Monday 4 September 2023

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात



२० जानेवारी २०२३

 बालगाव आश्रमात गुरुवंदना 

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री गुरुदेव आश्रमात गुरुवारी गुरुवंदना कार्यक्रम झाला. न बोलावता, कोणाला निमंत्रण न देता हजारो साधक आपले श्रद्धेय गुरू ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदन करण्यासाठी एकत्र आले होते. यात भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. आरती गायनासह साधकांनी सोबत आणलेल्या पणत्यांनी आरती करुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदना केली. 

श्री बसवलिंग स्वामीजी, अध्यक्ष ज्ञानयोश्रम, विजयपूर

आ तनुवेल्ला लिंग काणा रामनाथा... या वचनाप्रमाणे श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्यात ज्योतीप्रमाणे आहेत. ते आता सागर झाले आहेत.

बयलू बयलन्नू बित्ती बयलादरु नम्म शरणरु... आपण स्वामीजींना पाहिलो, ऐकलो, त्यांची सेवा केलो. त्यांचे जीवन आपल्यात आहे.  स्वामीजींनी सांगितलेल्या ज्ञान, भक्तीचा दीप तेवत ठेवा. 




अमृतानंद स्वामीजी

समाजात चर्चा आहे, श्री गुरुदेव सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. त्यांनी दगड, लाकूड,  सोने या माध्यमातून त्यांनी कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. मात्र, ते आज अनेक लोकांत आहेत. कोणीही व्यक्ती इतक्या लोकांच्या हृदयात राहिले नाहीत. १२ व्या शतकात विजयपूर बसवण्णांच्या भक्तीमुळे लोकप्रिय झाले. तर २१ व्या शतकात श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी ज्ञानाद्वारे अनेकांचे जीवन उजळवल्याने लोकप्रिय झाले. गुरुदेवांच्या वाणीला, ज्ञानाला, आचरणाला मृत्यू नाही. त्यांची वाणी असेपर्यंत विचार, ज्ञानाला मृत्यू नाही. ते देहरुपात असेपर्यंत त्यांच्या अस्तित्वाला सीमा होती. मात्र,  आता ते सर्वत्र आहेत. ते विचार, ज्ञानरुपाने प्रत्येकात आहेत. त्यांच्या ज्ञानाचा दीप सर्वत्र आहे. ते प्रकाशमय करण्यासाठी  आपण साधन बनले पाहिजे. आपले मन तेल, वात झाल्यावर ते प्रकाशमय होईल.

गुरुदेवांनी शरीर सोडले, आता ते बयलू रूप झाले. ते बयलू पूजक होते. सर्वत्र बयलू आहे. 

प्रत्येक झोपडी, घर, परिसर बयलू आहे. गुरुदेव लिंगैक्य झाल्यानंतर १८ तासांत लक्षावधी लोक दर्शनासाठी जमले. ते पाहून देशातील लोक आश्चर्यचकित झाले. असेही ज्ञानी असू शकतात, हे पाहून ते अचंबित झाले.  गुरुदेवांनी ज्ञानासाठी जीवन समर्पित केले.ते योगमय जीवन जगले. स्वामीजींच्या अपरोक्ष रेकॉर्डिंग केलेले

१० हजार प्रवचने उपलब्ध आहेत. जात, धर्म, राजकारण, हवे, नको विरहित ते जीवन जगले. ते बुद्धासमान राहिले. ते खिसा नसलेले संत होते. हा खिसा कधीही भरणार नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यांचे दैहिक, बौद्धिक सामर्थ्य प्रचंड होते. ते रोज हजारो साधकांना भेटायचे, संवाद साधायचे. परंतु ते कधीही त्रासले नाहीत. त्यांना पाहिल्यास साधकांना आनंद व्हायचे. 

बाबुराव होनवाड

 श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्याला बोलण्यासारखे वागायला सांगितले. 

वाणी, शारिरीक तपश्चर्या, संयम हे आपण त्यांच्याकडून घ्यायला हवे. ते स्वामी

विवेकानंद,  रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे होते. आता लिंगैक्य झाल्यानंतर ते निसर्गात आहेत. ते कोणाला दीक्षा, आशीर्वाद न देता सर्वांचे गुरू आहेत.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...