Monday 4 September 2023

परमज्ञानी श्री सिद्धेश्वर स्वामीजी

 


३ जानेवारी २०२३

भगवद्गीतेतील १३ व्या अध्यायाचे निरुपण करताना आर्ज्य या शब्दाविषयी बोलताना कर्नाटकातील चिंतक चक्रवर्ती सुलिबेले म्हणतात, खरे ज्ञानी कसे असतात, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. अशाप्रकारचा परमज्ञानी मी पाहिलोय. त्यांचे सानिध्य सतत आनंददायी वाटते. ते केवळ सिद्धेश्वर स्वामी मात्र. त्यांनी आतापर्यंत कोणातही दोष पाहिल्याचे बघितलो नाही. ते खूप दुर्मिळ व्यक्ती. कोणीही असो, त्यांच्यात छोटेसे दोष असले तरी त्यांनी ते दोष म्हणून दाखवल्याचे मी कधीच पाहिलो नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप वैशिष्ट्यपूर्ण. ज्ञानाकडे जाता - जाता मनुष्य कसा पक्व बनतो, याचे एक चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे. उदाहरणे अनेक असतील, मात्र आताही आपल्या डोळ्यांसमोर असलेले दुर्मिळ व नि:संशय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामी होत. 

यावरुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांची ज्ञानश्रेष्ठता दिसून येते. ज्ञानदान हेच श्रेष्ठदान मानलेले स्वामीजी शरणश्रेष्ठ अल्लमप्रभू देव यांच्या ज्ञानपथावरुनच चालत राहिले. त्यांच्या वचनसाहित्यावर स्वामीजींनी सिद्ध केलेला ग्रंथ शरणजनांना पथदर्शक ठरला आहे. 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्यापूर्वी स्वामीजी अंतिम संदेशात अल्लमप्रभू देवांच्या वचनाचाच उल्लेख करतात, 

'सत्यवू इल्ल, असत्यवू इल्ल

सहजवू इल्ल, असहजवू इल्ल

नानू इल्ल, निनू इल्ल

इल्ल इल्ल एंबुदु तानिल्ल

गुहेश्वरनेंबुदु ता बयलु. 

आपण बसवण्णा, अल्लमप्रभू देव, चन्नबसवण्णा या शरणांसह ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकरदेव, तुलसीदास आदी भारतातील अनेक  संतश्रेष्ठांची नावे ऐकली. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना ते विचार आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती संतमंडळी कशी असतील, याची कल्पना ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना पाहिल्यावर आली. अशा संतश्रेष्ठाच्या काळात आपण जन्माला आलो, त्यांना पाहिलो, त्यांचे आध्यात्मिक विचार ऐकलो,  त्यांच्या सान्निध्यात काही क्षण राहिलो, त्यांच्याकडून ज्ञान मिळविता आले, हे आमच्यासाठी आमच्या जीवनातील सर्वात मोठे संचित व पुण्यप्रद म्हणावे लागेल. 

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...