Thursday, 2 February 2023

सुख, समृद्धी आणणारा जोकुमार






साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांचं एक नाटक. सुरुवातीला नांदी झाल्यावर एक सूत्रधार येतो. त्याला आणखी एकजण येऊन मिळतो. सूत्रधाराने समोर खाली एक बांबूपासून बनवलेली टोपली ठेवलेली असते. त्या टोपलीत आतील बाजूला गोलाकार कडूनिंबाचा पाला लावलेला असतो. त्यात मध्यभागी उभा दूधी भोपळा ठेवलेला असतो. ते लिंगाच्या आकारासारखे असते. दुसरा त्या सूत्रधाराला विचारतो हे काय ? त्यावर सूत्रधार उत्तरतो, 'हा आमचा देव.' पुन्हा दुसरा विचारतो, 'देवांचे स्वरुप, त्यांची नावे वेगळी असतात, हा कसला देव?' सूत्रधार सांगतो, 'देवाविषयी अशी प्रश्ने विचारू नयेत.' का ? तुमचा देव विशेष आहे का, असा सवाल तो दुसरा पात्र विचारतो. त्यावर सूत्रधार उत्तरतो, 'होय, हा खूप विशेष देव आहे. सर्वांना जीवन देणारा देव आहे. सर्वांना जीवनमार्ग दाखविणारा देव आहे. तसेच सर्वजण मानतात, असा हा देव आहे.'

'पूजा केल्यावर हा देव काय काय फळे देतो,' असा सवाल तो दुसरा करतो. त्यावर सूत्रधार सांगतो, पूजा केल्यावर हा देव अपत्य नसलेल्यांना अपत्य देतो. वांझ असलेल्यांचेही भाग्य खुलते. त्याशिवाय विधवांनाही पती मिळण्याचे भाग्य लाभते.' हा संवाद ऐकून प्रेक्षक स्तब्ध होत या नाटक व देवाविषयी आश्चर्य व्यक्त करतानाच ते जाणून घेण्यासाठी उत्साहित होतात. या नाटकातील देवदासी शारी, पाटलीण या पात्रांच्या माध्यमातून महिलांचे शोषण, त्यांची घुसमट मांडली आहे. त्याला वैचारिकदृष्ट्या अनेक कंगोरे आहेत. मात्र,  आपला मुख्य विषय आहे तो या नाटकाचे नाव असलेला तो देव. ज्याचे नाव आहे, "जोकुमारस्वामी." 

या आधुनिक नाटकातच नव्हे तर ११ व्या शतकापासून  कन्नड साहित्यात जोकुमारचा उल्लेख आढळतो. 'जातकतिलक (इ. स. १०४९), जीवसंबोधने (१२००), नेमिनाथ पुराण (११८०), समयपरीक्षे, बसववचन (१२२२), पार्श्वपुराण (१७६६) यांचा त्यात उल्लेख करावा लागेल. श्रीधराचार्य विरचित 'जातकतिलक'मध्ये म्हटले आहे,

भवनांतदोळ सुरासं।

भवनिगे काणिदिरे सौम्यदिरे पापगणं।।

नव पंचदोळ पुट्टिद कुवरं।।

जोकुमारनंते परिदिवसमिरं।। 

म्हणजे  इ. स. १०४९ च्या आधीही जोकुमार परंपरा होती, हे यावरुन दिसून येते.  गेल्या हजार वर्षांपासून 'जोकुमार'ने  जानपदसह कन्नड साहित्याचेही लक्ष वेधून घेतले आहे.  तसेच शिवराम कारंथ यांनीही जोकुमारविषयी लेखन केले आहे. जोकुमार म्हणजे पुत्र, बालक, युवक होय. 

आपल्याकडे संपूर्ण जगताचे भरणपोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या भूमातेची पूजा करण्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा चालत आली आहे. एका ऋतूत मातीची पाचवेळा पूजा केली जाते. कारहुणवीनंतर आषाढात मातीचे बैल, गुळ्ळव्वाची पूजा, नागपंचमीला वारुळ, मातीच्या नागमूर्तिची पूजा, गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीची पूजा, जोकुमारची पूजा केली जाते, हे आपण मागे गुळ्ळव्वाच्या लेखात पाहिले आहे. आता गणेशोत्सव सुरू असतानाच मात्र त्याच्यानंतर येणारी आणि शेवटची मातीची म्हणजेच मातीच्या मूर्तीची पूजा म्हणजे जोकुमार. गणेशोत्सवाच्या चौथ्या - पाचव्या दिवशी भाद्रपद अष्टमीला याचा जन्म होतो. विशेषत: उत्तर कर्नाटकासह सीमाभागातील  कोळी, परीट आदी समाजाच्या महिला जोकुमारची मूर्ती असलेली टोपली डोक्यावर घेऊन घरोघरी जातात. भीती वाटावी, असे मोठे विस्फारलेले डोळे, विस्तारलेला भालप्रदेश, जाड ओठ, त्यात भरलेली लोणी, पाहताक्षणीच लक्ष वेधणारे मोठे नाक, जाड मिशा, शिवाय त्याच्या लैंगिक शक्ती व कामुकतेचे संकेत असलेले बृहदाकार शिश्न. त्या संपूर्ण मूर्तीला लावलेले हळद हे जोकुमारच्या मूर्तीची वैशिष्ट्ये. तर त्याला कडूनिंबाच्या पाल्याने अलंकृत करुन टोपलीत बसवलेले असते. घरोघरी लोणी, खोबरे, धान्य देऊन त्याची पूजा केली जाते. दरम्यान महिला गातात, 


१. 'जोकुमार हुट्टली, लोकवेल्ला बेळगली

आ तायी हालू करेयली, कट्टीद मोसरु कटियली नम्म देवी...'


२. 'अड्डड्ड मळि बंद, दोड्ड दोड्ड केरे तुंबी 

गुड्डुडळेल्ला हैनागि जोकुमार 

मडिवाळर केरी होक्याने जोकुमार 

मडितुंबा हू मुडिवंते चलुवि तन्न मडदियारंद सुकुमार...


३.कायी कत्तरिसी तुगतुगी नोडुतावे 

जोग्यागि निंत जतनिंग ।

इन्नू तरिसय्य होन्न मळेय ।।

याको कोमरय्या निन्न बायिगे बेण्णिल्ल

मेले माणिकद हरळिल्ल ।

ई ऊर ओण्यागे निन्न सुळुविल्ल ।।

राय रायरेल्ला चावड्याग कुतगोंडू

राज कोमरन करस्यार ।

केळ्यारल्लि आरिद्री मळेय बरलिल्ल ।।

शेट्टी शेट्वायरेल्ला कट्टिम्याले कुतगोंडू 

पुत्र कोमरन करस्यार ।

पुत्र कोमरन करसि केळ्यारल्लि उत्तरि मळेय बरलिल्ल ।।

अत्तल मळि बंदितल केरीतुंबी

गुत्ति मलेनाड कोळीकट्टी गौरव्वा।

निन्न पुत्र नंद ल तडद्दवे ।।

अड्डड्ड मळि बंद, दोड्ड दोड्ड केरे तुंबी 

गुड्डुडळेल्ला हैनागि ।

गौडर सड्डेय मेले सिरि बरलि।।

वंदेत्तु निमगे हिंडेत्तु आगलो

सेरिद भूमी बेळेयल्लि ।

जोकुमारण्णन नारेरु कोट्ट हरकेय।।

जोकुमार समृद्धिय देव

ज्वाळद होलक आरेळु मुंचिगे 

हाकि आरेळु करेदर ओ एन्न ।

गौरम्मा मायदिंद मर्ग हडदळे।।

हुट्टिदेळु दिवसक पट्नाद तिरग्यान

दिट्नादेवि निनमगन ।

कोमारनु कोट्टार एळु दिनगळनु।।

राणिद हच्चड होत्तान कोमर

रायर ओण्याग सुळिदान।

नन कोमरा रायर हेंडरु तनगेंदे।।

हारुर गेर्याग होक्काग नन कोमर

गारडिगण्ण तिरुवुत ।

तन्नय्य तायंदिद्दिरु बिडलिल्ल।।

पुंडन पुंडाट हिंड मंदि कुड्यार 

कंडल्लि कल्लिगि बडदार ।

रात्र्याग अगसर कल्लाग तुरक्यार।।

अष्टमी दिन हुट्यान नन कोमर

सिट्टेर नोडी बेसगोंड ।।

जोकुमार हुट्टिदेळु दिसवसक मरणव।।

वक्कलिगेर ओण्याग होक्यान नन कोमर चक्करगण्ण तिरवूत।

जोकुमार वक्कलिगेर हेण्ण ननगेंद।।

हरगिद होलदाग हरिदु चंडाड्यान

हरिदिय मगन कोमरय्य।

चंडाडिदल्ली हवळु मुत्तुगळू बेळेदाव।।

बलवंदु निम्म बागिलक कुंतान

बागिनगळ कोडिरव्वा।

जोकुमार बागिलक हरकी कोडतान।।

बसलिक्की सोप्पिगी होदाळ हनुमव्व

बसुरिल्लवंत अळुताळे ।

नन कोमर बसुर माडि मनेगे कळुव्यान।।

हालबेडि हरिदत्त कोलबेडि कुणिदत्त 

मोसर बेडि कसर तुळिदत्त।

नन कोमर कुसलाद गेज्जे केसराग।।

याके कोमरा निन्न बायिगे बेण्णिल्ल मेले माणिकद हरळिल्ल  ई वूर ।

ओण्याग निन्न सुळुविल्ल।।

हरिहणम हान मुरुडोंकि

हरिदा लंकि हच्चि अव बेंकि सुट्ट एल्ला।

केंपू मोडियंथ जोकुमार। 

मेरद बिट्टार कविय होल्यालार ।

होडेद अवन प्राण।।

हुट्टिदोळु दिनसाके पट्टणव तिरुग्याने 

दृष्टीदेवी निन मग कोमरागे।

कोट्टारे येळु दिनगळ।।

आरेळू दिनकेन आळिदने राज्याव 

दिनेल देवी निन मग कोमराम 

तोऱ्यारे येळु दिनगळ।।

बित्तिद पैरु वणगि होगुतिवे 

हेत्तव्व हिट्टु कोडलोल्लळु ।

शिवराय उत्तरेय मळे करुणिसु।।

कट्टिय हत्याने होत्तुगळ नोड्यान

हत्याने निलगुदुरेय नम

कोमर कै बीसि मळेय करेदाने।।

एरिय हत्यान येळ्येव नोड्यान

हत्याने निलगुदुरेय नम कोमर 

शल्येव बीसि करेदाने।।

अड्डड्ड मळि बंदु दोड्ड दोड्ड केरी तुंबी 

गुड्डुगळेल्ला हयनागि गौडर 

शेट्टिय मेले सिरि बरली ।।




या गीतांतून जोकुमार हा ग्रामीण जनांसाठी सुख, समृद्धी आणणारा देव आहे, हे दिसते. त्याच्यामुळे पाऊस आणि  समृद्धी येते, अशी लोकभावना आहे.  जोकुमारची सातव्या दिवशी डोके फोडले जाते. जोकुमारविषयी अनेक दंतकथा आहेत. तो गणपतीचा भाऊही मानला जातो. तसेच ज्येष्ठागौरीचा पुत्रही म्हटले जाते. त्याबरोबरच गणनायक म्हणूनही ओळखला जातो. अशा या अल्पायुषी जोकुमारचा यंदा आज शुक्रवारी शेवटचा दिवस. तो गेल्यावर पाऊस आणेल, ही शेतकाऱ्यांसह ग्रामीण जनांची श्रध्दा. त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आण, हीच त्याला प्रार्थना.

- अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर

आता गुळ्ळव्वा उरली फक्त पूजेपुरती मुली - मुले हरवली मुठीतल्या दुनियेत




ह्यांग सत्ते कुंयव्वा,

निन्न गंड परदेसी,

बळ्ळोळ्ळी बनदाग, उळ्याडी अळतानं...

आषाढ महिन्यातील दर बुधवारी हे गीत गात शोकमग्न मुली गुळ्ळव्वाला निरोप द्यायची. शेतशिवारं मुला - मुलींच्या गर्दीने फुलायची. त्यांच्या खेळांनी शिवार चैतन्यमय व्हायचं. निमित्त असायचं आषाढ महिन्यात दर मंगळवारी येणाऱ्या गुळ्ळव्वा उत्सवाचं. आज यंदाच्या आषाढातला तिसरा मंगळवार.  मात्र, आता आषाढातल्या दर बुधवारचं  हे चित्र लुप्त झालंय. केवळ मंगळवारी घरोघरी होणारी पूजा उरलीय. 'मुठीतल्या दुनिये'त अडकलेल्या  मुला - मुलींना ना याचं आकर्षण,  ना माहिती आहे. त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. 


उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्रातील सीमाभागात आषाढ महिन्यात येणाऱ्या मंगळवारी हा उत्सव साजरा होतो. कारहुणवीनंतर येणारा हा शेतकऱ्यांचा आणखी एक सण. कर्नाटकातील काही ठिकाणी कन्नडमध्ये 'मण्णेत्तीन अमावस्या' साजरी केली जाते. माझ्या लहानपणी मुला -मुलींना या उत्सवाची खूप ओढ असायची. म्हणूनच म्हटलं जायचं.

गुळ्ळव्वा गुळ्ळव्वा एंद बरती,

गुड्डक्क होगी गुलगंजी तरतिनी, 

एंद बरती, इलकलक होगी सीरी तरतिनी, 

गुळेदगुड्डक्क होगी खणा, गोकाकक होगी करदंट तरतिनी, एंद बरती

अशाप्रकारे पुढे असेही म्हटलं जायचं.

गुड्डक्क होगलिल्ला गुळ्ळव्वन मण्ण तरलिल्ला, 

सुळ्ळ बंतव्वा नागर पंचमी 

इतकी ओढ तेव्हाच्या लहान मुलांना असायची. 

संपूर्ण जगताचे भरणपोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या भूमातेची पूजा करण्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा चालत आली आहे. एका ऋतूत मातीची पाचवेळा पूजा केली जाते. कारहुणवीनंतर आषाढात मातीचे बैल, गुळ्ळव्वाची पूजा, नागपंचमीला वारुळाची पूजा, गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीची पूजा, जोकुमारची पूजा केली जाते. माती ही शक्तिदेवता समजून गुळ्ळव्वाचा सण साजरा केला जातो. विशेषतः मुली व मुलांसाठी हा सण वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

आषाढ महिन्यातील दर मंगळवारी मुली चुरमुरे, दाळगा, शेंगा घेऊन लहान मुला-मुलींसह शेतात जाऊन माती आणतात. त्या मातीने गुळ्ळव्वा व बैलांची मूर्ती बनवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी तळवारकी असलेल्या कुटुंबातील महिलांनी पाटलांसह प्रमुख कुटुंबांच्या घरी माती आणून देण्याची तर काही ठिकाणी कुंभारांनी मूर्ती बनवून विकण्याची पध्दत आहे. गुळ्ळव्वाची मूर्ती बनवण्याची पद्धत आणि आकार दर मंगळवारी बदलते. यानिमित्त देवस्थान, मोर, साप, विंचू, रेडा आदी मूर्तीही बनवल्या जातात. तसेच बैलांच्या मूर्तीही बनवतात. गुलगंज व रंगीबेरंगी करडईच्या बियांनी गुळ्ळव्वाचा शृंगार तर बैलांची सजावट केली जाते. विशेष म्हणजे माझ्या लहानपणी दोन्ही मूर्ती चांगले बनवणाऱ्यांच्या घरी त्या बनवून घेण्यासाठी मुली व मुलांची गर्दी व्हायची. अनेक महिला गुळ्ळव्वाच नव्हे तर बैलांच्याही साचेबद्ध, आकर्षक व सुंदर मूर्ती तयार करायच्या. त्यांच्याकडूनच मूर्ती बनवून घेण्यासाठी मुली व मुले आपल्या पालकांसह त्यांच्याकडे हट्ट धरायची. तसेच एक पुरुष मूर्तीही तयार केली जाते. तो गुळ्ळव्वाचा नवरा गोग्गप्पा. नंतर सायंकाळी गुळ्ळव्वा व बैैलांची पूजा, आरती केली जाते. तसेच शेवयाचा नैवेद्य दाखवला जातो.  त्यानंतर मुली मैत्रिणींसह गाणी म्हणतात. या गाण्यांनी जानपद समृद्ध केले आहे.

वंद हुंचिनकप्प ना माडिद तप्प,

भिमारती होळी होळीतन सेळे, 

सेळे बागिलू तेरेये गौरम्मा...गंगम्मा...

बसवग बसव एन्निरी बसवन पादक शरणेन्निरी...

गुळव्वन मण्ण तरलिल्ल गुलगंजी हच्ची आडलिल्ल,

सुळ्ळ बंतल्लव नागर पंचमी...!

बुधवारी खेळ, वनभोजन

बुधवारी खेळांसह जेवणालाही प्राधान्य असायचे. या दिवशी मुला - मुलींसह अख्खे कुटुंब शेतात असायचे. मात्र हे चित्र आज दिसत नाही. मुला - मुलींसाठी खेळ अविस्मरणीय क्षण असायचे. मुले - मुली गट बनवून वेगवेगळे खेळ खेळायचे. वनभोजनाचा आनंद घ्यायचे. यासाठी धपाटे, बाजरीच्या भाकरी, वांगीची भाजी, शेंगा चटणी, दही, शेंगा पोळी, घारगे आदी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे.  मुली शोक करत गुळ्ळव्वाचे शेतातील मातीत विसर्जन करून घरी परतायच्या. 'गुळ्ळव्वा देवता नाही' अशी म्हण प्रचलित आहे. तरीही ग्रामीण व शेतकरी यांचे मातीवरील प्रेम, निष्ठा, श्रद्धा व आराधनेला तोड नाही. परंतु आज ग्रामीण लोकांसाठी केवळ ही आठवण बनली आहे.





Friday, 12 November 2021

माध्यम आणि धर्म


  



कर्नाटकातील कटील येथील दुर्गा परमेश्वरी देवस्थानच्या समारंभात सुवर्णा वृत्तवाहिनीचे प्रमुख अजित हणुमक्कण्णवर यांनी माध्यम आणि धर्म या विषयावर दिलेले व्याख्यान. 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

माध्यम आणि धर्म या खूपच औत्सुक्याच्या विषयावर बोलायला मला सांगितले आहे. माध्यम धर्म यावर बोलायचे तर खूपच सोपे आहे. माध्यम आणि धर्म म्हटल्यावर भारताची विशेषता अशी आहे, की येथे धर्माचे डेफिनेशन आणि कन्सेप्ट संपूर्णपणे वेगळे आहे. युरोपियन भारतात आल्यावर त्यांच्याकडे रिलिजन नावाचे शब्द होते. त्या शब्दाला येथील धर्म हाच समानार्थी शब्द समजले. आपणही तेच गृहित धरुन वापरायला लागलो. आपल्याकडे धर्माचा अर्थ नैतिकता असा आहे. नैतिक मूल्यांनाच आपण धर्म असे मानले. देवस्थानाच्या बाहेर बसलेला भिक्षुक आई, धर्म कर असे म्हणतो. आई रिलिजन कर असा अनुवाद करता येणार नाही. एखादा बलिष्ठ त्याच्याहून बलहीन अशा व्यक्तीला मारताना हे धर्म नाही, असे आपण म्हणतो. त्याचा अर्थ हे रिलिजन नाही, असे नाही. ही भूमी धर्माला नैतिकतेशी जोडून पाहते, पूजा पद्धती, ईश्‍वराची आराधना पद्धती याच्याशी जोडून पाहत नाही. तशी आपली संस्कृती नाही. त्यामुळे अनेकदा लाइव कार्यक्रम करताना धार्मिक विषयांच्या संदर्भात माझाही गोंधळ उडतो. या देशाचा इतिहास आणि खरा इतिहास वाचून नव्हे तर वाचण्याचा प्रयत्न करून वाढलेल्यांपैकी मीही एक आहे. या देशात क्षत्रिय असलेल्या रामाने ब्राह्मण असलेल्या रावणाला मारलेली कथा दलित असलेल्या वाल्मीकीने लिहिली आणि जगभारात पोहोचविली. आणि ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. Look at the Combination.  क्षत्रिय असलेल्या रामाने ब्राह्मण असलेल्या रावणाला मारलेली कथा दलित असलेल्या वाल्मीकीने लिहिली. हा या देशाचा मूळ ग्रंथ. त्याला सन्मान दिलेली ही संस्कृती. या जगातील मूळ धर्मांना आणि त्यानंतर आलेल्या प्रमुख मतांमध्ये मूलत: काय फरक आहे, याविषयी आपण विचार करत आहोत. मूलत: फरक म्हणजे, आपण ज्याला धर्म समजतो त्या धर्मात आपण कोणत्या देवाची पूजा करता, तुम्ही स्वर्गात जाता की नरकात जाता याचा काही संबंध नाही. इथे जगताना किती नैतिकतेने जगलात त्यावरच तुमचे स्वर्ग, नरक अवलंबून आहे. भक्तीच स्वर्ग, नरक याचे मूळ असते तर शिवाचा परमभक्त रावण हा राक्षस म्हणवून घ्यायला नको होते. रावण शिवाचा अत्यंत परमभक्त होता. हे मूळ समजून घेण्यासाठी खूपच वेळ द्यावा लागेल. आणि खूपच आसक्तीने या संस्कृतीचे मूळ समजून घ्यावे लागते. ते समजून न घेण्याची अटेन्शन स्पॅन नसलेली मंडळी या संस्कृती आणि आचरणाच्या विरोधात, आपण ज्याला पूज्य समजतो त्या सर्वांविरोधात बोलायला लागले. तसेच कोठून तरी आलेल्या धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला द्यायला लागले. एक पत्रकार म्हणून थेट कार्यक्रम करताना काहीवेळा राग आवरू शकत नाही. धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, असे म्हटल्यावर राग आवरू शकत नाही. हे कोणाला धर्मनिरपेक्षता शिकवायला आले आहेत? ही मंडळी कोणाला धर्मनिरपेक्षता शिकवायला आली आहेत ? पर्शियात धार्मिक अत्याचाराला बळी पडलेले एक हजार लोक नेसत्या वस्त्रांनिशी नावेतून येऊन गुजरातच्या किनार्‍यावर उतरतात. तेथील राजाला आमच्यावर अन्याय झाला आहे, येथे राहायला जागा द्या, अशी मागणी करतात. येथे जागा नाही, असे राजाला सांगावेसे वाटत नाही. जागा नाही, ते देऊ शकत नाही, इथल्या लोकांशी संघर्ष होऊ शकेल, हे राजा सांगू शकत नाही. त्यामुळे राजा ते सांगण्यासाठी जागा विचारायला आलेल्या लोकांमार्फत एक मडकी भरुन दूध पाठवतो. ते पूर्ण भरून पाठवतो. जागा नाही, हा संदेश यातून मिळावा, अशी त्याची अपेक्षा असते. पर्शिया येथून जागा, आसरा द्या म्हणून आलेली मंडळी राजाचा संदेश समजून घेतात. त्या भरलेल्या मडक्यात एक मूठभर साखर टाकून ते राजाकडे परत पाठवतात. आमच्यात जागा नाही, असे राजा सांगत होता. परंतु जागा नसली तरी आम्ही दूधातील साखरेप्रमाणे आम्ही येथील लोकांसोबत राहू, आम्हाला थोडी जागा, आश्रय द्या असा संदेश त्यांनी यातून राजाला पाठवला. मी बाराव्या शतकात येथे आलेल्या पार्शी समाजाबद्दल बोलत आहे. त्यांनी दुधात साखर टाकून पाठवलेले पाहून राजाला खूप आनंद झाला. राजा त्यांच्याकडून केवळ एकाच गोष्टीची अपेक्षा करतो. गोहत्या आमच्यात महापाप आहे, आपण गोमांस खाणार नसाल तर येथे राहण्यास काही अडचण नाही, असे राजा सांगतो. तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही पार्शी समाजबांधवाने गोमांस सेवन केले नाही. अशा भारताला धर्मनिरपेक्षेतेचे धडे देत आहेत. या भारताला ? पर्शियामधून आलेले लोक एक पवित्र अग्नी घेऊन आलेले होते. ती अग्नी जेथे असते त्याच्या तीन चौरस मैल परिसरात पार्शी व्यतिरिक्त अन्य लोकांनी येऊ नये, अशी मागणी ते राजाकडे करतात. राजा त्याला होकार देतो. त्यांच्याच राज्यात येऊन, तेथेच पवित्र अग्नी स्थापतात. मात्र, तीन चौरस मैल परिसरात कोणाला येऊ देणार नाही, तुमच्या धार्मिक भावनांना धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही राजा देतो. अशा देशाला धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले जात आहेत. अनेक लोक माझा राष्ट्रवादी पत्रकार म्हणून ओळख करुन देतात. एका पत्रकाराचा राष्ट्रवादी म्हणून सन्मान करणे, एका राजकारण्याचा सरळ, सज्जन म्हणून सन्मान करणे, एका संन्याशाचा सर्वसंग परित्याग केला म्हणून सन्मान करणे, एका पोलिसाचा कडक शिस्तीचा म्हणून सन्मान करणे हे सगळे एकच आहे. त्या कारणांसाठी त्यांचा गौरव करणे अपेक्षित नाही. कारण आपण सर्वजण असेच राहिले पाहिजे. इतर लोक असे का नाहीत, हा प्रश्‍न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. माझे मित्र, बंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे खासदार तेजस्वी सूर्या चीनला गेले होते. त्यांनी तेथून दूरध्वनी केला. ते मला म्हणाले, येथे अनेक ठिकाणी बौद्ध विहारांच्या बाहेर फलक लावले आहेत. या जन्मात तू पुरेसा पुण्य केला असशील तर पुढच्या जन्मात भारतात जन्म घेशील असे त्या फलकांवर लिहिले आहे. भारतात जन्मलेल्या आम्हाला, आणि आमच्यासोबत येथे जन्मलेल्या अनेकांना आपण येथे का जन्मलो, असे वाटू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेचे धडे देणार्‍या या मंडळींना इतिहासाच्या काही गोष्टी माहीतच नाहीत. सातव्या शतकात सौदी अरेबियातील व्यापार्‍यांची एक टोळी केरळमध्ये आली. ते तेथील राजाला म्हणाले,  आमच्यात एका नव्या मताचा उदय झाला आहे. पैगंबर आले आहेत. त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला आहे. आम्हाला एक प्रार्थनास्थळ बांधायचे आहे. त्यावर केरळच्या राजाने एक बौद्ध विहार रिकामे करुन दिले. तेथे मशीद बांधायला सांगितले. केरमळमध्ये जगातील दुसरी मशीद उभी राहिली, हे लक्षात राहू द्या. राजाने एक बौद्ध विहार रिकामे करुन मशीद बांधायला सांगितले. हे बांधल्यानंतर मदिनामध्ये मशीद उभी राहिली. केरमधील मशिदीचे बांधकाम करताना ते मक्केच्या दिशेन असावे, हे बधनकारक नव्हते. आजही त्याचा दरवाजा पूर्व दिशेलाच आहे. ठीक आहे, बौद्ध विहार रिकामी करुन तेथे आपले प्रार्थनास्थळ बनवा, असे  सांगणार्‍या या मातीला आता कोणीतरी येऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे द्यावेत काय? आता कोणी येऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे देण्याची गरज आहे का? अशी अनेक उदाहरणांची मालिकाच सांगता येईल. भारत संस्काराने धर्मनिरपेक्ष बनून राहिला आहे. धर्मनिरपेक्षता हे या भूमीचे सत्व आहे. येथील लोकांनी सप्रेस केले, मात्र उभे राहून झगडलेही नाहीत. हे भव्य प्रार्थनास्थळ बांधण्यासाठी 27 मंदिरे पाडण्यात आली, असा एक मोठा फलक बाराव्या शतकात झालेल्या एका बांधकामाच्या स्थळी लावण्यात आला आहे. आपण या स्थळाला राष्ट्रीय पुरातत्व स्थळाचा दर्जा दिला आहे. त्या बांधकामाविषयी मी फारसे काही सांगत नाही. राष्ट्रीय पुरातत्व स्थळ म्हणून ज्याला आपण ओळखतो त्यात एक मोठा फलक लावला आहे. या बांधकामासाठी 27 मंदिरांचा विद्ध्वंस करण्यात आल्याचा त्यावर उल्लेख त्यावर केला आहे. त्याला आपण आपला सन्मान समजतो. ते सर्व सोडा, जेव्हा राम मंदिराचा  खटला सर्वोच्च न्यायालयात चालला होता तेव्हा पुरातत्वविद के. के. मोहमद हे बाबरी मशिदीच्या खाली मंदिर होते, त्यामुळे तेथे मंदिर व्हावे, यासाठी धडपडत होते. मात्र, हिंदू वकील रांग लावून तेथे मशीद व्हावी, यासाठी धडपडत होते. या भूमीला नव्याने धर्मनिरपेक्षता शिकविणारे अनेकजण ठिकठिकाणी जन्माला आले आहेत. येथे बोलण्यासाठी मला पत्रकारिता आणि धर्म हा विषय दिला आहे. माझ्या दृष्टीने धर्म कधीही रिलीजन असू शकत नाही. धर्म म्हणजे नैतिक मूल्ये. सदाकाल सत्य सांगणे, सांगावे लागणारे सत्य परखडपणे सांगणे हाच पत्रकारितेचा धर्म होय. मी ते काया, वाचा, मनाने पाळलो आहे. कालौघात असे झाले की, बोलो भारत माता की जय म्हटले की आरएसएस म्हणतात. जय हिंद म्हटले भाजप म्हणतात. काश्मीरमध्ये धडपडणार्‍या सैनिकांविषयी बोलले की राइट विंगचा पत्रकार ठरतो. सीएए, एनआरसीमध्ये काय चुकीचे आहे, असे विचारले की उजव्या विचारसरणीचा पत्रकार ठरतो. लॉजिकल प्रश्‍ने विचारली तरी आमच्या कपाळावर पट्टी बांधण्याचे काम सातत्याने चालत आले आहे. विशेष म्हणजे अत्यंत लॉजिकली प्रश्‍न विचारले तरी ही स्थिती आहे. बंगळुरूच्या टाउन हॉलसमोर अनेक घटनांवेळी मी ही गोष्ट सांगितली आहे. तैवानमध्ये कुत्र्यांच्या मांसापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा एक उत्सव चालला होता. त्याच्या विरोधात टाउन हॉलमध्ये निदर्शने केली जातात. दुसर्‍या दिवशी सर्वच वर्तनमानपत्रांमध्ये प्राणिप्रेमींची निदर्शने म्हणून छापून येते. हे सहज आहे. श्‍वानांविषयी प्रेम असलेल्या मंडळींनी तेथे निदर्शने केली होती. ते झाल्यानंतरच्या एका आठवड्यात गोहत्या बंदी झाली पाहिजे, यासाठी निदर्शने केली जातात. ते मात्र, जातियवाद्यांची निदर्शने म्हटले जाते. एका आठवड्यापूर्वी कुत्र्यांसाठी केलेली निदर्शने प्राणिप्रेमींची, गायींसाठी निदर्शने करणारे मात्र जातियवादी ठरतात. आपण आजच्या पत्रकारितेत पाहत असलेल्या विरोधाभासाविषयी मी सांगत आहे. या गोष्टी जे जाहीरपणे बोलायला जातात, ते जातियवादी पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांना उजव्या विचारसरणीचे पत्रकारही म्हटले जाते. केवळ काहीजण मात्र गाढवाचे शेपूट, घोड्याचे केस म्हणून पुढे जातात. त्यासाठी धैर्य हवे. तसेच वेळोवळी कटकटींना सामोरे जावे लागते. त्यांचा अनुभव घेतलेला मी एक पत्रकार आहे. मी मघाच सांगितलो, सत्य सांगणे, सांगावे लागणारे सत्य परखडपणे सांगणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. आज देशात नागरिकत्व कायदा आणि एनआरसीची अधिक चर्चा आहे.   काल सद्गुरू यांनी एक गोष्ट सांगितली. माझ्या निरीक्षणानुसार ते सत्य आहे. नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात एक महिला मी येथे जन्मले, वाढले, माझे आईवडील येथेच जन्मले, वाढले, मी एका विशिष्ट समाजात जन्माला आले म्हणून मला भारतातून बाहेर का घालता, असा सवाल करते. समोर असलेला पत्रकार तिला तुला भारतातून बाहेर काढणार हे कोणी सांगितले, ही माहिती तुला कोणी दिली, हा उलट प्रश्‍नही तिला विचारत नाही. मी समविचारी पत्रकारांशी बसून चर्चा करत होतो. नागरिकत्व कायदा खरेच भारताला, भारताच्या एकजुटीला मारक आहे का, असे आपल्यापैकी कितीजणांना वाटते, असे त्यांना विचारलो. भारतीय, भारतात राहणार्‍या एकालाही या कायद्यामुळे समस्येला सामोरे जावे लागणार नाही, हे प्रत्येकाने मान्य केले. मात्र, जाहीरपणे आपण का बोलत नाही, म्हटल्यावर आपण पत्रकार म्हणून तसे सांगावे का, असे त्यांनी विचारले. मी पत्रकारितेत येऊन 15 वर्षे झाली आहेत. या 15 वर्षांत वेगवेगळ्या आठ संपादकांच्या हाताखाली काम केलो आहे. त्यापैकी तीनजण नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात बोलायला पत्रकारितेचा धर्म आडवा येत नाही, मात्र सत्य आहे ते सांगण्यास पत्रकारितेचा धर्म आडवा येतो. आपण कोणता पत्रकारिता धर्म फॉलो करत आहोत, हा माझा प्रश्‍न आहे. एखादे सत्य आहे तसे सांगू शकत नाही, असा हा पत्रकारिता धर्म कोणता ?  भारतात पाच वर्षांपूर्वी आलेल्या हिंदू, बौद्ध, ख्रिश्‍चन, शीख धर्मीय 33 हजार लोकांना नागरिकत्व द्यायला हवे. ते पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानातून आले आहेत. ते आता येथे आले आहेत. केवळ 33 हजार लोक आहेत. अनुभवू नये ते अनुभवून ते येथे आले आहेत. अशा 33 हजार लोकांना नागरिकत्व देताना देशभरात गोंधळ माजवला जात आहे. परंतु नागकित्वाची परिकल्पनाच अस्तित्वात नसताना आपण पारशी लोकांना जागा दिली. त्यांच्यावरही धार्मिक अत्याचार झाले होते. इस्त्रायल देश अस्तित्वात आल्यानंतर त्या देशाच्या संसदेत पहिला ठराव हा भारताच्या अभिनंदनाचा करण्यात आला. संपूर्ण जगात आमच्यावर धार्मिक कारणाने अत्याचार न करणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्या ठरावात म्हटले आहे. तेव्हा कोणाला नागरिकत्वाची कल्पना नव्हती. धर्मनिरपेक्षता सांगायला कोणी आला नव्हता. केवळ 33 हजार लोकांना नागरिकत्व देताना एवढा मोठा हंगामा केला जात आहे. शेवटी पत्रकार म्हणवून घेणारे नागरिकत्व कायद्यात काय आहे, हे पूर्णपणे वाचून आपल्या वाचकांना, दर्शकांना सांगायला हवे, असे म्हटले तर आपण पत्रकार म्हणून एका कायद्याच्या बाजूने बोलणे योग्य आहे का,  असा प्रश्‍न विचारत आहेत. एक पत्रकार अशा प्रकारच्या संदिग्धतेत आहे. या कायद्याच्या विरोधात बोलणार्‍या पत्रकारांविषयी त्यांना कोणताही नैतिक प्रश्‍न पडत नाही. त्याच्या बाजुने बोलणार्‍यांवर मात्र प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. भारतातील पत्रकारिता निरंतरपणे अशा संदिग्धतेत सापडली आहे. ती अशाप्रकारे संदिग्धतेत सापडली असताना इथल्या संस्कृतीलाच फटका बसला आहे. पत्रकारांच्या संदिग्धतेमुळे बसलेला हा फटका आहे. गेल्या पाच - सहा वर्षांत संपूर्ण भारत असहिष्णू देश असल्याचे संपूर्ण जगाला ओरडून सांगून झाले. भारतात असहिष्णूता वाढली आहे. हिंदू जातियवादाचा अतिरेक होऊन तांडव सुरू आहे, अशी अमेरिकेतही चर्चा झाली. यात पत्रकारांचे योगदान काही कमी आहे का? शेवटी पत्रकारांनी जे आहे ते सांगितले असते तरी अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. अशी परिस्थिती निश्‍चितच आली नसती. 1990 च्या दशकात काश्मीरातील पंडितांचा नको तो छळ करून त्यांना हाकलून लावले. तेव्हा भारतात अशाप्रकारची घटना घडली, याचे योग्यप्रकारे वृत्तांकन जरी केले असते तरी भारताविषयी अशाप्रकारे कोणी म्हटले नसते. सोडा, तेव्हा होऊ नये ते झाले, मात्र आताच्या पत्रकारांना काय झाले आहे? आपल्यातील कितीजण गौरी लंकेश यांचे नाव ऐकला आहात? बहुतेक सर्वजण ऐकला आहात. कितीजण गोविंद पानसरे यांचे नाव ऐकला आहात? कितीजण नरेंद्र दाभोळकर यांचे नाव ऐकला आहात ? बहुतेक सर्वजण ऐकला आहात. विचारवंतांची साखळी हत्या झाल्या कारणाने भारत एक जातियवादी देश बनला आहे, अशाप्रकारे जगभरात बिंबविण्यात आले. पत्रकार मंडळींनीच हे बिंबविले. आपल्यातील कितीजण कोईमतूरच्या फारुखचे नाव ऐकला आहात? कोईमतूरचा फारुख. एकही हात वर उठला नाही. कोईमतूरचा फारुखही अशाप्रकारेच विचारवंत होता. देव नाही, अशी त्याची भावना होती. देव नाही, देव नाही, देव नाही, असे कार्ड लिहून मुलीच्या हाती देऊन काढलेले छायाचित्र त्याने फेसबुकवर पोस्ट केला. त्यामुळे स्थानिक युवकांनी त्याचा खून केला. मात्र, एकाही पत्रकाराने कोईमतूरच्या फारुखची हत्या झाल्याची बातमी पहिल्या पानावर छापली नाही, प्राईम टाईमला प्रसारित केली नाही. एका समाजाने सर्व हत्यांचे निश्‍चितच प्रखरपणे निषेध करायला हवा. ती गौरी लंकेश यांची हत्या असो, गोविंद पानसरे यांची हत्या असो, नरेंद्र दाभोलकर यांची हत्या असो अथवा कोणत्याही विचारवंताची हत्या असो. या देशातील विचारवंतांना सोडा. फारुख याला विचारवंत म्हणून कन्सिडर करायला तरी पत्रकारांना काय झाले होते? फारूख का विचारवंत म्हणवून घेऊ शकला नाही ? जेएनयूमध्ये अफझल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजिलेल्या सभेला विरोध केल्यावर त्याला असहिष्णूता म्हणण्यापर्यंत पत्रकारितेची मजल जात असेल,  देशविरोधी घोषणा देणार्‍यांना हिरो ठरवण्यापर्यंत पत्रकारिता पोहोचत असेल तर पत्रकारिता येता येता देशविरोधी बनेल. आपण या देशात अशाप्रकारची एखाद दुसरी नव्हे अनेक घटना पाहिल्या आहेत. त्यामुळे काही पत्रकारांनी तरी आपल्यावर शिक्का मारला तरी हरकत नाही, आम्ही आहे ते आहे तसे जोरात सांगू असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही काळाची गरज बनली आहे. मी अनेक ठिकाणी ही गोष्ट सांगितली आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था संपवण्यासाठी रशियातून 1970 च्या दशकात  आलेला एक हेर पूर्ण देशभर फिरला. अशा या सुंदर देशाचे मी नुकसान करणार नाही, असे सांगून तो काम सोडतो. एका देशाचे कशाप्रकारे वाटोळे केले जाते, याविषयी तो एक सुंदर मुलाखत देतो. एखाद्या देशाचे वाटोळे करायचे तर एकूण 35 वर्षांची प्रक्रिया आहे. आधीच्या सुमारे 20 वर्षांत त्या देशातील लोकांच्या मनात, विशेषत: युवकांच्या मनात तुमचा देश चांगला नाही, तुमचा धर्म चांगला नाही, तुमची आचारपद्धती चांगली नाही, तुमच्या रीतीनिती चांगल्या नाहीत, तुमचे देव चांगले नाहीत, तुमची पूजापद्धती चांगली नाही, हा विचार सतत बिंबवायला हवा. पुढच्या 10 वर्षांत आपोआपच तो देश कोसळेल, असे तो सांगतो. ते भारतात अत्यंत व्यवस्थितपणे चालले आहे. त्याच्याविरोधात काहीजणांनी तरी आवाज उठवायला हवे. त्याच्याविरोधात आवाज उठवताना आपला समाज परफेक्ट समाज आहे, या भ्रमात राहू नका. आमच्यासारखा समाज दुसरा कोणताही नाही, आमच्यासारखी संस्कृती कोणाची नाही, आमचेच चांगले या भ्रमात राहू नका. परंतु एक समाधान आहे, की एक सेल्फ करेक्टिंग सिस्टीम या संस्कृतीत सुरुवातीपासूनच आहे. आपल्यात असलेल्या समस्या आपणच सुधारुन पुढे जाण्याची या देशात एक पद्धती आहे. या देशात पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती. ती प्रथा थांबवण्यासाठी आकाशातून कोणी आला नाही. या देशातच समाजसुधारक जन्माला आले. हे योग्य नाही, असे करू नये, हे समाजासाठी चांगले नाही, हे सांगून त्यांनी याचा विरोध केला. अशाप्रकारे विरोध करुन सती पद्धती थांबवण्यात आली. लहान वयात पतीच्या निधनानंतर पत्नीचे केशवपन केले जायचे. तिने घरातून बाहेर पडू नये, अशी पद्धतीही आपल्या समाजात होती. हेही रोखण्यासाठी कोणी आकाशातून आले नाही. आमच्यातच समाजसुधारक जन्माला आले. ही हीन पद्धती आहे, हे थांबायला हवे, हे त्यांनी सांगितले. आपण ते थांबवलो. एखादी महिला विधवा झाल्यास ती जीवनात पुन्हा कधीही विवाह करू नये, ही प्रथाही होती. त्याचाही विरोध करणारे, ते समाजातून काढून टाकणारे महात्मे आपल्यात जन्मले. त्याच रीतीने या समाजात अस्पृश्यता नावाची हीन प्रथा होती. ही खुपच वाईट प्रथा आहे. ती या संस्कृतीला चिकटलेले कलंक आहे.  त्या कलंकाविरोधात लढता लढता हा देश पुन्हा यापूर्वीचे वैभव प्राप्त करण्याची अनिवार्यता आहे. असे कलंक आणि वाईट प्रथांसह आपण विश्‍वगुरू होण्याचे स्वप्न पाहत असू तर ते कधीही साध्य होणार नाही. आपल्यात असलेल्या वाईट प्रथा समाजाच्या विभाजनाला कारण ठरतात. अशा वाईट प्रथा प्रज्ञावंत समाजाने दूर करत पुढे जायला हवे. त्यासोबतच मी अथवा माझ्यासारखे ज्या विषयावर अधिक जोर देतात ते थेटपणे तुमच्याशी संबंधित नाही. त्याचे महत्व थेटपणे तुम्हाला माहीत होणार नाही. मात्र, आता जी चार - पाच वर्षांची मुले आहेत ना ते मोठे झाल्यावर त्यांना ते समजेल. 1925 -26 मध्ये कोणी लाहोर, कराचीत असलेल्या शीख अथवा हिंदू समाजबांधवांना कोणी आणखी 15 - 20 वर्षांत तुम्ही जगणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले असते तर ते हसले असते. मात्र, ते खरे झाले. 1980 मध्ये काश्मीरमधील पंडितांना आता दहा वर्षांत तुम्ही तुमच्या घरात राहू शकणार नाही, तुमच्या आयाबहिणींचे रक्षणही करू शकणार नाही, असे सांगितले असते तर पंडितही हसले असते. पण 1990 मध्ये ते खरे ठरले. आताही अनेकांचे बोलणे काही लोकांना तसेच वाटते. हसण्यासारख्या गोष्टी वाटतात. पुढे एक दिवस अशाप्रकारच्या कटू परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, या कळकळीने मी बोलत आहे. आपली एक श्रेष्ठ संस्कृती म्हणून आपण सांगतो. सहा हजार वर्षांचा इतिहास असलेली संस्कृती म्हणून आपण सांगतो. अशाप्रकारची आपली एकच संस्कृती नव्हती. जगभरात खुपच पुढारलेल्या कमीत कमी दहा संस्कृती होत्या. इजिप्त, मेसोपेटोमियात संस्कृती होती. आजच्या अमेरिकेत इंका संस्कृती होती. ते सर्व निसर्गाची पूजा करायचे. ईश्‍वराची आराधना करायचे. ते भूगोलमध्ये पुढारलेले होते. त्यांनी गणिताचा अभ्यास केला होता. तेव्हाच्या वैज्ञानिक अभ्यासाविषयी सांगण्यास वेळ पुरणार नाही. अशाप्रकाच्या दहा संस्कृती या जगात होत्या. परंतु शेवटी वाचलेली आमची एकमेव संस्कृती होय. उर्वरित संस्कृतीचे काय झाले, का नष्ट झाले, याविषयी आपणच अभ्यास केल्यास पुढील काळात कसे रहावे, हे समजत जाईल. असा काळ आला आहे, की मी दररोज पूजा करणार्‍या देवाचीच यापुढेही दररोज पूजा करत जाईन, असे म्हटले तरी त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आम्हाला जे आराध्य त्या सर्व गोष्टींचा अवमान केला जाईल. पूर्वी झालेल्या मूर्तिभंजनाची पद्धती आणि आता होत असलेल्या मूर्तिभंजनाची पद्धती वेगळी आहे. पुढच्या दिवसांत ते आणखी वेगळ्या पद्धतीने होत जाईल. धर्म, देशाचा विषय बाजूला ठेवू. सैन्य, सैनिकाच्या बाजूनेही बोलले तरी कपाळावर शिक्का मारुन घेऊन फिरण्याची वाईट स्थिती आली आहे. सैन्याविषयी आणि देशाविषयीही बोलले तरी अशी वाईट परिस्थिती आली आहे. ही परिस्थिती आपण सर्वांना जागे करणारी घंटा ठरो. याचा अर्थ आपण उद्यापासून हाणामारीला सिद्ध होऊ, असा नव्हे. आपल्या मूळांविषयी आपल्यात सन्मानाची भावना वृद्धिंगत करणे हेच त्या लढ्याची सुरूवात आहे. आपण कोठून आलो, हे समजून घेणे आहे ना ते आपल्याला पुढे कुठे जायचे आहे, तो मार्ग दाखवेल. आपली अशी स्थिती का झाली आहे, हे समजून घेतले तर पुढे काय घडले पाहिजे, याविषयीचा मार्ग प्रशस्त होईल.              


Friday, 13 August 2021

लिंगायत, वीरशैव, हिंदू शब्दांच्या भोवती...



 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

अलिकडील दिवसांत लिंगायत आणि वीरशैव - लिंगायत स्वतंत्र धर्माचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  लिंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला आहे, बसवण्णा वीरशैव नव्हे तर लिंगायत आहेत, असे माते महादेवी काही वर्षांपासून सतत तीव्रपणे सांगत आहेत. त्यांचे मत खरे असल्याचे काही भक्तांना वाटते. मात्र, पुढील माहिती पाहा - 'माते महादेवी यांनी ५ एप्रिल १९६६ रोजी पूज्य लिंगानंद स्वामी यांच्याकडून जंगम दीक्षा घेतली. तेव्हा त्यांनी ' आदर्श जीवनासाठी, वीरशैव धर्मप्रचारासाठी सतत लढा देईन. शरण धर्म प्रचार करण्यासाठी परदेशात जाईन. मी आणखी जादा क्षमता प्राप्त करेन. नंतर वीरशैव मिशनरी बनेन', अशी प्रतिज्ञा केली. (लिंगायत वीरशैव : एंबुदू हौदु, हिंदूवू हौदु - डाॅ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्रीमद विभूतीपूर, वीर सिंहासन मठ, बेंगळुरू, रेणुक सौभाग्य सिरी ग्रंथ, पृष्ठ क्र. १४१). 

 माते महादेवी यांनी लिहिलेल्या 'मातृवाणी' पुस्तकात हा उल्लेख आहे -' दावणगेरे विश्वकल्याण मंटप स्थापक, धीर गुरुवर्य वैराग्यनिधी, वीरशैव धर्मपीदीप्ती... पूज्य श्री लिंगानंद स्वामीजी यांच्या चरणी... सच्चिदानंद सती प्रिय महादेवीचे अर्पण' (मातृवाणी, दावणगेरे १९६५) याच पुस्तकात 'वीरशैव लांछन (वीरशैवांचे प्रतीक)' नावाच्या लेखनात ही वाक्ये आहेत. - विभूती रुद्राक्षी धारणेय कंडु हीनैसी नगुवर | नोडेन्न मनदोळु सिग्गदु संचरिसिवे | त्रिपुंड्रवदु वीरशैवर विषय भस्मदा लांछन | रुद्राक्षीयदु लिंगपतीयक्षीयं होम्मी कट्टलट्ट मंगलसूत्र | इंथप्प विभूती रुद्राक्षी धरिसिद सद्भक्तरन कंडु | हीयाळीपर अडेतडेयिल्लद ज्ञानक्के मननोंदु नक्कनो सच्चिदानंद ( ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧಾರಣೆಯ ಕಂಡು ಹೀನೈಸಿ ನಗುವರ| ನೋಡೆನ್ನ ಮನದೊಳು ಸಿಗ್ಗದು ಸಂಚರಿಸಿವೆ| ತ್ರಿಪುಂಡ್ರವದು ವೀರಶೈವರ ವಿಷಯ ಭಸ್ಮದಾ ಲಾಂಛನ| ರುದ್ರಾಕ್ಷಿಯದು ಲಿಂಗಪತಿಯಕ್ಷಿಯಿಂ ಹೊಮ್ಮಿ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಮಂಗಲಸೂತ್ರ| ಇಂಥಪ್ಪ ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧರಿಸಿದ ಸದ್ಭಕ್ತರಂ ಕಂಡು| ಹೀಯಾಳಿಪರ ಅಡೆತಡೆಯಿಲ್ಲದ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮನನೊಂದು ನಕ್ಕೆನೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ’ (ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ: ಮಾತೃವಾಣಿ ಪು. 42). ( विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना पाहून हीनतेने हसणाऱ्यांना पाहून मला संताप येतो. भस्माचे त्रिपुंड हे वीरशैवांचे प्रतीक आहे. रुद्राक्ष हे लिंग हेच पती समजून बांधलेले मंगळसूत्र आहे. अशा विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्या सद्भक्तांना पाहून अविचाराने हीनतेने वागणाऱ्यांवर सच्चिदानंद हसेल. ( माते महादेवी - मातृवाणी पृष्ठ ४२). 



या पुस्तकासाठी ज्येष्ठ विद्वान डाॅ. एच. तिप्पेरुद्रस्वामी यांनी लिहिलेले अभिप्राय योग्यच आहे. माते महादेवी यांनी पूर्वी वापरलेला 'वीरशैव' शब्द सोडून आता 'लिंगायत' हा शब्द वापरला आहे. तसेच बसवण्णांनी  'लिंगायत' धर्माची स्थापना केली, हे त्यांचे सांगणे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेच्या विरुद्ध आहे.  वास्तविक बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' हा शब्द वापरला नाही. त्यांनी केवळ 'वीरशैव' हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ - 'एन्न बंद भवंगळनु परिहरिसि... एन्न होंदिद शैव मार्गंगळ नेलेगळेदु निज वीरशैवाचारवरुही तोरी... शैव कर्मव कळेदु...' शैव असलेला मी चन्नबसवण्णांच्या सूचनेनुसार 'वीरशैव' झालो, असे बसवणांनीच सांगितले आहे  (वचन १०९८). त्यांनी ९३० व्या वचनात उल्लेख केलेल्या त्यांच्या पूर्वीच्या एका श्लोकात 'वीरशैव' शब्द आहे. इसवी सन १११० मधील केशिराजच्या 'शील महत्वद कंद' या पुस्तकात 'वीरशैव' शब्द आहे. त्यात अंगावर लिंग धारण करण्याची एक पद्धती  या अर्थाने  'लिंगायत' या शब्दाचा उल्लेख आला आहे. बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' या शब्दाचा वापर केला नाही. चित्र स्पष्ट आहे - 'वीरशैव' नावाचा धर्म बसवपूर्व कालीन आहे. - वर दिलेल्या आधारांनुसार हे स्पष्ट होते. याविषयी माते महादेवी काय सांगू इच्छितात ?

वीरशैव - लिंगायत हिंदू धर्माचा भाग नाही. तो एक स्वतंत्र धर्म आहे, असा निर्णय अखिल भारतीय वीरशैव महासभेने निर्णय  आहे. तसे मागणी पत्रही सरकारला दिले आहे. केंद्र सरकारने लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून मान्य केल्यास अल्पसंख्यकांना मिळणाऱ्या सर्व सोयी - सवलती लिंगायतांनाही मिळतील, ही आशा महासभेला आहे. हिंदू धर्म म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, याची जाणीव महासभेला असू शकेल. स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या श्रेष्ठांनी आपण हिंदू म्हणूनच जाहीरपणे घोषित केले आहे. भारताच्या सर्वोच्या न्यायालयाच्या पूर्णपीठाने १९९५ मध्ये एका निर्णयात हिंदू धर्माची लक्षणे अशाप्रकारे स्पष्ट केली आहेत - ‘Acceptence of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and realisation of the truth that the gods to be worshipped is large: that indeed is the distinguishing features of Hinduism’ - वेदांवर श्रद्धा ठेवणारे, बहुदेवता आराधक, दैव साक्षात्कारासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, यावर विश्वास ठेवणार हिंदू आहेत. 



आतापर्यंत सर्व वीरशैव वेदांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. 'ओंकार' (ओम) त्यांच्यासाठी प्रिय मंत्र आहे. काही देवांवर विश्वास ठेवणारे आहेत. कर्नाटकातील काही मठ  वेद - संस्कृत पाठशाळा चालवितात. उदाहरणार्थ  तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाची संस्कृत वेद पाठशाळा होय. तेथे आजही सायंकाळची प्रार्थनासभा वेदघोषाने सुरू होते. लिंगायतांत शिव हाच परमदैव ही श्रद्धा असली तरी त्यातील काहीजण तिरुपतीच्या व्यंकटेश्वराचे भक्तही आहेत. हिंदूंप्रमाणेच वीरशैवही गायीला माता मानतात. - नंदी हे शिवाचे वाहन आहे. गावातील करियव्वा, काळव्वा आदी देवतांच्या पूजेतही सहभागी होतात. मात्र, तेथे चालणाऱ्या पशुबळीपासून दूर राहतात,  हे सहज आहे. 

बसवण्णांच्या वचनातील - (वेदक्के बरेयु कट्टुवे, शास्त्रक्के निगळवन्नुक्कुवे...)  अशाप्रकारच्या गोष्टी वेद विरोधी आहेत, हे सांगणे सत्याचा अपलाप करणारे आहे. ते  जातिभेद पाळत  इतर वर्गाच्या लोकांना हीन वागणूक देत वेदघोषात यज्ञयागादि करणाऱ्या ब्राह्मण वर्गाविरुद्ध आहे. त्याच बसवण्णांचे हे पुढील वचन लक्षवेधी आहे. - वेदागमगळ हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, मीरी नडेयलागदु, मीरी नुडियलागदे मुक्तिपदवन्नैदुवात (वचन २३९). वेदांनी सांगितल्याप्रमाणे चालावे. त्यांनी सांगितलेले उल्लंघून चालणे शक्य नाही, हे त्यांचे स्पष्टातिस्पष्ट सांगणे आहे. 1१९५० मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय संविधानानेही वीरशैव हा हिंदू धर्माचा भाग असल्याचे मान्य केले आहे. कायद्यानुसार वीरशैव, लिंगायत, हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी १९ व्या शतकात उदयास आलेले ब्रह्म, आर्य, प्रार्थना समाजाचे अनुयायी हे सर्वजण एकाच वर्गात मोडतात. बौद्ध, जैन, शीख समाजाचे अनुयायी हिंदू नसले तरी त्यांनाही हिंदू विवाह कायदाच लागू आहे.  कायद्यात वीरशैव, लिंगायतांना हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या वर्गाचे समजणे हे कायदा करणाऱ्यांत असलेला वास्तवाचा अभाव होय. स्वत: बसवण्णांनीच मी वीरशैव म्हणून सांगितलेले असताना लिंगायत म्हणजे कोण ? बसवण्णांचे अनुयायी हे वीरशैवही होत, लिंगायतही होत. 


 

वीरशैव (लिंगायत) वर्ग हा हिंदू धर्माचा भाग नाही. तो स्वतंत्र धर्म म्हणून वरील कायद्यात दुरुस्ती होऊन लोकसभा, राज्यसभेत स्वीकारले जाणे आवश्यक आहे. सध्या ते शक्य न होणारी बाब आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्राला पत्र लिहिले असले तरी ते लोकसभेत बहुमताने स्वीकारले जाणे असाध्य आहे.  तसेच पत्र लिहून विफल ठरल्यास ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाला आघातकारी ठरण्याची शक्यता आहे. सिद्धगंगेचे पूज्य शिवकुमार स्वामीजी यांनी म्हटले आहे - 'वीरशैव धर्म हिंदू धर्माचा अर्थात शैव धर्माची द्वैत, अद्धैत पंथांसारखी एक शाखा आहे...' ब्राह्मण जातीशी त्याची तुलना योग्य नाही. पूज्य पंचपीठाधिपतींचा अभिप्राय असा आहे - वीरशैव धर्म हिंदू धर्माचे आगम - वेद मानतो. आता वीरशैव हिंदू नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. याच प्रकारे फ. गु. हळकट्टी, न्यायमूर्ती टी. एन. मल्लप्पा, कर्नाटक गांधी हर्डीकर मंजप्पा, सिद्धरामप्पा पावटे आदी मान्यवरांनी लिंगायत - वीरशैव हे हिंदूच आहेत, याविषयी सहमती व्यक्त केली आहे. 

लिंगायतांनी  (वीरशैव) आम्ही हिंदू नसल्याचे घोषित केल्यास वक्कलिग, बेडर, धनगर, भंगी, दलितही तशी घोषणा करतील  तेव्हा संपूर्ण भारतात कोणाची संख्या अधिक असेल?  क्रूरता, मतांधता, मतांतराने घेरलेल्या भारताचे भविष्य काय ? प्रज्ञावंतांनी याविषयी विचार करणे गरजेचे आहे.  मी जन्माने लिंगायत असलो तरी मला 'हिंदू' म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो. 

(लेखक ज्येष्ठ संशोधक आहेत.)

साभार : विजयवाणी, शनिवार, दिन. ६ जानेवारी २०२८


Thursday, 12 August 2021

मुस्लिमांच्या आक्रमणाला बळी पडलेली शरण क्षेत्रे

 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

हिंदूंसाठी पवित्र क्षेत्र असलेल्या  वाराणसी (काशी), अयोध्या (औध), नेपाळमधील काठमांडू आदी ठिकाणे मुस्लिमांनी विद्ध्वंस करुन अपवित्र केल्याची हजारो उदाहरणे आहेत. कर्नाटकातच हंपीसारख्या शेकडो ठिकाणी अशी कृत्ये केली आहेत. हा सर्वांना माहीत असलेला विषय आहे. मात्र, सर्वजण सार्वजनिकरीत्या  बोलायला कचरतात. त्याच प्रकारे  कर्नाटकातील वीरशैवांना पूज्य असलेली काही शरण क्षेत्रे आक्रमणाला बळी पडल्याचा विषय बहुतेकांना माहिती नाही. शरण क्षेत्रांना भेटी देऊन डाॅ. जयश्री दंडे व डाॅ. वीरण्णा दंडे  यांनी लिहिलेल्या १२ ने शतमानद शरण स्मारकगळू (बसव कल्याणदिंद कूडलसंगमदवरेगे ) १२ व्या शतकातील शरण स्मारके (बसव कल्याणपासून कूडलसंगमपर्यंत) या पुस्तकात ठिकठिकाणी चित्रांसह त्याची माहिती दिली आहे. त्यावर आधारित हे छोटेसे लेखन. 

१. परुषकट्टा : बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील परुषकट्टा नावाच्या ठिकाणी बसवण्णा हे गोरगरीबांना आर्थिक साहाय्य करायचे, अशी लोकांची धारणा आहे. परुषकट्टा आधी बसवेश्वर देवस्थानच्या अखत्यारीत होते. १९४८ मध्ये मुस्लिमांनी त्यावर दावा करत न्यायालयात धाव घेतली, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.  तेथे त्याच्या शेजारीच दररोज निरंतरपणे गोहत्या, पशुबळी, मांस विक्री  चालते. आधी परुषकट्ट्यावर मोठे दगडी मंटप होते, त्याचे कलात्मक खांब उखडून तेथेच टाकले आहेत. बसव कल्याणला गेलो असताना ती जागा पाहून मी तीव्र दु:ख अनुभवलो आहे. हे स्पष्ट आहे, की परुषकट्टा हे एक मूळ शरण क्षेत्र आहे. 




२. पीर पाशा बंगला : बसवकल्याणमधील बसवेश्वर देवालयाच्या मागे असलेला पीर पाशा बंगला हेही पूर्वी शैव क्षेत्र होते. तेथे असलेल्या नंदी मूर्तीवर हिरवे कापड टाकून झाकण्यात आले आहे. खाली कन्नड संख्या कोरल्या आहेत. तेथील मंटपही चालुक्य स्थापत्य शैलीची आहे. बहुतेक बाराव्या शतकातील आहे. तेथील मंटपाला लागूनच एक चालुक्यांचा शिलालेख आहे. 




३. बसवकल्याणच्या शेजारीच किल्ला असलेला डोंगर आहे. काही वर्षांपूर्वी  तेथील एका देवालयातील शिवलिंग काढून टाकले आहे. (माझ्या पाहणीनुसार किल्ल्याच्या दगडी भिंती बांधण्यासाठी भग्न देवालयाच्या अवशेषांचा वापर करण्यात आला आहे. चालुक्यकालीन देवालये पाडून त्यांचे अवशेष वापरले आहेत.)




४. बसव कल्याणनजीकच्या नारायणपुरात वचनकार वक्कलिग मुद्दय्याचे मंदिर आहे. तेच त्याचे समाधीस्थळ असल्याचा लोकांचा विश्वास आहे. त्याचे शिष्य मृत्यूंजय याचीही समाधीही तेथे आहे. मृत्यूंजयाचे देवालय अथवा समाधीला मुस्लिमांनी दर्गा बनविला आहे. मृत्यूंजय मंदिराचे मुर्तुजा दर्गा असे नामकरण झाले आहे. (मृत्यूंजय - मुर्तुजा). 

५. बसव कल्याण तालुक्यातील हुलसूरमध्ये वचनकार लद्वेय सोम याची समाधी आहे. तेथे देवालयाच्या मागे उमा महेश्वराचे भग्न शिल्प होते. निजामाच्या काळात रझाकारांनी नाश केलेल्या देवालयाचा ते भाग बनले आहे. 

६. बीदर तालुक्यातील अष्टुरमधील अल्लम प्रभू यांचे स्मारकाचेही  सुलतान अहमद शहावली बहामनी दर्ग्यात रुपांतर झाले आहे. तेथे परंपरेनुसार पूर्वीपासून हिंदू पूजा करतात. मुस्लिमांच्या ताब्यातील या दर्ग्यात मुस्लिम नमाज पठण करतात. (अशा ठिकाणांकडे हिंदू - मुस्लिमांची एकतेचे उदाहरण म्हणून पाहणे योग्य नाही. अशाप्रकारे समानतेची स्थळे म्हणून काही हिंदू अभिमान बाळगतात. मात्र, ही सर्व ठिकाणे मुस्लिमांनी बळकावलेली हिंदूंची पवित्र स्थाने आहेत.  )




७. सुरपूर तालुक्यातील मुदनूरू हे जेडर दासिमय्या यांचे गाव. पूर्वी हे गाव अग्रहार होते. तेथे १००१ लिंग, काही तीर्थ आहेत. ग्रामस्थ दासिमय्या यांचे जन्मस्थळ म्हणून एक घर दाखवितात. त्याचे आराध्य देव रामनाथ देवालयाच्या शेजारीच १०१ खांबांचे संगमनाथ मंदिर आहे. मुस्लिमांनी  ते सुंदर मंदिर तोडून जमेल तसे त्याला पाडून सुमारे २५० हून अधिक जणांनी घरे बांधली आहेत. 



८. सोलापूर जिल्ह्याती मंगळवेढा ही बिज्जळाची आधीची राजधानी होय.  बसवण्णांनी तेथे सुरुवातीला कोषाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तेथील किल्ल्याजवळील एक दर्गाही मूळ हिंदू मंदिर आहे. त्या दर्ग्यालाही मुस्लिमांप्रमाणेच हिंदूही मानतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार दर्गा पूर्वी मंगला देवीचे देवस्थान होते. दर्ग्यात आजही चालुक्य कालीन शिल्पे आहेत. (मंगला देवीच्या नावावरुनच त्या गावाला मंगळवाड, मंगळवेढे असे नाव पडले आहे.)

९. सोलापुरातील किल्ल्यात वचनकार सिद्धरामाने मल्लिकार्जुन मंदिर बांधले होते. तो किल्ला ताब्यात आल्यानंतर मुस्लिम शासकांनी त्याच्या स्थलांतराचा आदेश दिला. त्याचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असले तरी मूळ देवस्थानचा काही भाग अजुनही शेष आहे. (टिपू सुलताननेही श्रीरंगपट्टण किल्ल्यातील अंजनेय देवस्थानचे मशिदीत रुपांतर केले.)



वर सांगितलेल्या पुस्तकातील आणखी काही माहिती. या हजार वर्षांत संपूर्ण कर्नाटकात मुस्लिम शासकांनी हिंदू देवालयांचा विद्ध्वंस केला आहे. विजापुरातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारातील करीमुद्दीन मशीद, कलबुर्गीतील कलाम मशीद, दोड्डबळळापूर येथील जिष्मा दर्गा, बेळगाव किल्ल्यातील मशीद, जामा मशीद या सर्व मशिदी हिंदू देवालयांच्या दगडांनी बांधण्यात आल्या आहेत. (संदर्भ : सीताराम गोयल लिखित ''Hindu Temples : What happened to them (The Islamic evidence. ) बाबा बुडनगिरी येथील दत्तात्रेय पीठाच्या विकृतीकरणाचा मुस्लिमांनी प्रयत्न केला आहे. विजापुरातील जगप्रसिद्ध इब्राहिम रोजा आवारात असलेले हिंदू देवालयाचे अवशेष मी पाहिलो आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. हंपीतील वीरण्णा मंदिरही होन्नारसाब दर्गा बनले आहे. हे थांबविण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे हिंदू समाजातील आंतरिक जागृती आणि दृढसंकल्प होय. भारतात, शेजारी आणि जगात काय घडते आहे, काय घडू शकते याविषयी जागरूक राहून भविष्याविषयी आंतरिक तळमळ असावी. आपले राष्ट्र, धर्म याविषयी खरा अभिमान त्यांच्यात निर्माण व्हायला हवा. सत्य सांगायला, त्यानुसार वागायला घाबरू नये. सहनशीलता ही प्रशंसनीय तर असहनशीलता अक्षम्य आहे. मात्र, अति सहनशीलता अक्षम्य आहे. हिंदूंमधील आजची सहनशीलता अशीच कायम राहिल्यासह पुढील शतकातील भारत अथवा इंडियातील अल्पसंख्यक हिंदूंना वरील सत्यता जाणवेल. मात्र, तेव्हा ते पूर्णपणे असहाय्य असतील. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास हिंदू धर्म, भारतीय संस्कृती केवळ इतिहासाच्या अभ्यासाचा विषयवस्तू ठरण्याची वेळ येईल. ही माझी आंतरिक तळमळ, वेदना आणि सात्विक आक्रोशाची घोषणा आहे.  

साभार : कन्नड प्रभा 












Monday, 3 February 2020

ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ?


ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ? हा प्रश्‍न अनेक वर्षांपासून केवळ कन्नड वाचकांना नव्हे तर त्यांना मानणार्‍या इतर भाषिक वाचकांनाही पडला आहे. तसेच यामागे काही कारणे असतील असे वाटणारेही आहेत. 
कदाचित भैरप्पा यांच्या जागी मीच असतो तर आतापर्यंत दुसर्‍यांदा ज्ञानपीठसाठी लॉबिंग केलो असतो की काय! कारण माझे साहित्यिक कार्य तेवढे आहे या अभिमानामुळे! 
होय, हा अभिमान आहे ना, तो सहज निर्माण होत नाही, तो कमवावा लागतो. एखाद्या वेळेस भैरप्पा यांच्यात तसा अभिमान असल्यास तो त्यांच्या ज्ञानामुळे मिळविलेला आहे,  सुखासुखी निर्माण झालेला नव्हे. सुखासुखी निर्माण होणारा अभिमान नव्हे, ती चरबी असते. 
ज्ञानामुळे निर्माण होणारा अभिमान मान्य होईल. एका मर्यादेत असल्यास तो गौरवास्पद असेल. असो, तो विचार बाजूला ठेवा. का इतक्या दीर्घ काळानंतरही भैरप्पा हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी पात्र ठरले नाहीत, हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना खराच सतावत आहे. 
गोकाक, अनंतमूर्ती, कर्नाड, कंबार यांच्यासारख्यांना ज्ञानपीठ मिळाले. तर या सर्वांच्या रांगेत उभे राहण्याइतके साहित्याची सेवा भैरप्पा यांनी केली नाही का? ज्ञानपीठ हे साहित्य क्षेत्रासाठी आहे. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच असलेल्या या पुरस्कारासाठी भैरप्पा हे पात्र ठरले नाहीत म्हणजे त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सेवेविषयी माझ्यासारख्यात संशय निर्माण होतो. मात्र, सत्य हे आहे की, भैरप्पा यांची साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभा नाकारणे कोणाकडूनही शक्य नाही. एखाद्या वेळेस नाकारल्यास वरील चारही साहित्यिकांच्या साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभेला नाकारल्यासारखे होईल! 
सरळच सांगतोय, या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये. लॉबिंग न करता कोणताही पुरस्कार मिळवणे (हिसकावणे) साध्यच नसलेला हा काळ आहे. कर्नाड यांनी मी लॉबिंग करुनच ज्ञानपीठ मिळविल्याचे जाहीररीत्या कबुल केले होते. मला ज्ञानपीठ मिळाले तेव्हा ते विजय तेंडुलकर यांना मिळायला हवे होते, असे त्यांनीच म्हटले होते! आतापर्यंत देण्यात आलेले सर्वाधिक पुरस्कार आणि पुरस्कार विजेते (सर्वच नव्हेत) यांनी लॉबिंग करुनच मिळविलेले आहे, हा भाव लोकांत आहे. 
जिल्हा, राज्योत्सव पुरस्कारासाठीच लॉबिंग चालते म्हटल्यावर आणखी ज्ञानपीठ, पद्म पुरस्कारांसाठीही लॉबिंग चालत नाही म्हणायचे तर यावर विश्‍वास ठेवणे खूपच कष्टदायक आहे !
हा लॉबिंगचा काळ आहे. पुरस्कारच नव्हे तर प्रत्येक गोष्टीला लॉबिंग केल्याशिवाय अथवा करायला लावल्याशिवाय काहीही मिळत नाही. भैरप्पा यांनी लॉबिंग न केल्याने त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही. लॉबिंग केल्यास कधीच ज्ञानपीठ मिळाले असते, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे. वाचकांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे. त्यांना अजून का ज्ञानपीठ मिळाले नाही, त्यांच्याशिवाय इतरांना मिळाले तरी ते मिळाल्यासारखे नाही, असा अतिरेकी विचारही मी ऐकलो आहे. अरे, भैरप्पा लॉबिंग केले असते तर मिळाले असते, असे व्यंगात्मक बोलणेही ऐकले आहे. 
मात्र, भैरप्पा यांचा गुणस्वभाव माहीत असलेले कोणीही त्यांनी पुरस्कारासाठी लॉबिंग करतील हा विचार सोडा, अशा संधीसाधू राजकारणात ते उतरतील हा विचारही करणे साध्य नाही. देहि हा त्यांचा स्वभाव नाही. तशी अभिरुचीही त्यांची नाही. मंगळुरू लिट. फेस्टमध्ये त्यांना दिलेला गौरव निधी त्यांनी कल्लड्क श्रीराम माध्यमिक शाळेला दिला. सरस्वती सन्मान प्राप्त भैरप्पा यांना कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही परिस्थितीत लॉबिंग करण्याची दुस्थिती येणार नाही, असे माझ्यासारख्याला वाटते. आता तर मोदी सरकार आहे. लॉबिंग करायचेच तर त्यांना वाटेल ते पद मिळविण्यास अनुकूलता आहे. 
सत्ताधार्‍यांची खुशमस्करी करुन पद, पदवी, पुरस्कार मिळविणे हे एका रीतीने बौद्धिक आणि वैचारिक गुलामीच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, बौद्धिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचे म्हणूनच भैरप्पा यांची गणना केली गेली आहे. अथवा तसेच त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. हे चुकीचे आहे. कादंबर्‍या पाहून, त्यातच आवरण कादंबरी वाचून त्यांना तसे समजणे चुकीचे आहे! आणखी त्यांचे सामाजिक विचार पाहून त्यांना तसे समजणे बौद्धिक दारिद्य्रच होय! 
भैरप्पा यांना चिकटलेले विवाद म्हणजे 1. त्यांनी त्यांच्या कादंबर्‍या लेखनासाठी निवडलेले विषय. 2. त्यांच्या काही प्रमुख कृती (वंशवृक्ष, तब्बलियू निनादे मगने, पर्व, सार्थ, आवरण, उत्तरकांड). यात भारताच्या पुरातन संस्कृतीचे सार आहे. त्यामुळे ते काही साहित्यिकांमुळे, विशेषकरुन नवसाहित्यिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले. 3. वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवल्याच्या प्रकरणात इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे समर्थन केले. 4. कावेरी विवादाच्या निषेधाला हिंसक वळण लागले. हिंसा, निषेधामुळे काही साध्य होणार नसल्याचे नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे. 5. टिपू सुलतान धर्म सहिष्णू असल्याचे वक्तव्य गिरीश कर्नाड यांनी केले होते. भैरप्पा यांनी दैनिक विजय कर्नाटकमधून त्याचे खंडन केले. कर्नाड हे टिपू सुलतान याच्याविषयी चुकीचे विचार पसरवत आहेत. विनाकारण धर्म सहिष्णू म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे उदात्तीकरण करत आहेत. टिपू सुलतान एक धर्मांध होता. तो हिंदूंचा द्वेष करत होता हे सांगितले. 6. अनंतमूर्ती हे भैरप्पा यांच्या कादंबर्‍यांचे प्रमुख टीकाकार होते. भैरप्पा यांनी आपल्या आणि अनंतमूर्ती यांच्यातील वाद - विवाद भित्ती आणि नानेके बरेयुत्तेने या कृतींच्या काही भागात उल्लेख केला. 7. मुस्लिम राजवटीतील भारतीय संस्कृती आणि सामाजिक प्रगतीवर झालेला परिणाम दाखविणारा, ऐतिहासिक सत्यावर आधारित आवरण लिहिले. 8. भैरप्पा हे इतिहासाच्या नावाखाली समाजात दुही माजवून राज्य करू इच्छिणारे मूलतत्ववादी आहेत. तसेच त्यांना कादंबरी लिहिण्याचे ज्ञान नाही, असे वक्तव्य अनंतमूर्ती यांनी केले. त्यामुळे त्यांना साहित्य क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले. 9. मात्र, भैरप्पा यांनी आपण कोणत्याही विषयी पूर्वग्रह न ठेवता केलेल्या सत्यान्वेषणाचे आवरण हे फळ असल्याचे सांगत बाजू मांडली. टीकाकारांनी कोणत्याही निर्णयाला येण्यापूर्वी कादंबरीत उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथांचे अध्ययन करावे असे सांगितले. 10. दैनिक विजय कर्नाटकात प्रसिद्ध झालेल्या भैरप्पा यांच्या मतांतर मत्तु कवलु लेखनावर खूप दिवस समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा चालली, लेख प्रसिद्ध झाले. 11. कवलु कादंबरी खूपच चर्चेचा, विवादाचा विषय ठरली. आधुनिक महिला सिद्धांतातील फोलपणा आणि त्याचा सामाजिक परिणाम हाच वस्तूविषय निवडून ही कादंबरी लिहिली. त्यामुळे महिला प्रगती विरोधी हा शिक्का त्यांच्या माथ्यावर मारला गेला. सारा अबुबकर यांनी ती कादंबरी कोणी वाचू नये, असे एका समारंभात जाहीररीत्या सांगितले. 
मुख्यत: भैरप्पा हे उजव्या विचारसरणीचे आहेत, हा जुना आरोप या अकरा कारणांमुळे त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही, ही विवादात्मक चर्चा चालत आली आहे. 
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यकृतींच्या निवडीचा विचार पाहू. 18 भारतीय भाषांतील अमूल्य कृतींचे प्रतिष्ठानची निवड समिती परिशीलन करते. पुरस्कारासाठी निवडली जाणारी व्यक्ती प्रतिभावंत, प्रतिष्ठित आणि सृजनशील साहित्यिक असावी. साहित्य क्षेत्रात विविध प्रकारची साहित्य निर्मिती करुन यशस्वी झालेली असावी. 18 भाषांत अत्युन्नत स्थान प्राप्त केले तरच ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कृती निर्मात्याची निवड होते. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्या साहित्यिकासह त्याने निर्मिलेल्या साहित्याची भाषा आणि त्याच्या प्रांतालाही सन्मान प्राप्त होतो. 
ज्ञानपीठ पुरस्काराठीचे नियम सूची म्हणजे 1. साहित्यिक आणि कृती भारतीयच असावी. 2. त्याने आपल्या संबंधित भाषेत पंडित, तज्ज्ञ असावा. 3. पुरस्कार देताना ती व्यक्ती जीवंत असावी. 4. एकदा पुरस्कार दिलेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणांनी पुन्हा पुरस्कार देऊ नये. 4. एकदा कोणत्याही एका भाषेला पुरस्कार दिल्यास त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याच भाषेच्या कोणत्याही साहित्यिकाला हा पुरस्कार देऊ नये. देशात आतापर्यंत 18 भाषांना दिलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांत हिंदी भाषेनंतर सर्वाधिक पुरस्कार कन्नड भाषेला मिळाले आहेत. त्यामुळे कन्नड भाषेचा मान आणि सन्मान उंचावला आहे.
ज्ञानपीठाच्या नियमांनुसार भैरप्पा हे त्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. केवळ नियमांचे अवलोकन करुन त्यानुसार भैरप्पा हे त्यासाठी पात्र आहेत, असे मला वाटत नाही, वाटूही नये. भारतातील साहित्याला दिल्या जाणार्‍या श्रेष्ठ पुरस्कारासाठी श्री. साहू शांतिप्रसाद जैन दांपत्याने या भारतीय प्रतिषठानाची स्थापना केली. साहजिकच जैन तत्त्वज्ञानालाही हे प्रतिष्ठान पुरस्कार देत आला आहे. जे साहित्य मानवी जीवनातील संवेदनशीलता आणि संवेदना अभिव्यक्त करते अथवा चैतन्य भरते असे साहित्य सर्वमान्यता, सार्वकालिक मौल्यवान ठरते. भारतीय साहित्यात चिरस्थायी बनते. ज्ञानपीठ मिळविलेले आतापर्यंतचे साहित्यिक आणि साहित्याचे अवलोकन केल्यास हे अधिक ग्राह्य ठरते. 
मानवजात ही एकच आहे, यावर पंप यांनी भर दिला. पंप, रन्न, पोन्न, नागचंद्र आदी जैन साहित्यिकांपासून दासांपर्यंतच्या साहित्यामुळे संपन्न बनलेली कन्नड साहित्य परंपरा देशी भाषांत अभिन्न आहे. वैशिष्ट्यांचा आगर आहे. जी साहित्यकृती समाजाच्या हितासाठी जीवनमूल्यांचे संवर्धन करते ती सार्वकालिक सत्य बनून राहते. भैरप्पांच्या कृतींचे हे मूलस्त्रोत होय. जे साहित्य सकल जीवनिष्ठेने जीवनमूल्यांचे प्रतिनिधीत्व करते ते समाज स्वीकारते, स्वीकारायलाही हवे. भैरप्पांच्या कादंबर्‍यांची ही खरी अस्मिता आहे. अशा प्रकारच्या अगाध अनुभव चिंतनेने त्यांच्या कादंबर्‍यांतील मुख्य पात्रे उलगडतात.    
कारंत यांच्या मूकज्जीय कनसुमधील मुकी आजी ही बोलता न येणारी मुकी म्हातारी नव्हे. 80 वर्षांची एक मौनी म्हातारी आहे. वर्षानुवर्षे विशाल प्रांगणातील एका अश्‍वत्थ वृक्षाखाली बसून एक महिला वेदना सहन करत मानवी विषमता उलगडून सांगते. सिंहावलोकन करत, मनातच विचार करत आपल्यात एक अद्भुत जागृती निर्माण करताना दिसते. समष्टीच्या धर्तीवर भूतकाळाचा वर्तमानकाळाशी सांगड घालत मानवी सभ्यतेच्या विकासाचा तिचा प्रयत्न रोमांचक आहे. करुणा ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आणि मनुष्यत्वाचे अत्यंत मोठे गुण ती शिकवते. भैरप्पांच्या कादंबर्‍यांत अशा पात्रांची मालिकाच आहे. कसे तरी लाभलेले हे जीवन कसेही जगले तरी तरी चालेल, अशा प्रकारचे मानवी जीवन नाही, अशी मूल्ये कारंतांच्या मूकज्जीसारखी पात्रे सांगतात. अशी पात्रे भैरप्पांच्या कादंबर्‍यांतही दिसतात. या कारणांमुळे भैरप्पा यांच्या कादंबर्‍या वाचताना अनेक संदर्भात कारंत यांच्या सर्जनशील आणि प्रतिभावान सामर्थ्याची आठवण होते.  दोघांचीही चिंतन शक्ती आणि जीवन अंतर्दृष्टी एकच वाटते. कारंतांप्रमाणे भैरप्पा यांनी निवडलेली कथावस्तू, तंत्र, भाषा आणि निरुपण शैली यामुळे त्यांच्या कादंबर्‍या चैतन्यप्रद ठरतात. त्याची व्याप्ती विस्तृत आहे. तसेच कादंबरी आपले लक्ष्य गाठत जिंकते. हवे ते साध्य करते. 
भैरप्पा यांच्या साहित्य रचनेची व्याप्ती खूप मोठी आहे. वास्तवतेची चौकट मोडून काल्पनिक चौकटीत त्यांनी कोणतीही कादंबरी लिहिलेली नाही, लिहिणारही नाहीत. कथेनुसार निर्माण केलेली पात्रे काल्पनिक असतात, ही साहित्यातील सहज क्रिया आहे, हा वेगळा विषय आहे. त्याला कधीही कोणी अपवाद नाही. कादंबर्‍यांची सुरुवातच वास्वतेच्या पार्श्‍वभूमीवर झालेली आहे. भैरप्पा हे भ्रम निर्माण न करता वास्तवतेच्या आधारावर संशोधन करुन लिहिणार्‍या संशोधकांच्या रांगेतील साहित्यिक आहेत. केवळ जे स्वत:वर मात करू शकतात तेच कठोर विचार मांडणे असो, चिंतन करणे असो अथवा लिहिणे शक्य आहे. वेद आणि उपनिषद हे देशाच्या संपूर्ण संस्कृतीचे मूळ आहेत. - असे सांगणारे साहित्यिक भैरप्पा पुराण भंजन करुन, वास्तव जीवनाचा शोध घेतल्यानेच पर्व, उत्तरकांड यासारख्या सृजनात्मक कृतींची निर्मिती त्यांच्याकडून झाली असेल! ‘
"Literature is a way of discovering human truths in its emotional and aspirational aspects. साहित्यिकाने या समाजाला कोणती जीवनमूल्ये द्यावीत, हे त्यांनी सांगितले आहे. : No one asks how Draupadi must have felt having five husbands, Or which one she might haved loved more. In Parva I tried to change the motivation for Gandhari about why she wears a patch around her eye. In Uttarakhanda , I reinterpreted the Ramayana from Sita's point of view"
एका सर्जनशील लेखकाच्या कादंबरीतील पात्रे एका जीवंत जीवनाच्या निरंतर यानाप्रमाणे मूल्यांचे विस्ताराने, विस्तीर्णपणे प्रतिपादन करतात !
  शेवटची गोष्ट : भैरप्पा यांना ज्ञानपीठ देऊच नये, मिळूच नये यासाठी ऊर फाटेस्तोवर प्रयत्न करणारेही आहेत. पूर्वग्रह वगळता दुसर्‍या कोणत्याही कोनातून अशा गोष्टींचे समर्थन करणे शक्य नाही. भैरप्पा यांचे साहित्य न वाचताच केलेल्या या कोरड्या गोष्टी आहेत. मागे एकदा भैरप्पा यांना मरणोत्तर ज्ञानपीठ द्या, अशी मागणी करण्यात आली होती. अशी असभ्य संस्कृतीहीन वक्तव्ये करणारी मंडळीही आहेत. अशा प्रकारची भाषा करणार्‍यांत बहुतांश कन्नड भाषिकच आहेत, हे खेदजनक आहे. 
भैरप्पा यांच्या साहित्य विचारांचे समर्थन करणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला चप्पल दाखवणारे महाभागही आहेत. कोणाला कधी पुरस्कार द्यावा अथवा मिळावा, हा विचार मांडण्यासाठी कोणताही पुरस्कार कोणाच्याही मालकीची संपत्ती नाही, ती त्यांची मालमत्ताही नाही. भारतीय ज्ञानपीठाचे मोठेपण आणि गौरव खूप मोठे आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्षेत्राची व्याप्तीही खुप व्यापक आहे. भारतीय साहित्य विश्‍वात भारतियांना दिला जाणारा हा श्रेष्ठ पुरस्कार भारतीय साहित्य जगतात आपल्या लेखनाने जनमान्यता मिळविलेल्या भैरप्पा यांना मिळायलाच हवा. ते त्याला पात्र आहेत. भारतीय ज्ञानपीठ नावाच्या शुद्ध सरोवरातील पुष्करणीतील अनेक कमळांच्या रांगेत भैरप्पा नावाचा कमळही फुलायला हवा, ही साहित्यप्रेमींची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. निवड समितीत प्रत्येक भाषेचे दोन, तीन प्रतिनिधी असतात. त्यातील कन्नड भाषेच्या प्रतिनिधींनी भैरप्पा यांच्या कन्नड साहित्य सेवेची गहनता समितीपुढे विषद करुन सांगायला हवे. तसेच त्यांच्याकडे मागणी करुन भैरप्पा यांच्या माध्यमातून कन्नड भाषेला नववे ज्ञानपीठ मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.  
टी. देविदास

भारतीय साहित्य क्षेत्रातील अनन्य कृती : पर्व

 
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची पर्व कादंबरी प्रकाशित होऊन 40 वर्षे झाली. त्यानिमित्त बंगळुरूमध्ये 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, महाराष्ट्राचे डॉ. मुकुंद आर. परांजपे, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. माधव कौशिक, प्रसिद्ध मराठी लेखिका, संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी सहभाग नोंदवला. भैरप्पा यांच्या उपस्थितीत या लेखकांसह शतावधानी डॉ. आर. गणेश यांनी संवाद साधला, हे विशेष होय. 
राष्ट्रीय लेखक म्हणून ख्याती मिळवलेले, प्रा. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नडची कीर्ती देश - विदेशात वाढवलेल्या लेखकांत अग्रगण्य आहेत. त्यांची पर्व ही कादंबरी महाभारतावर आधारित असली तरी पौराणिक आवरण काढून टाकून, वास्तवतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिकता सत्य आणि संभाव्यतेच्या स्वरुपात मांडण्यात अत्यंत यशस्वी झालेली साहित्यकृती आहे. भारतीय भाषांमध्ये लिहिली गेलेली महाभारताशी संबंधित कोणतीही साहित्यकृती ‘पर्व’ इतके महत्त्व अथवा जनप्रियता मिळवू शकली नाही, हेच ‘पर्व’ची महानता सांगणारे आहे.   
उदाहरण म्हणून एखाद दुसर्‍या अभिप्रायाकडे लक्ष वेधता येईल. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार रामेश्‍वर शुक्ल आंचल यांनी म्हटले होते, ‘पर्व... कन्नडची असेल. मात्र, मी म्हणेन की ती एक मूळ हिंदी कादंबरी आहे.’ तर दुसरे प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्‍वर यांनी ‘पर्व एक आधुनिक बृहतकाव्य आहे. मीच याचा लेखक असतो तर हा विचार माझ्या मनी येतो’ अशी असूयापर प्रशंसा केली आहे. राजस्थानी विद्वान नंदकिशोर आचार्य यांनी ‘भैरप्पा हे केवळ कन्नडचे नव्हेत, आधुनिक भारतीय साहित्याचे, तुलना करता न येणारे विभूती पुरुष आहेत.’ असे म्हटले आहे. भैरप्पा यांना ‘कन्नडमध्ये लिहिणारे मराठी साहित्यिक’ मानणार्‍या मराठी विद्वानांमधील एक असे चंद्रकांत बांदिवडेकर म्हणतात. ‘महाकाव्याचा अनुभव देणारी ‘पर्व’सारखी कृती मराठीमध्ये कधी तरी येईल, याची मी वाट पाहात आहे.’ त्याशिवाय ‘पर्व वाचल्यानंतर मी भैरप्पा यांचा भक्त झालो आहे.’ असेही म्हटले आहे. 
समकालीन साहित्य समाचार पत्रिकेत हिंदी लेखक ओम गुप्त हे आणखी एक पाऊल पुढे टाकत वर्णन करतात, ‘महाभारतावर आधारित कादंबर्‍यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये लेखन झाले आहे. मात्र, पर्व सर्वांपेक्षा विशेष आहे. ही यातील पात्रांची कथा नाही; पात्रांच्या अंतर्यामी लपलेल्या मानवी संबंधांची कथा आहे.’ महाभारताचे आजचे स्वरूप पाहिल्यावर महर्षी व्यास यांना मुख्यत: वासुदेवाची महिमा सांगायची होती, हे स्पष्ट होते. कन्नडमध्येही व्यास भारताच्या आधारावर काव्यांची रचना दिसून येते. यात जैन आवृत्ती आणि वैदिक आवृत्ती मुख्य आहेत. (बौद्ध आवृत्ती उपलब्ध नाही.) नेमिनाथांचे चरित्र लिहिणारे नेमिचंद - कर्णपार्य यांच्या रचना जैन आवृत्ती आहेत. पंपने ‘मिगिल ईवर्गळीन ई भारत लोकपूज्यं’ या आपल्या गौरवमालेत कृष्णाचे नावच वगळले आहे. कृष्णाची महिमा सांगणारा अक्षयवस्त्र प्रसंग, अक्षयपात्र प्रसंग, गीतोपदेश यासारखे प्रसंग वगळले आहेत. 
कृष्णाची कथा समजून सांगतो, असे सांगणारे कुमार व्यास कृष्णाची महिमा सांगणारा कोणताही प्रसंग सोडत नाहीत. नवे प्रसंगही जोडतात. पंपला त्याचा आश्रयदाता अरसिकेरी (त्याचे प्रतिरुप म्हणून अर्जुन) मुख्य वाटतो. (त्यामुळे शेवटी सिंहासनावर बसणारे अर्जुन - सुभद्रा आहेत. धर्मराज - द्रौपदी नाहीत.) कुमार व्यास कृष्णभक्त असल्याने कृष्ण हाच त्यांच्यासाठी नायक आहे. 
अभ्यास-प्रवास : भैरप्पा यांनी व्यास भारताचा (गोरखपूर आवृत्ती) मूलगामी अभ्यास केला आहे. वाय. एस. सुखठणकर यांची आवृत्ती बाजूला ठेवली आहे. कुमार व्यास भारताचे भाग त्यांना तोंडपाठ आहेत. पंप - रन्न यांचेही अवलोकन केले आहे. मात्र, त्यांचे ध्येय-आशयच भिन्न आहे. ‘नानेके बरेयुत्तेने’ आणि ‘पर्व बरेदद्दु’ या लेखनात आपल्या ध्येय-उद्देशाविषयी स्पष्ट केले आहे. केवळ महाभारतातील घटना घडलेल्या प्रदेशांनाच नव्हे तर त्यात उल्लेखिलेल्या बहुपत्नीत्व, नियोग आदी पद्धती अजूनही असलेल्या गढवालसह अन्य ठिकाणांना भेटी देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. काहीवेळा वेशांतर करून, शारीरिक, मानसिक त्रास सोसून, दीर्घकाळ विनावेतन रजा घेऊन विषयतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली. राजाजी, के. एम. मुन्शी, देवेंद्र शर्मा, ठाकर आदींच्या साहित्याचे अध्ययन केले. व्ही. सीतारामय्या, डॉ. प्रभूशंकर, प्रो. एस. बालसुब्रह्मण्यम, बी. व्ही. सुब्बरायप्पा आदी विद्वानांशी आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कृतीची रचना केल्याचे भैरप्पा यांनीच ‘पर्व बरेदद्दू’मध्ये सांगितले आहे. 
महाभारताची पुनर्रचना करण्यामागे ‘समाजाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक कोनातून प्राचीन भारत समजून घेणे’ हा भैरप्पा यांचा उद्देश होता, (पृष्ठ 31) हे त्यातच म्हटले आहे. आपल्या अध्ययन, चिंतन, संशोधन, प्रवास, चर्चा, सल्लामसलत यामुळे मला हे साध्य झाले. परिणामी व्यास भारताच्या चौकटीतच नवा भारत माझ्या मनात निर्माण झाले, (पृष्ठ 33) असे नमूद केले आहे. 
धैर्यशाली साहित्यिक : पर्वची काही वैशिष्ट्येच येथे उल्लेखिता येतील. त्याला कलात्मक, सृजनशीलता, सहजता - व्यावहारिकतेचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी अपमिथकीकरण (डिमिस्टीफीकेशन अथवा डिमायथॉलायजेशन) आणि मनोवैज्ञानिक विश्‍लेषण या तंत्रांचा अवलंब केला आहे. याला पूरक आणि पोषक म्हणून प्रज्ञाप्रवाह पद्धती (स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस) आणि स्मरणतंत्र (मेमरी टेक्निक) यांचा वापर केला आहे. अपमिथकीकरण म्हणजे दैवत्व काढून टाकणे तसेच गौरवीकरणाच्या घटनांचे उच्चाटन होय. महाभारतातील सर्वात मुख्य पात्र असलेल्या कृष्णाचे देवत्व नाकारणे हे खर्‍या अर्थाने धैर्यवान साहित्यिकच करू शकेल, असे खूप मोठे धाडस आहे. कोणत्याही अलौकिक घटनेला वाव न देता कथावस्तू हाताळणे आवश्यक आहे. 
पंप यांनी आपल्या धार्मिक भूमिकेमुळे काही प्रसंगांना हात घातला नाही. पण शिशुपाल वधासारख्या घटना टाळल्या नाहीत. मात्र, भैरप्पा यांनी दैवत्व अथवा अलौकिक प्रसंगांना सरळ टाळले आहे. उदाहरणार्थ अक्षयवस्त्र प्रसंगात द्रौपदीचा संताप पाहून दुशासन माघार घेतो. वास्तवतेच्या आधारावर असे प्रसंग हाताळण्यासाठी भैरप्पा यांनी अक्षयवस्त्र प्रसंग टाळला आहे. विश्‍वरूप दर्शन प्रसंग आणि उत्तरेच्या गर्भरक्षणाचा प्रसंग याप्रमाणेच शिशुपाल, नरकासुर, जरासंध, सैंधव आदींच्या वधाचे प्रसंग यातून ठळकपणे जाणवते. 
कुठेही दैत्वाचा उल्लेखच नाही. कंस प्रकरणही अशा प्रकारे हाताळले आहे, की त्याने कौटुंबिक वादाचे रूप धारण केले आहे. त्याच्या क्रूरतेमागे हे कारण आहे. कृष्ण एक मित्र, चतुर राजकारणी, मुत्सद्दी, द्रष्टा नेता म्हणून साकारले आहे. 
युद्धानंतर धृतराष्ट्राच्या द्वेषाग्नीत भीमरुपी पुतळा नष्ट होतो, हे सांगण्याऐवजी, भीमाला मारण्यासाठी एक खंजीर लपवल्याचे जाणणारा कृष्ण धृतराष्ट्राची निर्भर्त्सना करतो, हे वास्तव चित्रण हे याचे उत्तम निदर्शक म्हणून पाहता येईल. असे अनेक प्रसंग ते दुसर्‍यांच्या आठवणी अथवा विधानाच्या रूपात मांडतात. मात्र, कथेचा प्रवाहीपणा, वाचनीयता याला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतात. उदाहरणार्थ, कीचक वधाचा प्रसंग पाहता येईल. याच प्रकारे भीम - दुर्योधन यांच्यातील शेवटच्या गदायुद्धाच्या प्रसंगाच्या निवारणामागची भैरप्पा यांची औचित्याची भूमिकाही आपल्याला चकित करते. वैशंपायन सरोवरातून बाहेर आलेल्या दुर्योधनाला पाहून भीम ‘हा आधीच मेला आहे. त्याच्याशी कसले युद्ध ?’ असे म्हणून निघून येतो. 
 पात्रांतील द्वंद्व : पंचपत्नीत्वासाठी कुंती द्रौपदीला राजी करते, ही कल्पना अनन्य आहे. मुलांना रागावण्यातच त्याचे समाधानही आहे, हे विशेष आहे. ‘माझ्यापोटी जन्माला आलेली मुले, एका रक्ताचे भाऊ एका मुलीच्या मोहात एकमेकांविरोधात उभे आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गप्प बसा. मी विचार करते.’ (पृष्ठ 124) पूर्वापार चालत आलेल्या नियोग पद्धतीविषयीही जेथे तेथे सुदीर्घ चर्चा दिसून येते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या पात्रांमधील द्वंद्वाचे विश्‍लेषण हे पर्वचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. महाभारताची सर्व पात्रे त्यांच्या मनोविश्‍लेषणामध्ये गुंतली आहेत. याला उदाहरण म्हणून माद्री सती जाण्याचा प्रसंग पाहता येईल. भीमाचे विधान हे आणखी एक उदाहरण आहे. : बारा वर्षे वनवासात कंदमुळे खाऊन, एक वर्ष दुसर्‍यांच्या घरात काम केले. सुख अनुभवण्याची शक्ती असण्याचे वय संपल्यावर पुन्हा राजवाड्यात राहिले काय, वनात राहिले काय? दुर्योधन, दुशासन, कर्ण, शकुनीसह उर्वरित सर्व कौरवांना, त्यांना जन्म दिलेल्या आंधळ्याला मारणे, ही माझी एकच इच्छा आहे. मी जीवंत असताना... माझ्या पत्नीला जांघ दाखवलेल्या त्या सर्वांना ठार मारल्यावर शांत होईन. (पृष्ठ 80).  
पात्रचित्रणात व्यक्तीच्या स्वभावाची महानता, महत्त्व सांगण्यात भैरप्पा यांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रशंसनीय आहे. मय निर्मित राजवाड्यात जमीन पाणी समजून, पाणी जमीन समजून मुखभंग झालेल्या दुर्योधनाला पाहून दौपदी हसली नाही, हे सांगताना ती राजघराण्याशी अनुरूप वागली नाही असा अर्थ होईल, हे भैरप्पा सांगतात. त्यामुळे कौरवेश्‍वराच्या सूडाला हेच मूळ कारण हे परिभाषित करणार्‍या सामान्य दृष्टिकोनाच्या पलीकडे ते गेल्याचे दिसते. निसर्गाचे वर्णन औचित्यपूर्ण आणि तेवढ्या थोडक्यात करणारे भैरप्पा हे निसर्गेतर वर्णनही अद्भुतपणे करू शकतात, यासाठी मत्स्ययंत्राचे वर्णन हे उत्तम उदाहरण आहे.  
युद्धभूमीचे चित्रण : दु:खद घटना, करूणरसाचा प्रसंग किती सहजपणे हाताळता येईल, यासाठी अभिमन्यू आणि घटोत्कच यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे सुभद्रा आणि भीमाच्या वेदनेचे वर्णन पाहता येईल. पर्वमध्ये जितक्या बीभत्सपणे युद्धाचे वर्णन आले आहे, तितके अन्य कोठेही आले नसल्याचे दिसते. इतस्तत: तुकडे होऊन पडलेले मृतदेह, ते खाण्यासाठी घिरट्या घालणार्‍या गिधाडांचे चित्कार, दुर्गंधी सहन होत नसल्याने दुसर्‍या मार्गाने रथ नेणारे सारथी अशा वर्णनांना आपल्या काळात झालेल्या जागतिक स्तरावरील आणि भारताच्या भूमीवर झालेल्या युद्धांच्या अहवालाचा आधार आहे. 
पर्व वाचून संपल्यावरही युद्धभूमीवरील दुर्गंधी आपल्याला विसरता येत नाही म्हणजे त्यात अतिशयोक्ती नाही. युद्धाचा वृत्तांत सांगणारा संजय दिव्यदृष्टी लाभलेला असला तरी घटनेनंतर वृत्तांत लिहिणार्‍या पत्रकारासारखे चित्रण झाले आहे, हे लक्ष वेधणारे आहे. युद्धानंतर अत्याचारांना बळी पडून परतलेल्या अनाथांना पंजाबच्या कुटुंबांनी स्वीकारले. नरकासुराच्या ताब्यात असलेल्या स्त्रियांना स्वीकारून कृष्ण पत्नीचे स्थान देतो, याचे चित्रण समकालीन घडामोडींना भैरप्पा प्राचीनतेच्या पटलावरही कसा प्रतिसाद देतात, याला साक्षी आहे. युद्धामुळे जनजीवनावर होणार्‍या भीषण परिणामाकडे लक्ष वेधणारे भैरप्पा धृतराष्ट्राच्या राजवाड्यात दिव्याला तेल नाही, जेवायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे सांगतात. 
पर्वच्या मनोगतात भैरप्पा यांनी सांगितले आहे, ‘मी लिहिलेले महाभारताच्या पात्रांची कथा नाही; मानवी अनुभवाचे वेगवेगळे स्वरूप, रूप, मानवी संबंध, स्वरूप आणि विवेचन याची प्रज्ञा माझ्यात पहिल्यापासूनच होती. एकेक नवीन पात्र अथवा संदर्भ लिहिताना हे नवे आयाम सूचले. (पृष्ठ 10 - 11). समीक्षा करताना पर्वचे नवीन आयाम समोर येतात. पाश्‍चात्य महाकाव्यांचे मानदंड अथवा पौर्वात्य महाकाव्यांचे सिद्धांत यांच्या आधारावर ताडून पाहिल्यास पर्व आधुनिक गद्य महाकाव्य आहे, या सन्मानाला पात्र ठरणारे आहे. 
 डॉ. प्रधान गुरुदत्त, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक 
साभार : दैनिक विजयवाणी 

माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...