Wednesday 14 March 2018

ते परतले...कारण त्यांना केरळ वाचायला हवा होता



केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
आता मी शिकवलेले पुरे म्हणून एक गुरू आपल्या शिष्याला बोलावून परीक्षा घेतो. त्याला कठीण लक्ष्य साधण्याची सूचना देतो. शिष्य अनुकूल जागी उभा राहून लक्ष्यावर बाण सोडतो. लक्ष्यभेद होते. शिष्य आनंदित होतो. मात्र, गुरू कौतुक करत नाही. आणखी शिकवायचे राहिलेय हे समजून शिष्याला आणखी लक्ष्य दाखवतो. तसेच कधीही तुटून पडेल अशा सेतूवर उभा राहून धनुष्यबाणाने ते लक्ष्य साधायला सांगतो. तो सेतू पाहताच शिष्याच्या अंगाचा थरकाप उडतो. कारण तेथून बाण सोडणे दूरच, तेथे चढणेच कठीण होते. चढले तरी त्याचे वजनही पेलायची त्या सेतूची क्षमता नव्हती. शिष्य लक्ष्यभेदापासून मागे हटतो. लक्ष्यभेदापेक्षा त्या ठिकाणाहून बाण सोडणे हेही तितकेच महत्वाचे, आपल्या पायाखालची जमीन घट्ट असताना सर्व काही चांगले असते, याचा बोध गुरू शिष्याला करुन देतो. शिष्याचा अहंकार संपतो.
ही कथा नीतिकथा की कटुकथा हे माहीत नाही. मात्र, ही कथा ऐकतो तेव्हा केरळ आठवते. राक्षसी कम्युनिस्टांमुळे सतत प्राण गमावणाऱ्या केरळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आठवण होते. आश्चर्य वाटते. एकीकडे जिहादी धर्मांधांची दहशत, दुसरीकडे कम्युनिस्टांचे सत्ताप्रेरित खूनसत्र. रा. स्व. संघाची धुळधाण व्हायला पूरक वातावरण आहे. सकाळी शाखेवर गेलेल्या मुलाला तो घरी परतेल, हा विश्वास नाही. त्याला शाखेवर पाठवलेल्या कुटुंबियांनाही तो विश्वास नाही. अशात  केरळमध्ये देशात सर्वाधिक शाखा आहेत!
शतकानुशतके निरंतर मतांध आणि बाहेरील देशांतून आलेल्या व्यापाऱ्यांच्या थेट आक्रमणाला बळी पडून केरळ अजूनही केरळ म्हणूनच आहे! ही भूमी अस्तित्व आणि आपले ऐश्वर्य टिकवून आहे. कम्युनिस्टांची सत्ता असली तरी केरळात संस्कृती टिकून आहे. याला केरळमधील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अविश्रांत श्रम हेच कारण आहे. धनदांडग्यांच्या पायावर लोटांगण न घालणाऱ्या नि:स्वार्थ कार्यकर्त्यांची अविचल निष्ठाही यामागे आहे. धर्मासाठी प्राणही देईन, हे धैर्य यामागे आहे. मल्याळींच्या या गुणानेच केरळला वाचवले आणि घडवले आहे. ते गुणच आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे वैभव सुरक्षित राखले आहे.
काही व्यक्तिंनी अशा गुणवान स्वयंसेवकांना घडवले. संघर्षाच्या वातावरणात फक्त प्रतिकार आणि हिंसाच जन्म घेते. तसेच ते कोणाच्याही प्रेरणेविना जन्मतात, हे केरळच्या रा. स्व. संघाच्या नेत्यांनी ओळखले होते. प्रतिकार आणि हिंसा संघटनेला बळ देईल, परंतु केरळची जडणघडण होणार नाही, हे सत्यही त्यांनी जाणले होते. त्यामुळे संघर्षाच्या वातावरणातही स्वयंसेवकांत वैचारिक जागृती घडवणारे काही महान नेते केरळमध्ये जन्मले. तसेच, योगायोगाने अशीच मंडळी केरळला आली. एकेकाळी नारायण गुरू यांनी राज्यात केलेली सामाजिक क्रांती विसरुन लोक साक्षात नारायण गुरू यांनाच सोन्याच्या चौरंगावर बसवून पूजा करत होते. तेव्हाच लोकांनी नारायण गुरू यांच्या विचारांना तिलांजली दिली होती. त्याच वेळेस कम्युनिस्ट नावाचे भयंकर हलाहल राज्याला संपवू पाहात होती. त्या काळात नारायण गुरुंच्या विचारांचे रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी पुनरुज्जीवन केले. त्याच वेळेस महाराष्ट्रातून गेलेले पी. माधवजी नावाच्या रा. स्व. संघाच्या एका समर्पित कार्यकर्त्याने नारायण गुरू यांच्या विचारांवर आधारित तंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्या माध्यमातून शुद्र मानले गेलेल्यांनाही पुरोहित म्हणून नेमण्याचे कार्य सुरू केले. साहजिकच कम्युनिस्टांनी याला विरोध केला. त्यांच्यासह नारायण गुरुंना जातीच्या चौकटीत बांधून ठेवलेल्या लोकांनीही विनाकारण माधवजींच्या धोरणाला विरोध सुरू केला!
एम. ए. कृष्णन हे आणखी एक प्रचारक. यांच्या परिश्रमामुळे आज केरळमध्ये श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील मुलांचे दरवर्षी सुमारे तीन हजार मिरवणुका निघतात. या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन पुढे बालगोकुलम् नावाची चळवळ सुरू झाली. या बालगोकुलमची लोकप्रियता इतकी आहे की त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मुलेही सहभागी होतात. त्यामुळे चवताळलेल्या कम्युनिस्टांनी बालसंगमम् सुरू केले! केरळमध्ये रा. स्व. संघ समाजाच्या जवळ आहे. कम्युनिस्ट सत्ता हाकत असले तरी समाजापासून दूर आहेत. संघर्षाच्या वातावरणातही रा. स्व. संघाने आपली न विसरलेली वैचारिक शक्ती हे यामागचे कारण आहे.
केरळमध्ये अशा प्रकारचे वैचारिक नविनर्माण केलेली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पी. परमेश्वरनजी होय. पी. परमेश्वरनजी यांच्यामुळेच केरळमध्ये काही सामाजिक बदल झाले. केरळमधल्या विचित्र सामाजिक वातावरणात रा. स्व. संघाला तीव्र विरोध होता. अस्तित्व टिकवणे हेच मुख्य असतानाच्या काळात सामाजिक चिंतक म्हणून समस्त केरळचे सत्व पुनरुज्जिवित केलेले महात्मा म्हणजे पी. परमेश्वरनजी. हे केवळ रा. स्व. संघालाच नव्हे तर समस्त केरळसाठी वाळवंटात सापडलेल्या झऱ्यासारखे आहेत. ते नवी आशा आहेत. कारण पी. परमेश्वरन रा. स्व. संघाचे प्रचारक असले तरी केरळचे प्रसिद्ध चिंतक म्हणूनच नावाजलेले आहेत.
केरळमध्ये ते लिहित नसलेली वृत्तपत्रे नाहीत. त्यांना संधी न देणाऱ्या दूरचित्रवाहिन्याच नाहीत. त्यांचा सन्मान न करणारा कम्युनिस्टही नाही. असा चिंतक रा. स्व. संघ वगळता अन्य कोणत्या संघटनेत सापडेल? केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
केरळमध्ये कर्कटकं मास म्हणजे धो धो कोसळणारा पाऊस. फेसाळत येणारा समुद्र. किनाऱ्यावरील वादळ. या महिन्यात शुभ समारंभ नाहीत. आतापर्यंत न दिसणारे आजार कर्कटकं महिन्याचीच वाट पाहत होते का, असे वाटावे अशा प्रकारे पसरतात. रोग्यांना जास्तीत जास्त मरणाचे भय वाटते. जेथे तेथे भूस्खलन, दरड कोसळणे, आजार, मृत्यू, हातांना काम नाही, सर्वत्र अपशकुन. सोबतच सूर्यदर्शन नाही. एकूणच मल्याळींच्या वाट्याला कर्कटकं मास म्हणजे अशुभ मास. हजारो वर्षांपासून त्यांच्यात रुजलेली ही भावना काळानुसार परंपराच बनून गेली. काही गोष्टींचे आचरण करायचे नाही, हे नियम बनले होते. शुभ समारंभ करायचे नाहीत. कर्कटकं मासात नव्या कार्याची सुरुवात करायला मल्याळी घाबरत होते. केरळमध्ये झालेल्या कोणत्याही सुधारकाला हे अशुभ मास शुभ मासात परिवर्तित करणे साध्य झाले नाही. कम्युनिस्ट वर्षानुवर्षे सत्तेत राहिले तरी त्यांनी अशुभ मासाला आणखी अशुभ बनवून ठेवले. विचित्र गोष्ट म्हणजे कालौघात कर्कटकं मासाला आणखी नवीन वाईट गोष्टी चिकटल्या. काही देवस्थानांमध्ये काही पूजाही करायच्या नाहीत, हे नियमही त्यात शिरले.
मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्कटकं मासाविषयी असलेली ती भावना बदलली आहे. अशुभ म्हणून ओळखला जाणारा कर्कटकं मास आतता केरळमध्ये रामायण मास बनला आहे. केरळातील प्रत्येक हिंदू घरात, प्रत्येक लहान आणि मोठ्या देवस्थानांमध्ये संपूर्ण महिनाभर रामायण पठण चालते. महिन्याच्या शेवटी पठण संपते. काही संघ, संस्था सामुदायिक रामायण पठण आयोजित करतात. रामायण पठणमुळे यापूर्वी लोकांच्या मनात घर केलेले अशुभ असे सर्व नियम गायब झाले आहेत. दिनदर्शिकेतही कर्कटकं मास रामायण मास म्हणून छापले जात आहे. या बदलाच्या मागे हाेते पी. परमेश्वरनजी.
भारतीय विचार केंद्राचे संचालक म्हणून केरळचे वैचारिक विश्व समृद्ध करण्यासाठी परमेश्वरनजींनी पुढाकार घेतला. भारतीय विचार केंद्र आज केरळच्या वैचारिक आणि संशोधन क्षेत्राची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. जाती आणि इतर संकुचित भिंतींच्या पलिकडे जाऊन दरवर्षी विचार केंद्रात हजारो युवक इतिहास, तत्त्वशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय, शिक्षण, पर्यावरण, विकास आणि सामाजिक परिस्थिती याविषयी अध्ययन करतात. केरळमध्ये विचार केंद्राच्या ३० शाखा आहेत. विचार केंद्र केवळ भारतीयता प्रसाराचे कार्य करते. प्रामाणिक धर्मनिरपेक्ष संस्कृती नष्ट करत नाही, जी हिंदुत्वासारख्या खऱ्या धर्मनिरपेक्षतेला पोषक आहे. त्यामुळे ते संस्कृतीपूजक आहे, हे सत्य अनेक कम्युनिस्ट विचारवंतांमध्ये निर्माण करण्यात विचार केंद्र यशस्वी झाले आहे. मार्क्स आणि विवेकानंद, मार्क्स ते महर्षी, हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने यासह १२ पुस्तके लिहिलेल्या परमेश्वरनजी यांची सर्व पुस्तके केरळच्या वैचारिक जगतात चर्चेचे विषय ठरले आहेत. मात्र, कोणतेही पुस्तक विवादास्पद ठरले नाही. कारण परमेश्वरनजी यांच्या विचारांचा कस लावणारे कम्युनिस्ट अजून जन्माला आले नाहीत.
गेल्या १५ वर्षांपासून विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष असलेले परमेश्वरनजी केंद्राला राष्ट्राची बांधणी करणारे अस्त्र बनवले. केरळ आणि तमिळनाडूमध्ये विवेकानंद केंद्राच्या उपक्रमांमुळे धर्मांतराचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले. इतकेच नव्हे, चर्चला जाणारे अनेक लोक आता रविवारी विवेकानंद केंद्रात जाऊ लागले आहेत. ईशान्येतील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, अंदमानातही विवेकानंद केंद्र शाळा, बालवाड्या, वनवासी क्षेत्रात आनंदालये चालवत आहे.
१९२७ मध्ये जन्मलेले परमेश्वरनजी इतिहासाचे पदवीधर आहेत. १९५७ मध्ये भारतीय जनसंघाचे कार्य सुरू केले. १९६८ मध्ये केरळ राज्य संघटना सचिव होते. पुढे अखिल भारतीय सचिव बनले. जनसंघाचे अध्यक्षही झाले. आणिबाणीनंतर राजकारणापासून विन्मुख होऊन जन्मभूमी केरळला परतले. कारण पुन्हा कोणी केरळला वेड्यांचा बाजार म्हणणे परमेश्वरनजी यांना आवडणारे नव्हते. कम्युनिस्ट रक्तपात करत असलेल्या या भूमीत करण्यासाठी अनेक कार्ये बाकी होती. त्याची फलश्रुती म्हणजे आजचे केरळ होय. आजही केरळने आपले स्वत्व टिकवून ठेवावे यासाठी परमेश्वरनजी हे केरळला परतायलाच हवे होते.
अशा परमेश्वरनजी यांचे वय आज ९० वर्षे आहे. केरळच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रिय परमेश्वरनजी यांच्या नवती उत्सवाचे आयोजन केले. उत्सव वर्षभर चालणार आहे. हा मोठा सन्मान आहे. केरळचे स्वयंसेवक शिष्टाचाराबाहेर जाऊन हा उत्सव करत आहेत, हे त्या व्यक्तीचे महत्व स्पष्ट करते. ते प्रेम, गौरव मोडक्या सेतूवर उभे राहून लक्ष्य साधण्यासाठी बाण सोडलेल्या परमेश्वरनजी यांना नव्हे तर मग आणखी कोणाला लाभणार?
संतोष तम्मय्या
साभार : होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...