Tuesday 28 February 2017

ಕೋಲ್ಹಾರ ದೇಸಗತಿ


ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ೨೧೮ರ ಮೇಲೆ, ಕೃಷ್ಣೆಯ ಬಲದಂಡೆಯಲ್ಲಿ ಕಾಣಸಿಗುವ ಕೊಲ್ಹಾರ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿಯಿಂದ ೩೦ ಕಿ.ಮೀ. ದೂರವಿರುವ ಪ್ರಮುಖ ಹೋಬಳಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಕೊರ್ತಿ-ಕೊಲ್ಹಾರ, ಹೊಳಿ-ಕೊಲ್ಹಾರ, ದೇಸಾಯರ-ಕೊಲ್ಹಾರ, ಮಸರಿನ-ಕೊಲ್ಹಾರ ಎಂದೆಲ್ಲಾ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈಗ ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವು ಕೃಷ್ಣಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ಯೋಜನೆಯ ಹಿನ್ನಿರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದ್ದು, ಹತ್ತಿರದಲ್ಲಿಯೇ ಪುನರ್ ವಸತಿಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿವೆ.
ಕೊಲ್ಹಾರದ ಪ್ರಾಚೀನತೆ 
  ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವು ಬಹು ಪ್ರಾಚೀನಕಾಲದಿಂದಲೂ ಇರುವುದನ್ನು ಕಾಣುತ್ತೇವೆ. ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಾಯಿಯಾಗಿದ್ದ, ಭೋಜನಾಯಕನ ಮನೆಯಮುಂದೆ ದೊರೆತ ಶಿಲಾಶಾಸನವು ಕ್ರಿ.ಶ. ೧೨೨೩ರ ಕಾಲಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಯಾದವ ದೊರೆ ಸಿಂಗನನ ಕಾಲದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಶಾಸನವು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವನ್ನು ”ಸರ್ವನಮಸ್ಯದ ಅಗ್ರಹಾರ ಹಾಗೂ ದಕ್ಷಿಣವಾರಣಾಸಿ” ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸುತ್ತದೆ. ಮುಂದೆ ೧೫೨೫ರಲ್ಲಿ ಅದೃಶ್ಯಕವಿಯಿಂದ ರಚಿಸಲ್ಪಟ್ಟ ಪ್ರೌಢರಾಯನ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ‘ತೊರೆಸಾಲ ಪರಗಣೆಯ ಕೊಲ್ಹಾಪುರ್’ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಕೊಲ್ಹಾರ ಪರಗಣೆಯು ಚಿಕ್ಕಗರಸಂಗಿ, ಹಿರೆಗರಸಂಗಿ, ರೋಣಿಹಾಳ, ಹಳ್ಳದ ಗೆಣ್ಣೂರ, ಮುತ್ತಲದಿನ್ನಿ, ಹಂಗರಗಿ, ಹಾಗೂ ಕೊಲ್ಹಾರ ಎಂಬ ಏಳು ಗ್ರಮವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದು ಈ ಪರಗಣೆಯ ಆಡಳಿತವು ಕೊಲ್ಹಾರ ದೇಸಾಯಿಯವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದಾಗಿತ್ತು.
ದೇಸಗತಿಯ ಮೂಲ 
 ವಿಜಯನಗರದ ಕಾಲಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಪರಗಣಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದ ಕೊಲ್ಹಾರ ದೇಸಗತಿಯು ಮೊದಲು ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ಭೋಜನಾಯಕ ಎಂಬ ದೇಸಾಯಿಯ ವಶದಲ್ಲಿತ್ತು. ಮುಳಗಡೆಗೊಂಡ ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭೋಜನಾಯಕನ ಮನೆ ಇದ್ದದ್ದು, ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ದೃಢಪಡಿಸುತ್ತದೆ. ಈ ಭೋಜನಾಯಕ ವಿಜಯನಗರದ ಅರಸ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೨೪ ರಿಂದ ೧೪೪೬) ಮಾಂಡಲಿಕನಾಗಿದ್ದನು. ಈ ಗ್ರಾಮದ ಕ್ಷತ್ರೀಯ ವಂಶದ ದೇಸಗತಿಯು ಗಾಣಿಗ ವಂಶದ ದೇಸಗತಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆಗೊಂಡ ಕುತೂಹಲಕರವಾದ ಘಟನೆಯೊಂದು ಸ್ಥಳೀಯ ಐತಿಹ್ಯಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಪಡೆದಿದೆ.
ಕೊಲ್ಹಾರದಿಂದ ೨೫ ಮೈಲು ಅಂತರದಲ್ಲಿ ನಾಲತವಾಡ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದ್ದು, ಆ ಊರಿನ ಗೌಡ ಅಲ್ಲಿರುವ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೇಂದ್ರನಿಗೆ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಏಳು ಚೀಲ ಕುಸುಬೆಯನ್ನು ಗಾಣ ಮಾಡಿಕೊಡಲು ಆದೇಶಿಸಿದನು. ಅಷ್ಟು ಬೃಹತ್‌ ಪ್ರಮಾಣದ ಕುಸುಬೆಯನ್ನು ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಗಾಣ ಹಾಕಲು ಅಸಾಧ್ಯವಾದ ಕಾರಣ ತನ್ನ ಆಜ್ಞೆಯ ಉಲ್ಲಂಘನೆಗಾಗಿ ಕೋಪಿಷ್ಟ ಗೌಡನು ಗಾಣಿಗನ ಎತ್ತು ಹಾಗೂ ಗಾಣವನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡನು. ಹೀಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕಳೆದುಕೊಂಡ ಗಾಣಿಗ ತನ್ನ ಗರ್ಭಿಣಿ ಪತ್ನಿಯೊಂದಿಗೆ ನಾಲತವಾಡ ಬಿಟ್ಟು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು, ಊರ ಮುಂದಿರುವ ಬಯಲು ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಾರಹೂಡಿದನು.
ಇದೇ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಪ್ರೌಢರಾಯನು ಮಂತ್ರಿ ಜಕ್ಕಣ್ಣಾರ್ಯರೊಡನೆ ಕೃಷ್ಣಾನದಿಯ ನಡುಗಡ್ಡೆಯಲ್ಲಿ ಬೀಡುಬಿಟ್ಟಿದ್ದನು. ತಮ್ಮ ದೇಸಗತಿಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ರಾಜನ ಆಗಮನವಾದಾಗ ಅವರ ಆಧರಾತಿಥ್ಯ ಅಲ್ಲಿರುವ ದೇಸಾಯಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕಿತ್ತು. ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶಾಸನವು ಹಾಗೂ ಸಂಪ್ರದಾಯವು ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ದೊರೆ ಪ್ರೌಢರಾಯನಿಗೆ ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಾಯಿ ಬೋಜನಾಯಕನಿಂದ ಕನಿಷ್ಠ ಶಿಷ್ಟಾಚಾರಗಳು ಸಲ್ಲಲಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಭೋಜನಾಯಕನು ತನ್ನ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ವಿಜಯನಗರಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ಬಹಮನಿ ಸುಲ್ತಾನರತ್ತ ವರ್ಗಾಯಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳನ್ನು ಅಲ್ಲಗಳೆಯುವಂತಿಲ್ಲ. ಡಾ. ಎಸ್. ಶೆಟ್ಟರವರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಂತೆ ‘ಚಿಕ್ಕಪುಟ್ಟ ಸಂಸ್ಥಾನಿಕರಾದ ಈ ದೇಸಾಯಿಗಳು ತಮ್ಮ ಅನುಕೂಲತೆಗಾಗಿ ನಿಷ್ಠೆ ಬದಲಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಎಂಬ ಮತ ಸಂಬಂಧ ಮುಖ್ಯವಾಗಿರದೆ, ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಅಸ್ಥಿತ್ವ ಮಾತ್ರ ಪ್ರಮುಖವಾಗಿತ್ತು’ ಎಂದಿದ್ದಾರೆ. (ಕಿತ್ತೂರಿನ ದೇಸಾಯಿ ಮಲ್ಲಸರ್ಜ ೧೮೧೭ರಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಬ್ರಿಟೀಷರ ಸಂಘರ್ಷದಲ್ಲಿ ತನ್ನ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಬ್ರಿಟೀಷರತ್ತವಾಲಿದ್ದು).
ಈ ಕ್ಷಿಪ್ರ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ಕ್ರೋಧಗೊಂಡ ದೊರೆ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನು ಭೋಜನಾಯಕನ ಶಿರಚ್ಛೇಧನಕ್ಕೆ ಆದೇಶವಿತ್ತನು. ರಾಜಾಜ್ಞೆಯನ್ನು ಹೊತ್ತ ವಿಜಯನಗರ ಸೈನಿಕರು ಕೊಲ್ಹಾರ ಗ್ರಾಮವನ್ನು ಸುತ್ತಿ ಗಲಭೆಯನ್ನುಂಟುಮಾಡಿದರು. ಭೋಜನಾಯಕನನ್ನು ಶೋಧಿಸುತ್ತ, ಆವೇಶದಲ್ಲಿ ಬಂದ ರಾಯನ ಸೈನಿಕರು, ಊರಮುಂದಿರುವ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೇಂದ್ರನನ್ನೆ ವೇಶ ಮರಿಸಿಕೊಂಡ ದೇಸಾಯಿ ಎಂಬ ತಪ್ಪು ಗ್ರಹಿಕೆಯಿಂದ ಕೊಲೆಗೈದರು. ಈ ವಾರ್ತೆಯನ್ನರಿತ ದೊರೆ ಪ್ರೌಢದೇವರಾಯನು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಾಗ ತುಂಬು ಗರ್ಭಿಣಿ ಅಣ್ಣೇಂದ್ರನ ಪತ್ನಿಯಿಂದ ಅವರ ಪೂರ್ವ ವೃತ್ತಾಂತವನ್ನ ಆಲಿಸಿ, ತನ್ನ ಸೈನಿಕರ ತಪ್ಪಿನಿಂದಾಗಿ ನಡೆದ ಘಟನೆಗೆ ವ್ಯಥೆಪಟ್ಟನಲ್ಲದೇ ಪರಿಹಾರವೆಂಬಂತೆ ಅವಳಿಗೆ ಹೀಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಇತ್ತನು. ‘ನಿನಗೆ ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಿದರೆ ರಾಜನೊಬ್ಬನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೇನೆ. ಗಂಡು ಹುಟ್ಟಿದರೆ ಕೊಲ್ಹಾರದ ದೇಸಗತಿಯನ್ನು ಉಂಬಳಿಯಾಗಿ ನೀಡುತ್ತೇನೆ.’ ಎಂದು ಭರವಸೆ ಇತ್ತನು. ಕಾಕತಾಳೀಯವೆಂಬಂತೆ ಗಾಣಿಗ ಅಣ್ಣೆಂದ್ರನ ಮಡದಿ ಗಂಡು ಮಗುವಿಗೆ ಜನ್ಮವಿತ್ತಳು. ತಾಯಿಯ ಉದರದಲ್ಲಿ ಅದೃಶ್ಯವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ದೇಸಗತಿಯನ್ನು ಸಂಪಾದಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಅದೃಶ್ಯಪ್ಪನೆಂದು ಹೆಸರಿಡಲಾಯಿತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೪೫ರ ಸುಮಾರಿಗೆ ಈ ದೇಸಗತಿಯು ಆರಂಭಗೊಂಡಿತೆಂಬ ಅಂಶವು ಲಭ್ಯವಿರುವ ದಾಖಲೆಗಳಿಂದ ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ.

Sunday 26 February 2017

सूर हेच ईश्वर

    1. २०११

स्थळ : कोलकाता
साल्ट लेक संगीत महोत्सव : यात सोलापूरचे सुंद्रीवादक भीमण्णा चिदानंद जाधव यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ग्रॅमी अवार्ड विजेते, पद्मविभुषण मोहनवीणा वादक विश्वमोहन भट म्हणाले, 'मला एकाच कुटुंबातील आजोबा, मुलगा आणि नातू अशा तिघांचे सुंद्रीवादन ऐकायला मिळाले, हे माझे भाग्य आहे.'
    1. ११ डिसेंबर २०१४

स्थळ : पुणे
सवाई गंधर्व महोत्सव : दोनवेळा वडिलांसमवेत या महोत्सवात सुंद्रीवादन केलेल्या भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने ६२ व्या महोत्सवाची सुरुवात झाली. जाधव यांच्या सुंद्रीवादनाने रसिकांना डोलायला लावले. यानंतर सतारवादनासाठी व्यासपीठावर आलेले पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा जाधव यांची पाठ थोपटत म्हणाले, 'व्वा क्या बात है, दादाजी की याद दिलाई.'
वरील दोन्ही महोत्सवांतील संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या गौरवोदगारांतून केवळ जाधव कुटूंब, त्यांच्या तीन पिढ्यांच्या कलासाधनेचा, त्यांनीच बनवलेल्या आणि फक्त त्यांच्याकडूनच वाजवल्या जाणाऱ्या सुंद्रीचेच कौतुक नव्हे तर सोलापूरच्या कलावैभवाचा सन्मान झाला. सोलापूरसह महाराष्ट्रकर्नाटकच्या सीमाभागातील लोकसंगीतात आपल्या कलासाधनेने सुंद्री वाद्याला महत्वपूर्ण स्थान मिळवून दिलेल्या जाधव यांनी फक्त जयपूर ते भुवनेश्वर, जगन्नाथपुरी, कोलकाता आणि दिल्ली ते बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गुंटूर, वरंगल असे संपूर्ण भारतातच नव्हे फ्रान्स, बेल्जियम या पाश्चिमात्य राष्ट्रांतील महोत्सवांतही भारताचे प्रतिनिधीत्व आणि सुंद्री वादनाने युरोपियन रसिकांना मंत्रमुग्ध करत सोलापूरच्या कलावैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
जन्मकथा : बाॅबीन ते सुंद्री
सनईची छोटी बहीण मानली जाणारी सुंद्री सोलापूरच्या ग्रामीण भागात जन्मली, सोलापूर शहराच्या बहुविध सांस्कृतिक वातावरणात वाढली आणि ती देशाच्या बाहेरही पोहोचली. तिच्या जन्माची चित्तरकथाही तितकीच चित्तवेधक आहे. आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील परंपरागत सनईवादक भीमण्णा जाधव (भीमण्णा यांचे पणजोबा) हे रोज २४ किलोमीटर पायी ये - जा करत सोलापुरातील जुनी मिलसमोर टोपल्या विकून उदरनिर्वाह करायचे. मिलमध्ये बाॅबीन ठेवण्यासाठी या टोपल्यांचा वापर केला जायचा. १८९५ च्या सुमारास एकेदिवशी चुकून टोपल्यांमध्ये काही बाॅबीन आल्या. दुसऱ्या दिवसापासून मिलमध्ये संप सुरू झाला. त्यांच्या पत्नीने त्यांना उरलेल्या टोपल्या शेजारच्या गावांमध्ये विकून येण्यास सांगितले तेव्हा त्यांचे लक्ष त्या बाॅबीनकडे गेले. ते मिलच्या व्यवस्थापकांकडे परत करावे, हा विचार होता. मात्र, मिल बंद असल्याने ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे ते सनईची रीड दुरुस्त करू लागले. त्यावेळी त्यांचा मुलगा बाबूराव याचे त्या बाॅबीनकडे लक्ष गेले आणि त्याला काही छिद्रे मारुन पत्ती बसवून वाजवल्यानंतर सुस्वर उमटले आणि या अनोख्या, सुषिर लोकवाद्याचा जन्म झाला.
सुंदर ती सुंदरी
कालांतराने रोजगारासाठी सोलापुरात स्थायिक झालेले बाबूराव, लक्ष्मण आणि सिद्राम हे बंधू सुंद्रीसह परंपरागत सनई, ढोल, ताशा याचे सामुदायिक वादन करायचे. अक्कलकोटचे तत्कालीन संस्थानिक फत्तेसिंह महाराज यांनी एका समारंभात सुंद्रीवादनासाठी बाबूराव जाधव यांना आमंत्रित केले. तेथे २७ फेब्रुवारी १९३६ ला हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर फत्तेसिंह महाराजांची प्रतिक्रिया होती, सुंदर, सुंदर... त्यांनी वाद्याच्या नावाची विचारणा केली. त्यावर जाधव यांनी बाॅबीन असे सांगितले. तोपर्यंत या वाद्याचे नाव बाॅबीन हेच प्रचलित झाले होते. प्रतापसिंह महाराजांनी त्याचे सुंदरी (सनईत पुरुषतत्त्व तर सुंद्रीत स्त्रीतत्त्व असते.) असे नामकरण केले, जिचे पुढे अपभ्रंश होऊन सुंद्री बनली.
पंतप्रधानांनाही घातली भुरळ
बाबूराव यांनी सुंद्री जन्माला घातली, मात्र सिद्राम, त्यांचे चिरंजीव चिदानंद आणि नातू भीमण्णा यांनी आपल्या अथक साधनेने त्यांचा वारसा पुढे नेत त्याला वाढवले, सर्वसामान्य रसिकापासून संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांना त्याची भूरळ पाडली. बाबूराव यांच्या निधनानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी बागेवाडीकर हाॅस्पिटलच्या इमारतीत हिराबाई बडोदेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी बाहेर त्यांच्या स्वागतासाठी सुंद्रीवादनाकरिता सिद्राम जाधव यांना बोलावले होते. सुंद्रीवादनाने प्रभावित बडोदेकर हाॅलमधून बाहेर आल्या आणि त्यांना व्यासपीठावर नेऊन त्यांचा सन्मान केला.तसेच भागवत चित्रपटगृहात संगम चित्रपटाच्या प्रिमियरला पं. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा सनईवादनाचा कार्यक्रम होता. तर खालच्या हाॅलमध्ये सिद्रामप्पा यांचा कार्यक्रम. त्यावेळचे सिनेक्षेत्रातील दिलीपकुमार राज कपूर हे दोन्ही दिग्गज उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा कार्यक्रम सोडून सुंद्रीवादन ऐकण्यास खाली आले. त्याने मोहित दिलीपकुमार यांनी आपला कोट आणि राजकपूर यांनी रेश्मी फेटा सिद्रामप्पा यांना देत त्यांच्या कलेचा गौरव केला. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनीही शंकराची प्रतिमा चांदीचा चषक देऊन तर तुळजापूर येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुंदरी सम्राट अशा शब्दांत सिद्रामप्पा यांचा गौरव केला. ते प्लस ग्रेडचे आकाशवाणी कलाकार होते. त्यांनी बीबीसी लंडन, दूरदर्शन यावरुनही रसिकांसाठी सुंद्रीवादन केले. १९४२ मध्ये एचएमव्ही कंपनीने त्यांच्या सुंद्रीवादनाचे लाँग प्ले रेकाॅर्ड प्रकाशित केले.
सुंद्री आयफेल टाॅवरच्या भेटीला
त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव चिदानंद यांनी हा कलाप्रवाह वाहता ठेवला. त्यांनी घरगुती समारंभांसह आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम केले. पंडीत भीमसेन जोशी यांच्यासह संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचा स्नेह होता. त्यांना संगीत नाटक अकादमी, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक संस्थेने गौरवले. त्यांनीच कै. सुंद्री सम्राट सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच मुलगा भीमण्णा याच्यावर वयाच्या चौथ्या वर्षांपासून कलासंस्कार केले. भीमण्णाने तबला, हार्मोनिअम आदींचे संगीत शिक्षण घेत सुंद्रीवादनाचे धडे गिरवले. तसेच परिश्रमपूर्वक वयाच्या ३३ व्या वर्षी आकाशवाणीच्या ग्रेड कलाकारांमध्ये स्थान मिळवले. भोपाळच्या भारत भुवनमधील दुर्लभ, ग्वाल्हेरच्या तानसेन यासह देशभरातील प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आणि १९९८ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती भवनात अनोख्या सुंद्रीचा जादुई आविष्कार घडवतानाच फ्रान्स, बेल्जिअमच्या रसिकांवरही सुरांची मोहिनी घातली. फ्रान्समधील आयफेल टाॅवरसमोर उभा राहिल्यानंतर मातीचे भांडी विकणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा गौरव केवळ सुंद्रीमुळे मिळाला, या भावनेने भावविभोर होऊन माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळल्याचे भीमण्णांनी सद्गगदित होऊन सांगितले. तसेच आता अमेरिकेतील दरबार महोत्सवाद सुंद्रीवादनाची आस असल्याचे म्हटले. देशभरात विविध ठिकाणी पद्मश्री कोदंडराम, देवदत्त जोशी, कृष्णा बालेश, रोहन नायडू, संदीप चटर्जी, फ्रान्सचे लाँग्स यांच्याशी भीमण्णाच्या सुंद्रीची जुगलबंदीही रसिकजनांनी अनुभवली.
भारताच्या प्रजासत्ताकदिनी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या सनईवादनाने आकाशवाणीची सुरुवात व्हायची. त्यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये देशभरातील आकाशवाणी केंद्रांवरुन भीमण्णाचे सुंद्रीवादन प्रसारित झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे बिसिल्ला खाँ यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे दिला जाणारा पहिलाच युवा पुरस्कार भीमण्णा यांना प्रदान करण्यात आला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनीही जाधव कुटुंबियांचे गौरव करताना म्हटले आहे, 'आम्ही मोठी सनई वाजवतो, पण तुमच्या छोट्या सुंद्रीतही तेवढेच स्वरमाधुर्य आहे.' भीमण्णा यांना कला अकादमीसह अनेकविध फेलोशिप, शिष्यवृत्ती मिळाले असून अनेक पुरस्काराने गौरवले आहे. तसेच ते दिल्लीच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेवरही आहेत.
भीमण्णा हे सुंद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव संगीत सांस्कृतिक कला मंडळाच्या माध्यमातून सुंद्रीच्या प्रचार, प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांच्याकडे नऊ विद्यार्थी मोफत सुंद्रीवादनाचे धडे गिरवत आहेत. मात्र, त्यांची एक खंत आहे. त्यांच्या आजोबांनी पुणे, माढा येथील काहीना सुंद्रीवादनाचे धडे दिले. तीन पिढ्यांपासून त्यांच्या या कलेच्या प्रचार प्रसाराच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही 'सूर हेच ईश्वर' मानून त्यांची साधना सुरू आहे.






दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खून सत्रातील सूत्रबद्धता

कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून अमानुषपणे केलेल्या हत्येने केवळ कर्नाटकातीलच नव्हे तर देशभरातील प्रज्ञावंतांच्या मनावर आघात केला. शिक्षणवेत्ते आणि चिंतकांसाठी पोषक असलेल्या कर्नाटक आणि त्यातच शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारवाडमध्ये दिवसाढवळ्या ही हत्या व्हावी, ही खूपच शरमेची गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी अशाप्रमाणेच महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे अध्वर्यू, डावे विचारवंत नरेंद्र दाभोळकर आणि त्यानंतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली. डाॅ. कलबुर्गी हेही डाव्या विचारपरंपरेतलेच. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची वैचारिक पार्श्वभूमी, त्यांच्या हत्येची पद्धत आणि निवडलेली वेळ पाहता यात निश्चितच एक सूत्रबद्धता दिसते. साहजिकच वैचारिक विरोधक म्हणून डाॅ. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी आणि लिंगायत समाजातीलच एका गटाकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. पण तपासापूर्वीच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. दोन वर्षांनंतरही दाभोळकर , पानसरे यांच्या हत्येचा तपास लागला नाही. मारेकरी कोण, हेही अद्याप समजू शकले नाही. तसे डाॅ. कलबुर्गी हत्याप्रकरणातही होणार नाही, याची काळजी कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल.
डाॅ. कलबुर्गी हे साहित्यिक असले तरी त्यांचा मूळ पिंड हा संशोधकाचा होता. वचनसाहित्य, हरिदास कीर्तन, शिलालेख, हस्तलिखित, जानपद(लोकगीत), कन्नड भाषा व इतिहास या विषयात त्यांनी अपार संशोधन केले. त्यांच्या लेखन व वैचारिकतेने कर्नाटकाची प्रज्ञा बहरली. त्यांनी संशोनात्मक तथ्ये कोणतीही भीडभाड न ठेवता निर्भीडपणे मांडली. परखडपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. डाॅ. कलबुर्गी हे शरण (लिंगायत) साहित्य संशोधन क्षेत्राला मिळालेली मोठी देणगी होती. शरण साहित्याशी संबंधित अनेक हस्तपत्रे मठांमध्ये पडून होती. त्यांचा निरंतर शोध घेऊन व वाचून त्याचे संपादन केले. लोकभाषेत जागतिक मूल्ये, मानवतेचा उद्घोष करणाऱ्या शरणांची वचने २३ भाषांमध्ये भाषांतरित व संपादनाचे कार्य त्यांच्या संपादकत्वाखालीच झाले. आता १३ भाषांमधील साहित्य प्रकाशित होऊन वचनसाहित्य जनमनात पोहोचण्याच्या मार्गावर असतानाच एक लोकाभिमुख संशोधक, चिंतक मारेकऱ्यांच्या गोळीचा बळी ठरला, हे दुर्दैव व शरण साहित्याची मोठी हानी आहे. त्यांनी विजयपूरच्या आदिलशाही राजवटीच्या साहित्याविषयी केलेले संशोधन अपूर्व आहे.तसेच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दुष्प्रथा, वाईट परंपरांच्या विरोधात आवाज उठवत समाजमनातून त्या हद्दपार करण्यासाठी अविरत कष्ट घेतले.
अशाप्रकारे विशेषत: कन्नड साहित्याची अमूल्य सेवा केलेले आणि संशोधन क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवलेले डाॅ. कलबुर्गी हे सरळ,सज्जन व्यक्तिमत्त्व होते. बुद्धिमंतांमध्ये दुर्मीळ असणारे उत्तम व्यक्तित्व,निगर्वी स्वभाव व उच्च विचार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. महात्मा बसवेश्वर म्हणतात, "मजहून नसे कोणी सान, शिवभक्तांहून नसे कोणी थोर,तुमच्या शरणांची साक्ष, माझ्या मनाची साक्ष, कूडलसंगमदेवा, मज हेचि प्रमाण " शिवशरणांचे हे विचार ते प्रत्यक्ष जगले. कधीही वयाचा,विद्वत्तेचा लेशही मनात न बाळगता नवतरुणांच्याही खांद्यावर हात टाकत त्यांना संशोधनकार्याशी जोडले. त्यांच्या या अजातशत्रुत्व स्वभावामुळे त्यांच्या हत्येमागे अन्य कारण असणे शक्यच नाही. त्यांचे विचार, साहित्य व संशोधनाला विरोध करणाऱ्यांनीच त्यांची हत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. त्यामुळे याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. जर ते सत्य असेल देशातील वैचारिक क्षेत्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. हिंसेने कोणताही विचार व वैचारिकता संपणार नाही. प्रबुद्ध समाजात विविध विचारांचा आदर व्हायला हवा. ते स्वीकारायचे की नाही, हा वैयक्तिक विचार आहे. त्यांची हत्या कशामुळे झाली, हे तपासातून निष्पन्न होईल. जर वैचारिक असहिष्णुतेतून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यास शरमेने खाली मान घालायला लावणारी बाब आहे. वैचारिक मतभेदातून ब्लाॅगरची हत्या करणाऱ्या बांग्लादेशात आणि आपल्यात कोणताच फरक राहणार नाही.
मात्र, विचारांची लढाई विचारांनेच लढावी, हे सांगताना सर्वच विचारधारेच्या विचारवंतांनीही मर्यादा पाळायला हवी. हत्या ही निषेधार्हच आहे. केवळ शस्त्राने केलेली हिंसा हीच हिंसा नव्हे तर अविवेक ही ही एकप्रकारची हिंसाच आहे. गेल्या काही वर्षात पुरोगामी म्हणजे विशिष्ट धर्माचा, त्यांच्या प्रतीकांचा विकृत विरोध अशी विचारवंतांची धारणा बनली आहे. एखाद्या धर्मातील वाईट गोष्टींवर प्रहार करायला हवा. ती समाजपरिवर्तनाची गरजच नव्हे तर अपरिहार्यताही आहे. मात्र,संवैधानिक हवाला देत त्याने प्रदान केलेल्या अधिकारांवरच प्रहार करणे कोणालाही रुचणार नाही. त्यामुळे उलट समाजविघातक शक्तींनाही बळ मिळेल. स्वामी विवेकानंदांसह अनेक समाजधुरिणांनी आजच्या विचारवंतांच्या तुलनेने अधिक कठोरपणे तत्कालीन समाजव्यवस्थेवर, त्यातील चुकीच्या बाबींवर, प्रसंगी धर्मावरही आघात केले. ते समाजालाही उशिरा का होईना मान्य करावे लागले. डाॅ कलबुर्गी हे खुप मोठे विद्वान होते. त्यांच्या विद्वत्तेविषयी तीळमात्र शंका नाही. परंतु गेल्या तीन दशकांत ते अनेकदा वादग्रस्त ठरले.
 अनंतमूर्ती यांनी देवमूर्तीवर केलेल्या मूत्रविसर्जनाचा संदर्भ देत त्यांनी अनंतमूर्ती यांनी केलेला प्रयोग कोणीही करावे, असे सांगत देवताशक्ती बोगस असल्याचा केलेला वक्तव्य असो, त्यांच्या मार्ग या संशोधनखंडातील क्रांतियोगी श्री बसवेश्वर यांचे भाचे चन्नबसवण्णा यांच्याविषयीचा अवमानकारक उल्लेख याचे कोणी समर्थन करू शकेल का? परंतु ज्यांचे प्रबोधन करुन जागृती घडवून आणायची, ज्यांच्यात परिवर्तन घडवायचे त्यांना भडकवायचे का, याचाही विचार व्हायला हवा.
व्यक्ती कोणत्याही विचारधारेचा असो. या हत्या निश्चितच निंदनीय आणि निषेधार्ह आहेत.  मात्र यानिमित्ताने जाती-जातीमध्ये विष कालवण्याचे उद्योग फोफावू नये, याची काळजी सुज्ञांनी घेणे गरजेचे आहे.

विवेकानंदांच्या स्वप्नातील युवा घडवणारा अनोखा उपक्रम


२५, २६, २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत देशभरातील युवकांचे कन्याकुमारी येथे सार्थक युवा समर्थ भारत हे शिबिर झाले. संपूर्ण देशभरातून ६८० युवक - युवती यात सहभागी झाले होते. युवा शक्तीतील सेवाभाव जागवणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या जन्मशती पर्वानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे तीन सागरांच्या संगमावर २५, २६ व २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवसांत तप केले होते. त्या तपश्चर्येअखेर स्वामीजींना आपले जीवितध्येय गवसले. या राष्ट्रचिंतन पर्वकाळाचे औचित्य या शिबिराला लाभले होते. विवेकानंद म्हणतात, पावित्र्याच्या तेजाने झळाळलेले; ईश्वरनिष्ठेचे वज्रकवच ल्यालेले, मृगेंद्राची हिंमत असलेले आपल्या पीडत, दु:खित, पददलित समाज बांधवाविषयी करुणा असलेले असे लक्षलक्ष युवक युवती मुुक्तीचा, सहकार्याचा, सामाजिक उत्थानाचा, एकात्मतेचा संदेश देत साऱ्या भारतभर संचार करतील तेव्हाच भारताचा भाग्योदय होईल. स्वामीजींच्या राष्ट्रचिंतन पर्वकाळातील हे शिबिर त्यांच्या स्वप्नातील युवक घडणीसह त्यांच्यात त्यांंना अपेक्षित सेवाभाव जागवणारे ठरले.
कन्याकुमारी येथील सागरतटावर हिरवाईने नटलेला विवेकानंदपुरमचा विस्तीर्ण असा परिसर. येथे २४ डिसेंबर रोजी आसाम, अरुणाचलपासून गुजरातपर्यंतच्या, हरयाणापासून केरळपर्यंतच्या तरुण - तरुणी झुंडी - झुंडीने दाखल झालेल्या. नोंदणीनंतर देशभरातल्या विविध प्रांतातील शहर, गावावांमधून आलेल्या या तरुण-तरुणी वेगवेगळ्या मंडल व गणश: शिस्तीने बसलेल्या. भजनसंध्येत ओंकाराच्या एकत्रित उच्चारातून एकत्वाचे दर्शन. दरम्यान, सगळ्यांनी आपाापले मोबाईल बंद आणि ते गणप्रमुखांकडे सुपूर्द करुन शरीर, मनाने स्वघडणीसाठी सिद्ध झालेले.
दुसऱ्या दिवसापासून मुख्य शिबिराला सुरुवात. पहाटे साडेचारला उठून योगसत्रासाठी तयार झालेले. आपापल्या गणप्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार शिस्तीने रांगेत मार्गस्थ होताहेत. पहाटेच्या नीरव शांततेत कौन चले भाई कौन चले, स्वामीजी के वीर चले, भारत माता की जय, आज के आनंद की, जय विवेकानंद की आदि उत्साहपूर्ण घोषणा, त्यानंतर मंथन, गणश: चर्चा, मंडलश: सादरीकरण, क्रीडायोग, भजनसंध्या असे रात्री दहापर्यंत शिबिराचा दिनक्रम. सारे काही शिस्तीत, वेळेवर आणि गणप्रमुखांच्या सूचनेनुससार, एकत्वाने. स्वामी विवेकानंद म्हणतात, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करणे हे आपल्या मुळी स्वभावातच नाही. या दोषामुळेच तर आपली ही दुर्दशा झालेली आहे. ज्याला आज्ञा पाळायची कशी ते समजते, त्यालाच आज्ञा कशी द्यावयाची हे समजते. प्रथमत: आज्ञाधारकपणा शिका.
विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरन, उपाध्यक्ष बालकृष्णन व ६५ हजार तरुणांना रोजागार दिलेले भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. गायकवाड यांनी विवेकानंदांच्या विचाराने जीवनाला दिशा मिळाल्याचे सांगत आपल्या सफल व सार्थक जीवनाचे अनुभव कथन केले. तर परमेश्वरन यांनी वंचित लोकांची सेवा करणे ही प्रत्येक मनुुष्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कर्तव्य हे एका दिवसाचे कार्य नव्हे तर समर्पण व नित्य साधनेने कर्तव्य भाव प्रगट होईल. तर बालकृष्णन म्हणाले, देशवासियांमध्ये त्याग व सेवाभाव जाग्रत झाला तरच भारत जगद्गुरू बनेल.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. त्यांनी मार्गदर्शनाअभावी तरुण मागे राहत असल्याचे सांगतानाच कुटुंबियांसह सेवाकार्याशी जोडण्याचे आवाहन केले. यावेळी केंद्राच्या उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी शिवसुंदर नवसमाज घडवण्यासाठी आणि राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी समर्पित वृत्तीने सेवाकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, तीन दिवसांत तरुण - तरुणींनी सेवाविषयक विविध आयामांवर गणश: चर्चा केली. मंडलश: सादरीकरणातून तरुणाईच्या विकसित व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले. सफलता, सार्थकता, सेवा की अवधारणा, महान त्याग से महान कार्य या विषयांचा मंथनात समावेश होता. तसेच सफलता से सार्थकता, शिवसुंदर नवसमाज विश्ववंद्य हम गढें, मन, वाचा, कर्म से सदैव एकरुप हो, नवगौरव इतिहास रचें अब अपनी ही बारी है यावर बी. निवेदिता, केंद्राचे सरचिटणीस भानुदास धाक्रस, शिबिर प्रमुख सौमित्र पुजारी यांचे बौद्ध्रिक झाले.
केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या जन्मशतीनिमित्त केंद्राने युवा कौशल्य विकासाचा कार्यक्रम अाखला होता. त्याअंतर्गत कथा शिलास्मारकाची यावरील पीपीटी, भारतीय संस्कृती परीक्षा आदी उपक्रमांतून केंद्राच्या अनेकविध सेवकार्यात सहा महिने कार्यरत तरुण - तरुणींची या शिबिरासाठी निवड केली होती. जन्मशती पर्वाचा समिधा कार्यक्रमाने त्यापूर्वीच समारोप झाला असला तरी या शिबिराने त्याचा खऱ्या अर्थाने समारोप झाला. शिबिरातील तिसऱ्या दिवशी एकनाथजींंच्या समाधीस्थानी समर्पणाचे आयोजन करण्यात आले होते. सेवाकार्याने राष्ट्रीय भावना व सांस्कृतिक बंध घट्ट करणाऱ्या या कर्मयोग्याच्या समाधीस्थळावर नतमस्तक होेताना सहभागी बंधू, भगिनी मनोमनी या शिबिराचे गीत गुणगुणत होते,
सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले।
ध्येय महासागर में सरितरुप हम मिले।
लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभयगान है।
सेवारत व्यक्ति व्यक्ति राष्ट्र का ही प्राण है।

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...