजार निर्वासितांविषयी आपले टीव्ही चॅनल्स दररोज घोषा लावत आहेत. तेथील लोक आणि मुलांची करुणाजनक स्थिती यावर विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहेत. निश्चितच हे चुकीचे नाही. परंतु गेल्या 25 वर्षांपासून दिल्ली आणि जम्मूमधील निर्वासितांच्या छावणीमध्ये अत्यंत अमानवीय स्थितीत जीवन जगणाºया चार लाख काश्मिरी पंडितांची दुर्दशा आमच्या सदसदविवेकबुद्धीला डाचत नाही? काश्मिरी पंडितांची स्थिती पाहून आपल्या माध्यमातील विद्वानांचे करुणामयी हृदय का द्रवत नाही? अशातच प्रशांत भूषण यासारखे महाशय काश्मिरमध्ये जनमत आजमावयाला हवे म्हणजे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे म्हणताहेत. या वक्तव्याचा प्रत्येक राष्टÑवादी नागरिकाने निषेध करायला हवा. मात्र आपले केजरीवाल ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून सोयीस्कर भूमिका घेत आहेत. अशा प्रकारची मंडळी आपल्यावर राज्य करत असताना काश्मिरी पंडितांना न्याय मिळणे शक्य आहे? जनमत म्हणजे सहा लाख काश्मिरी पंडितांचे मत अजमावयाला हवे, हे प्रशांत भूषण सारख्यांना कळत नाही का? भारतातील प्रतिष्ठित गुप्तचर संस्था ‘रॉ’ची स्थापना केलेले आर. एस. काओ हेही काश्मिरी पंडितच. त्यांचा 2002 मध्ये मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांनी पंडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला संवेदनाहीन नेतृत्व लाभल्याने काही करणे शक्य आहे का?

आता हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे हिंदूंना काश्मिर खोरे सोडून जाण्यासाठी मशिदीवरील लाऊस्पीकरवरुन धमकावण्यास 19 जानेवारी 1990 पासून सुरुवात झाली. त्याला 19 जानेवारी रोजी 24 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी हा दिवस ‘सामुदायिक हत्याकांड’ दिवस म्हणून साजरा केला जातो. अशाप्रकारचा दिवस साजरा करणे, 24 वर्षांनंतरही पंडितांना न्याय न देऊ शकणे, हे या देशाची शोकांतिका आणि हिंदूंच्या निष्क्रियतेचे द्योतकच नव्हे तर आणखी काय सांगा?

लेखक : प्रतापसिंह

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

साभार : कन्नडप्रभा

ँ३३स्र://्र‘ं२ँे्र१.ल्ली३/ं३१ङ्मू्र३्री२/11.ँ३े’

Tuesday 28 February 2017

ಕೋಲ್ಹಾರ ದೇಸಗತಿ


ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ೨೧೮ರ ಮೇಲೆ, ಕೃಷ್ಣೆಯ ಬಲದಂಡೆಯಲ್ಲಿ ಕಾಣಸಿಗುವ ಕೊಲ್ಹಾರ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿಯಿಂದ ೩೦ ಕಿ.ಮೀ. ದೂರವಿರುವ ಪ್ರಮುಖ ಹೋಬಳಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಕೊರ್ತಿ-ಕೊಲ್ಹಾರ, ಹೊಳಿ-ಕೊಲ್ಹಾರ, ದೇಸಾಯರ-ಕೊಲ್ಹಾರ, ಮಸರಿನ-ಕೊಲ್ಹಾರ ಎಂದೆಲ್ಲಾ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈಗ ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವು ಕೃಷ್ಣಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ಯೋಜನೆಯ ಹಿನ್ನಿರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದ್ದು, ಹತ್ತಿರದಲ್ಲಿಯೇ ಪುನರ್ ವಸತಿಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿವೆ.
ಕೊಲ್ಹಾರದ ಪ್ರಾಚೀನತೆ 
  ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವು ಬಹು ಪ್ರಾಚೀನಕಾಲದಿಂದಲೂ ಇರುವುದನ್ನು ಕಾಣುತ್ತೇವೆ. ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಾಯಿಯಾಗಿದ್ದ, ಭೋಜನಾಯಕನ ಮನೆಯಮುಂದೆ ದೊರೆತ ಶಿಲಾಶಾಸನವು ಕ್ರಿ.ಶ. ೧೨೨೩ರ ಕಾಲಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಯಾದವ ದೊರೆ ಸಿಂಗನನ ಕಾಲದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಶಾಸನವು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವನ್ನು ”ಸರ್ವನಮಸ್ಯದ ಅಗ್ರಹಾರ ಹಾಗೂ ದಕ್ಷಿಣವಾರಣಾಸಿ” ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸುತ್ತದೆ. ಮುಂದೆ ೧೫೨೫ರಲ್ಲಿ ಅದೃಶ್ಯಕವಿಯಿಂದ ರಚಿಸಲ್ಪಟ್ಟ ಪ್ರೌಢರಾಯನ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ‘ತೊರೆಸಾಲ ಪರಗಣೆಯ ಕೊಲ್ಹಾಪುರ್’ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಕೊಲ್ಹಾರ ಪರಗಣೆಯು ಚಿಕ್ಕಗರಸಂಗಿ, ಹಿರೆಗರಸಂಗಿ, ರೋಣಿಹಾಳ, ಹಳ್ಳದ ಗೆಣ್ಣೂರ, ಮುತ್ತಲದಿನ್ನಿ, ಹಂಗರಗಿ, ಹಾಗೂ ಕೊಲ್ಹಾರ ಎಂಬ ಏಳು ಗ್ರಮವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದು ಈ ಪರಗಣೆಯ ಆಡಳಿತವು ಕೊಲ್ಹಾರ ದೇಸಾಯಿಯವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದಾಗಿತ್ತು.
ದೇಸಗತಿಯ ಮೂಲ 
 ವಿಜಯನಗರದ ಕಾಲಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಪರಗಣಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದ ಕೊಲ್ಹಾರ ದೇಸಗತಿಯು ಮೊದಲು ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ಭೋಜನಾಯಕ ಎಂಬ ದೇಸಾಯಿಯ ವಶದಲ್ಲಿತ್ತು. ಮುಳಗಡೆಗೊಂಡ ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭೋಜನಾಯಕನ ಮನೆ ಇದ್ದದ್ದು, ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ದೃಢಪಡಿಸುತ್ತದೆ. ಈ ಭೋಜನಾಯಕ ವಿಜಯನಗರದ ಅರಸ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೨೪ ರಿಂದ ೧೪೪೬) ಮಾಂಡಲಿಕನಾಗಿದ್ದನು. ಈ ಗ್ರಾಮದ ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ದೇಸಗತಿಯು ಗಾಣಿಗ ವಂಶದ ದೇಸಗತಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆಗೊಂಡ ಕುತೂಹಲಕರವಾದ ಘಟನೆಯೊಂದು ಸ್ಥಳೀಯ ಐತಿಹ್ಯಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಪಡೆದಿದೆ.
ಕೊಲ್ಹಾರದಿಂದ ೨೫ ಮೈಲು ಅಂತರದಲ್ಲಿ ನಾಲತವಾಡ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದ್ದು, ಆ ಊರಿನ ಗೌಡ ಅಲ್ಲಿರುವ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೇಂದ್ರನಿಗೆ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಏಳು ಚೀಲ ಕುಸುಬೆಯನ್ನು ಗಾಣ ಮಾಡಿಕೊಡಲು ಆದೇಶಿಸಿದನು. ಅಷ್ಟು ಬೃಹತ್‌ ಪ್ರಮಾಣದ ಕುಸುಬೆಯನ್ನು ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಗಾಣ ಹಾಕಲು ಅಸಾಧ್ಯವಾದ ಕಾರಣ ತನ್ನ ಆಜ್ಞೆಯ ಉಲ್ಲಂಘನೆಗಾಗಿ ಕೋಪಿಷ್ಟ ಗೌಡನು ಗಾಣಿಗನ ಎತ್ತು ಹಾಗೂ ಗಾಣವನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡನು. ಹೀಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕಳೆದುಕೊಂಡ ಗಾಣಿಗ ತನ್ನ ಗರ್ಭಿಣಿ ಪತ್ನಿಯೊಂದಿಗೆ ನಾಲತವಾಡ ಬಿಟ್ಟು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು, ಊರ ಮುಂದಿರುವ ಬಯಲು ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಾರಹೂಡಿದನು.
ಇದೇ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಪ್ರೌಢರಾಯನು ಮಂತ್ರಿ ಜಕ್ಕಣ್ಣಾರ್ಯರೊಡನೆ ಕೃಷ್ಣಾನದಿಯ ನಡುಗಡ್ಡೆಯಲ್ಲಿ ಬೀಡುಬಿಟ್ಟಿದ್ದನು. ತಮ್ಮ ದೇಸಗತಿಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ರಾಜನ ಆಗಮನವಾದಾಗ ಅವರ ಆಧರಾತಿಥ್ಯ ಅಲ್ಲಿರುವ ದೇಸಾಯಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕಿತ್ತು. ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶಾಸನವು ಹಾಗೂ ಸಂಪ್ರದಾಯವು ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ದೊರೆ ಪ್ರೌಢರಾಯನಿಗೆ ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಾಯಿ ಬೋಜನಾಯಕನಿಂದ ಕನಿಷ್ಠ ಶಿಷ್ಟಾಚಾರಗಳು ಸಲ್ಲಲಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಭೋಜನಾಯಕನು ತನ್ನ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ವಿಜಯನಗರಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ಬಹಮನಿ ಸುಲ್ತಾನರತ್ತ ವರ್ಗಾಯಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳನ್ನು ಅಲ್ಲಗಳೆಯುವಂತಿಲ್ಲ. ಡಾ. ಎಸ್. ಶೆಟ್ಟರವರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಂತೆ ‘ಚಿಕ್ಕಪುಟ್ಟ ಸಂಸ್ಥಾನಿಕರಾದ ಈ ದೇಸಾಯಿಗಳು ತಮ್ಮ ಅನುಕೂಲತೆಗಾಗಿ ನಿಷ್ಠೆ ಬದಲಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಎಂಬ ಮತ ಸಂಬಂಧ ಮುಖ್ಯವಾಗಿರದೆ, ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಅಸ್ಥಿತ್ವ ಮಾತ್ರ ಪ್ರಮುಖವಾಗಿತ್ತು’ ಎಂದಿದ್ದಾರೆ. (ಕಿತ್ತೂರಿನ ದೇಸಾಯಿ ಮಲ್ಲಸರ್ಜ ೧೮೧೭ರಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಬ್ರಿಟೀಷರ ಸಂಘರ್ಷದಲ್ಲಿ ತನ್ನ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಬ್ರಿಟೀಷರತ್ತವಾಲಿದ್ದು).
ಈ ಕ್ಷಿಪ್ರ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ಕ್ರೋಧಗೊಂಡ ದೊರೆ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನು ಭೋಜನಾಯಕನ ಶಿರಚ್ಛೇಧನಕ್ಕೆ ಆದೇಶವಿತ್ತನು. ರಾಜಾಜ್ಞೆಯನ್ನು ಹೊತ್ತ ವಿಜಯನಗರ ಸೈನಿಕರು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವನ್ನು ಸುತ್ತಿ ಗಲಭೆಯನ್ನುಂಟುಮಾಡಿದರು. ಭೋಜನಾಯಕನನ್ನು ಶೋಧಿಸುತ್ತ, ಆವೇಶದಲ್ಲಿ ಬಂದ ರಾಯನ ಸೈನಿಕರು, ಊರಮುಂದಿರುವ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೇಂದ್ರನನ್ನೆ ವೇಶ ಮರಿಸಿಕೊಂಡ ದೇಸಾಯಿ ಎಂಬ ತಪ್ಪು ಗ್ರಹಿಕೆಯಿಂದ ಕೊಲೆಗೈದರು. ಈ ವಾರ್ತೆಯನ್ನರಿತ ದೊರೆ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಾಗ ತುಂಬು ಗರ್ಭಿಣಿ ಅಣ್ಣೇಂದ್ರನ ಪತ್ನಿಯಿಂದ ಅವರ ಪೂರ್ವ ವೃತ್ತಾಂತವನ್ನ ಆಲಿಸಿ, ತನ್ನ ಸೈನಿಕರ ತಪ್ಪಿನಿಂದಾಗಿ ನಡೆದ ಘಟನೆಗೆ ವ್ಯಥೆಪಟ್ಟನಲ್ಲದೇ ಪರಿಹಾರವೆಂಬಂತೆ ಅವಳಿಗೆ ಹೀಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಇತ್ತನು. ‘ನಿನಗೆ ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದರೆ ರಾಜನೊಬ್ಬನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೇನೆ. ಗಂಡು ಹುಟ್ಟಿದರೆ ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಗತಿಯನ್ನು ಉಂಬಳಿಯಾಗಿ ನೀಡುತ್ತೇನೆ.’ ಎಂದು ಭರವಸೆ ಇತ್ತನು. ಕಾಕತಾಳೀಯವೆಂಬಂತೆ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೆಂದ್ರನ ಮಡದಿ ಗಂಡು ಮಗುವಿಗೆ ಜನ್ಮವಿತ್ತಳು. ತಾಯಿಯ ಉದರದಲ್ಲಿ ಅದೃಶ್ಯವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ದೇಸಗತಿಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಅದೃಶ್ಯಪ್ಪನೆಂದು ಹೆಸರಿಡಲಾಯಿತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೪೫ರ ಸುಮಾರಿಗೆ ಈ ದೇಸಗತಿಯು ಆರಂಭಗೊಂಡಿತೆಂಬ ಅಂಶವು ಲಭ್ಯವಿರುವ ದಾಖಲೆಗಳಿಂದ ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ.

Sunday 26 February 2017

सूर हेच ईश्वर

    1. २०११

स्थळ : कोलकाता
साल्ट लेक संगीत महोत्सव : यात सोलापूरचे सुंद्रीवादक भीमण्णा चिदानंद जाधव यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ग्रॅमी अवार्ड विजेते, पद्मविभुषण मोहनवीणा वादक विश्वमोहन भट म्हणाले, 'मला एकाच कुटुंबातील आजोबा, मुलगा आणि नातू अशा तिघांचे सुंद्रीवादन ऐकायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.'
    1. ११ डिसेंबर २०१४

स्थळ : पुणे
सवाई गंधर्व महोत्सव : दोनवेळा वडिलांसमवेत या महोत्सवात सुंद्रीवादन केलेल्या भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने ६२ व्या महोत्सवाची सुरुवात झाली. जाधव यांच्या सुंद्रीवादनाने रसिकांना डोलायला लावले. यानंतर सतारवादनासाठी व्यासपीठावर आलेले पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा जाधव यांची पाठ थोपटत म्हणाले, 'व्वा क्या बात है, दादाजी की याद दिलाई.'
वरील दोन्ही महोत्सवांतील संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या गौरवोदगारांतून केवळ जाधव कुटूंब, त्यांच्या तीन पिढ्यांच्या कलासाधनेचा, त्यांनीच बनवलेल्या आणि फक्त त्यांच्याकडूनच वाजवल्या जाणाऱ्या सुंद्रीचेच कौतुक नव्हे तर सोलापूरच्या कलावैभवाचा सन्मान झाला. सोलापूरसह महाराष्ट्रकर्नाटकच्या सीमाभागातील लोकसंगीतात आपल्या कलासाधनेने सुंद्री वाद्याला महत्वपूर्ण स्थान मिळवून दिलेल्या जाधव यांनी फक्त जयपूर ते भुवनेश्वर, जगन्नाथपुरी, कोलकाता आणि दिल्ली ते बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गुंटूर, वरंगल असे संपूर्ण भारतातच नव्हे फ्रान्स, बेल्जियम या पाश्चिमात्य राष्ट्रांतील महोत्सवांतही भारताचे प्रतिनिधीत्व आणि सुंद्री वादनाने युरोपियन रसिकांना मंत्रमुग्ध करत सोलापूरच्या कलावैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
जन्मकथा : बाॅबीन ते सुंद्री
सनईची छोटी बहीण मानली जाणारी सुंद्री सोलापूरच्या ग्रामीण भागात जन्मली, सोलापूर शहराच्या बहुविध सांस्कृतिक वातावरणात वाढली आणि ती देशाच्या बाहेरही पोहोचली. तिच्या जन्माची चित्तरकथाही तितकीच चित्तवेधक आहे. आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील परंपरागत सनईवादक भीमण्णा जाधव (भीमण्णा यांचे पणजोबा) हे रोज २४ किलोमीटर पायी ये - जा करत सोलापुरातील जुनी मिलसमोर टोपल्या विकून उदरनिर्वाह करायचे. मिलमध्ये बाॅबीन ठेवण्यासाठी या टोपल्यांचा वापर केला जायचा. १८९५ च्या सुमारास एकेदिवशी चुकून टोपल्यांमध्ये काही बाॅबीन आल्या. दुसऱ्या दिवसापासून मिलमध्ये संप सुरू झाला. त्यांच्या पत्नीने त्यांना उरलेल्या टोपल्या शेजारच्या गावांमध्ये विकून येण्यास सांगितले तेव्हा त्यांचे लक्ष त्या बाॅबीनकडे गेले. ते मिलच्या व्यवस्थापकांकडे परत करावे, हा विचार होता. मात्र, मिल बंद असल्याने ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे ते सनईची रीड दुरुस्त करू लागले. त्यावेळी त्यांचा मुलगा बाबूराव याचे त्या बाॅबीनकडे लक्ष गेले आणि त्याला काही छिद्रे मारुन पत्ती बसवून वाजवल्यानंतर सुस्वर उमटले आणि या अनोख्या, सुषिर लोकवाद्याचा जन्म झाला.
सुंदर ती सुंदरी
कालांतराने रोजगारासाठी सोलापुरात स्थायिक झालेले बाबूराव, लक्ष्मण आणि सिद्राम हे बंधू सुंद्रीसह परंपरागत सनई, ढोल, ताशा याचे सामुदायिक वादन करायचे. अक्कलकोटचे तत्कालीन संस्थानिक फत्तेसिंह महाराज यांनी एका समारंभात सुंद्रीवादनासाठी बाबूराव जाधव यांना आमंत्रित केले. तेथे २७ फेब्रुवारी १९३६ ला हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर फत्तेसिंह महाराजांची प्रतिक्रिया होती, सुंदर, सुंदर... त्यांनी वाद्याच्या नावाची विचारणा केली. त्यावर जाधव यांनी बाॅबीन असे सांगितले. तोपर्यंत या वाद्याचे नाव बाॅबीन हेच प्रचलित झाले होते. प्रतापसिंह महाराजांनी त्याचे सुंदरी (सनईत पुरुषतत्त्व तर सुंद्रीत स्त्रीतत्त्व असते.) असे नामकरण केले, जिचे पुढे अपभ्रंश होऊन सुंद्री बनली.
पंतप्रधानांनाही घातली भुरळ
बाबूराव यांनी सुंद्री जन्माला घातली, मात्र सिद्राम, त्यांचे चिरंजीव चिदानंद आणि नातू भीमण्णा यांनी आपल्या अथक साधनेने त्यांचा वारसा पुढे नेत त्याला वाढवले, सर्वसामान्य रसिकापासून संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांना त्याची भूरळ पाडली. बाबूराव यांच्या निधनानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी बागेवाडीकर हाॅस्पिटलच्या इमारतीत हिराबाई बडोदेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी बाहेर त्यांच्या स्वागतासाठी सुंद्रीवादनाकरिता सिद्राम जाधव यांना बोलावले होते. सुंद्रीवादनाने प्रभावित बडोदेकर हाॅलमधून बाहेर आल्या आणि त्यांना व्यासपीठावर नेऊन त्यांचा सन्मान केला.तसेच भागवत चित्रपटगृहात संगम चित्रपटाच्या प्रिमियरला पं. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा सनईवादनाचा कार्यक्रम होता. तर खालच्या हाॅलमध्ये सिद्रामप्पा यांचा कार्यक्रम. त्यावेळचे सिनेक्षेत्रातील दिलीपकुमार राज कपूर हे दोन्ही दिग्गज उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा कार्यक्रम सोडून सुंद्रीवादन ऐकण्यास खाली आले. त्याने मोहित दिलीपकुमार यांनी आपला कोट आणि राजकपूर यांनी रेश्मी फेटा सिद्रामप्पा यांना देत त्यांच्या कलेचा गौरव केला. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनीही शंकराची प्रतिमा चांदीचा चषक देऊन तर तुळजापूर येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुंदरी सम्राट अशा शब्दांत सिद्रामप्पा यांचा गौरव केला. ते प्लस ग्रेडचे आकाशवाणी कलाकार होते. त्यांनी बीबीसी लंडन, दूरदर्शन यावरुनही रसिकांसाठी सुंद्रीवादन केले. १९४२ मध्ये एचएमव्ही कंपनीने त्यांच्या सुंद्रीवादनाचे लाँग प्ले रेकाॅर्ड प्रकाशित केले.
सुंद्री आयफेल टाॅवरच्या भेटीला
त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव चिदानंद यांनी हा कलाप्रवाह वाहता ठेवला. त्यांनी घरगुती समारंभांसह आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम केले. पंडीत भीमसेन जोशी यांच्यासह संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचा स्नेह होता. त्यांना संगीत नाटक अकादमी, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक संस्थेने गौरवले. त्यांनीच कै. सुंद्री सम्राट सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच मुलगा भीमण्णा याच्यावर वयाच्या चौथ्या वर्षांपासून कलासंस्कार केले. भीमण्णाने तबला, हार्मोनिअम आदींचे संगीत शिक्षण घेत सुंद्रीवादनाचे धडे गिरवले. तसेच परिश्रमपूर्वक वयाच्या ३३ व्या वर्षी आकाशवाणीच्या ग्रेड कलाकारांमध्ये स्थान मिळवले. भोपाळच्या भारत भुवनमधील दुर्लभ, ग्वाल्हेरच्या तानसेन यासह देशभरातील प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आणि १९९८ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती भवनात अनोख्या सुंद्रीचा जादुई आविष्कार घडवतानाच फ्रान्स, बेल्जिअमच्या रसिकांवरही सुरांची मोहिनी घातली. फ्रान्समधील आयफेल टाॅवरसमोर उभा राहिल्यानंतर मातीचे भांडी विकणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा गौरव केवळ सुंद्रीमुळे मिळाला, या भावनेने भावविभोर होऊन माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळल्याचे भीमण्णांनी सद्गगदित होऊन सांगितले. तसेच आता अमेरिकेतील दरबार महोत्सवाद सुंद्रीवादनाची आस असल्याचे म्हटले. देशभरात विविध ठिकाणी पद्मश्री कोदंडराम, देवदत्त जोशी, कृष्णा बालेश, रोहन नायडू, संदीप चटर्जी, फ्रान्सचे लाँग्स यांच्याशी भीमण्णाच्या सुंद्रीची जुगलबंदीही रसिकजनांनी अनुभवली.
भारताच्या प्रजासत्ताकदिनी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या सनईवादनाने आकाशवाणीची सुरुवात व्हायची. त्यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये देशभरातील आकाशवाणी केंद्रांवरुन भीमण्णाचे सुंद्रीवादन प्रसारित झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे बिसिल्ला खाँ यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे दिला जाणारा पहिलाच युवा पुरस्कार भीमण्णा यांना प्रदान करण्यात आला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनीही जाधव कुटुंबियांचे गौरव करताना म्हटले आहे, 'आम्ही मोठी सनई वाजवतो, पण तुमच्या छोट्या सुंद्रीतही तेवढेच स्वरमाधुर्य आहे.' भीमण्णा यांना कला अकादमीसह अनेकविध फेलोशिप, शिष्यवृत्ती मिळाले असून अनेक पुरस्काराने गौरवले आहे. तसेच ते दिल्लीच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेवरही आहेत.
भीमण्णा हे सुंद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव संगीत सांस्कृतिक कला मंडळाच्या माध्यमातून सुंद्रीच्या प्रचार, प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांच्याकडे नऊ विद्यार्थी मोफत सुंद्रीवादनाचे धडे गिरवत आहेत. मात्र, त्यांची एक खंत आहे. त्यांच्या आजोबांनी पुणे, माढा येथील काहीना सुंद्रीवादनाचे धडे दिले. तीन पिढ्यांपासून त्यांच्या या कलेच्या प्रचार प्रसाराच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही 'सूर हेच ईश्वर' मानून त्यांची साधना सुरू आहे.






सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...